शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

तीस गुंठ्यांत तीन लाखांची वांगी

By admin | Updated: June 10, 2016 01:52 IST

येथील भानुदास तांबे व पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन कृष्णा तांबे या दोन भावांनी आजही शेती जोमाने करतात.

रहाटणी : येथील भानुदास तांबे व पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन कृष्णा तांबे या दोन भावांनी आजही शेती जोमाने करतात. सध्या त्यांनी ३० गुंठे जमिनीत सुमारे ३ लाखांचे वांग्याचे उत्पन्न काढले आहे. पाण्याचा मोठ्या प्रमाणात दुष्काळ असतानासुद्धा या दोन भावंडांनी आधुनिक पद्धतीने शेती करून शेतकऱ्यांपुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.रहाटणी, काळेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव या उपनगरातील शेती व्यवसायाला उतरती कला लागली. अनेक शेतकरी पैशाच्या मोहापायी अनेक शेतकरी मिळेल त्या किमतीत जमिनी विकू लागले. काहींनी जिल्ह्याच्या बाहेर जमिनी घेतल्या. मात्र, पुन्हा ते शेतकरी झाले नाहीत.आजही तांबे बंधू रोज उठून सकाळ, संध्याकाळ शेतात असतात. परिसरातील त्यांची आहे तेवढी जमीन जशीच्या तशी आहे. शेतीच करतात. सर्व प्रकारचे उत्पन्न ते घेतात. सध्या राज्यासह या ठिकाणीही पाण्याचा तुटवडा असल्याने त्यांनी आधुनिक पद्धतीची शेती करीत आहेत. ठिबक सिंचन पद्धतीने गावरान वांगीचे उत्पन घेत आहेत . वेळेवर पाणी, औषध व सेंद्रिय खतावर त्यांनी ही शेती करीत आहेत. मागील तीन महिन्यांपासून हे वांगी उत्पन्न सुरू आहे. आणखी काही महिने उत्पन्न सुरू राहणार असून, त्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. वांग्याचा रोजच्या रोज तोडा करून पुणे किंवा पिंपरी भाजी मंडईत विक्रीस नेले जाते. परिसरात पाहावे तिकडे सिमेंटचे डोंगर दिसत असताना फुललेली शेती व भरघोस वांगी उत्पन्न हा या परिसरातील चर्चेचा विषय ठरला आहे. (वार्ताहर)शेती हा आमचा पूर्वजात व्यवसाय आहे. त्यामुळे आम्हाला हे नवीन नाही. पूर्वी अमाप पाऊस होत होता. त्यामुळे कधी पाण्याची टंचाई जाणवत नसे. पाहिजे तेव्हा पाणी मिळत असे. मात्र, सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेती करणे अनेकांना जिकिरीचे झाले आहे. मात्र, कमी पाण्यात आधुनिक पद्धतीने शेती केली, तर चांगल्या प्रकारचे उत्पन्न काढता येते. शेतकऱ्यांनीही काळानुसार बदलण्याची आवश्यकता आहे. - कृष्णा तांबे, शेतकरी