शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

'साठी'मुळे दानवे युतीबाबत सकारात्मक - उद्धव ठाकरेंचा टोला

By admin | Updated: January 25, 2017 07:33 IST

'सामना'च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी रावसाहेब दानवेंवर टीकास्त्र सोडले आहे..

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची युती आता व्हेंटिलेटरवर गेली असली तरी भाजपा नेते युतीबाबत अद्याप सकारात्मक आहेत. याच मुद्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 'सामना'तून खडे बोल सुनावले आहेत. तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावरही टीका केली असून वयाच्या 'साठी'मुळेच दानवेंना  सकारात्मक विचार सुचत आहेत, असा टोला हाणला आहे. लाखो शिवसैनिक हीच आमची ताकद आहे व त्यांच्या बळावर आम्ही कोणतीही अटीतटीची लढाई लढायला सज्ज आहोत, असे नमूद करत त्यांनी अप्रत्यक्षरित्या 'स्वबळावर' लढण्याचा इशारा दिला. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात ?
-  मुंबईसह दहा महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू  झाली आहे. आघाडय़ा बनत आहेत आणि आघाडय़ा तुटतही आहेत. आयाराम-गयारामांचाही धुरळा उडू लागला आहे. पण सर्वच राजकीय पोंगापंडितांचे लक्ष लागले आहे ते मुंबईत काय होणार? युतीचे कसे होणार? हे सर्व विषय हिंदुस्थानच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारीस आम्ही मार्गी लावू. १९४७ साली देश स्वतंत्र झाला असला तरी हिंदुस्थान नामक भूमी ‘प्रजासत्ताक’ देश खऱया अर्थाने बनला तो २६ जानेवारी १९५० रोजी. या दिवसापासून देशाला स्वतःची घटना, कायदे-कानून मिळाले. नवे अस्तित्व, नवी झेप मिळाली. हिंदुस्थान हे खऱया अर्थाने Republic State म्हणजे प्रजासत्ताक राज्य बनले. त्यामुळे प्रजासत्ताक दिनीच आम्ही फैसला करणार आहोत. लाखो शिवसैनिक हीच आमची ताकद आहे व त्यांच्या बळावर आम्ही कोणतीही अटीतटीची लढाई लढायला सज्ज आहोत, हे आम्ही अगदी विनम्र भावाने येथे नमूद करीत आहोत. सत्तेचा माज आम्हाला कधीच नव्हता. कारण शेवटी जनताच सत्ता देत असते व ज्यांना त्या सत्तेचा माज चढतो अशांचा माज उतरवून त्यांना धुळीस मिळविण्याचे कार्यही सार्वभौम जनताच करीत असते. अशा जनतेसमोर आम्ही सदैव नतमस्तक आहोत. 
 
- शिवसेना-भाजप युतीचे काय होणार व कसे होणार, या प्रश्नाने ज्यांना आज ग्रासले आहे त्यांना आम्ही रावसाहेब दानवे यांच्या एका विनम्र विधानाचा दाखला देऊन श्रद्धा व सबुरीचा मंत्र देत आहोत. श्री. दानवे यांनी असे नम्रपणे जाहीर केले आहे की, ‘‘मुंबईसह राज्यात शिवसेनेसोबत युती करण्याबाबत आम्ही अजून सकारात्मक आहोत. शेवटपर्यंत आमचे प्रयत्न सुरू आहेत!’’ दानवे यांच्या तोंडात साखर पडो. दानवेंसारखे लोक राजकारणात आहेत म्हणून बऱ्याच गोष्टी चांगल्या चालल्या आहेत. दानवे यांची सकारात्मक आणि आश्वासक भूमिका पाहून ‘युती’वाद्यांना नक्कीच तजेला येईल. दानवे हे सकारात्मक आहेत. त्यामुळे कोणत्याही कठीण प्रसंगातून मार्ग ते काढतील व सगळय़ांचीच वाकडी तोंडे वळवून युतीत हास्य निर्माण करतील. रावसाहेब दानवे यांच्या सकारात्मक भूमिकांनी सध्या महाराष्ट्राच्या समाजमनात खळबळ उडवून दिली आहे. ‘निवडणुकीच्या आदल्या दिवशी दारात आलेली लक्ष्मी परत पाठवू नका. लक्ष्मीदर्शन घ्या’ असे लोकांना पटवून देणे हे तर सकारात्मक सज्जन प्रवृत्तीचेच लक्षण आहे. व ‘नोटाबंदी’वर त्यांनी जनतेला दिलेला हा रामबाण उपाय आहे. दानवे यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. दानवे यांनी कालच सांगितले की, ‘‘लोक हो, चिंता कसली करता? बँकांच्या रांगेत चेंगरून काहो मरता? मैं हूं ना. हजार-पाचशेच्या नोटा मी देतो तुम्हाला बदलून!’’ नोटाबंदीवर इतके जालीम मलम लोकांना कोणीच लावले नसेल. दानवे यांची ही सकारात्मक सक्रियताच भाजपला दीपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखवीत राहील. म्हणूनच युतीबाबत ते आश्वासक, सकारात्मक व इतर बरेच काही असल्याबद्दल आमचीही चिंता मिटली आहे. 
 
- राजकारणात, समाजकारणात खूप माणसे भेटतात. वाऱयाच्या झुळकाप्रमाणे येतात आणि जातात. पण काही माणसे अशी असतात जी समाजाला जीवनाचा अर्थ सांगतात. सकारात्मक दृष्टी देऊन जीवनात गोडवा आणतात. दानवे हे त्यातलेच दिसतात. दानवे यांचे वय ‘साठ’ असावे व त्यामुळेच त्यांना हे सकारात्मक विचार सुचत आहेत. आम्ही दानवे यांचे आभार मानतो. दानवे यांनी युतीला सकारात्मक मार्ग दाखवले! त्यांचे अभिनंदन.