शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

तीस गुंठ्यांत तीन लाखांची वांगी

By admin | Updated: June 10, 2016 01:52 IST

येथील भानुदास तांबे व पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन कृष्णा तांबे या दोन भावांनी आजही शेती जोमाने करतात.

रहाटणी : येथील भानुदास तांबे व पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन कृष्णा तांबे या दोन भावांनी आजही शेती जोमाने करतात. सध्या त्यांनी ३० गुंठे जमिनीत सुमारे ३ लाखांचे वांग्याचे उत्पन्न काढले आहे. पाण्याचा मोठ्या प्रमाणात दुष्काळ असतानासुद्धा या दोन भावंडांनी आधुनिक पद्धतीने शेती करून शेतकऱ्यांपुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.रहाटणी, काळेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव या उपनगरातील शेती व्यवसायाला उतरती कला लागली. अनेक शेतकरी पैशाच्या मोहापायी अनेक शेतकरी मिळेल त्या किमतीत जमिनी विकू लागले. काहींनी जिल्ह्याच्या बाहेर जमिनी घेतल्या. मात्र, पुन्हा ते शेतकरी झाले नाहीत.आजही तांबे बंधू रोज उठून सकाळ, संध्याकाळ शेतात असतात. परिसरातील त्यांची आहे तेवढी जमीन जशीच्या तशी आहे. शेतीच करतात. सर्व प्रकारचे उत्पन्न ते घेतात. सध्या राज्यासह या ठिकाणीही पाण्याचा तुटवडा असल्याने त्यांनी आधुनिक पद्धतीची शेती करीत आहेत. ठिबक सिंचन पद्धतीने गावरान वांगीचे उत्पन घेत आहेत . वेळेवर पाणी, औषध व सेंद्रिय खतावर त्यांनी ही शेती करीत आहेत. मागील तीन महिन्यांपासून हे वांगी उत्पन्न सुरू आहे. आणखी काही महिने उत्पन्न सुरू राहणार असून, त्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. वांग्याचा रोजच्या रोज तोडा करून पुणे किंवा पिंपरी भाजी मंडईत विक्रीस नेले जाते. परिसरात पाहावे तिकडे सिमेंटचे डोंगर दिसत असताना फुललेली शेती व भरघोस वांगी उत्पन्न हा या परिसरातील चर्चेचा विषय ठरला आहे. (वार्ताहर)शेती हा आमचा पूर्वजात व्यवसाय आहे. त्यामुळे आम्हाला हे नवीन नाही. पूर्वी अमाप पाऊस होत होता. त्यामुळे कधी पाण्याची टंचाई जाणवत नसे. पाहिजे तेव्हा पाणी मिळत असे. मात्र, सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेती करणे अनेकांना जिकिरीचे झाले आहे. मात्र, कमी पाण्यात आधुनिक पद्धतीने शेती केली, तर चांगल्या प्रकारचे उत्पन्न काढता येते. शेतकऱ्यांनीही काळानुसार बदलण्याची आवश्यकता आहे. - कृष्णा तांबे, शेतकरी