शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सावरकर ब्राह्मण होते म्हणून त्यांना विरोध- शरद पोंक्षे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 09:20 IST

संघ, शिवसेना, हिंदुत्त्वावर शरद पोंक्षेचं भाष्य

कल्याण: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला. त्यावर भाष्य करताना सावरकर ब्राह्मण होते म्हणून त्यांना विरोध झाला. त्यांचं आडनाव वेगळं असतं तर वाद झाला नसता, अशी प्रतिक्रिया अभिनेते शरद पोंक्षे यांनी दिली. सावरकर यांच्यावरुन होणाऱ्या वादामागे मतपेटीचं आणि जातीयवादाचं राजकारण दडलेलं असल्याचंदेखील ते म्हणाले. कल्याणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. सावरकर ब्राह्मण असल्यानं त्यांच्यावर टीका केली जाते. मात्र जातीयवाद संपवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न कोणालाच दिसत नाही, याबद्दल शरद पोंक्षे यांनी खंत व्यक्त केली. 'सावरकर ब्राह्मण आहेत म्हणून कोणीही येतं आणि त्यांना टपल्या मारुन जातं. त्यांच्या पाठीमागे कोणीच उभं राहत नाही. पण सावरकर वाचल्यानंतर हे लक्षात येतं की ज्या माणसानं जात हा शब्द संपुष्टात आणण्यासाठी आयुष्य झिजवलं, त्याच माणसाला ब्राह्मण या तीन अक्षरांमध्ये बंदिस्त करुन ठेवलं आहे', असं शरद पोंक्षे म्हणाले.शरद पोंक्षेंनी राष्ट्रीय स्वयंसेक संघ आणि शिवसेनेवरदेखील भाष्य केलं. 'संघात अत्यंत चांगली माणसं घडवली जातात. मीदेखील तिथे होतो. मात्र काही कारणानं बाहेर पडलो. संघात दंड शिकवतात. पण मारायची वेळ आली की बौद्धिक घेतात. आम्हाला दंड मारायला खूप आवडतात. ते दंड मारायला आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं. म्हणून आम्ही शिवसेनेत गेलो,' असं पोंक्षे यांनी सांगितलं. हिंदू असणं म्हणजेच सेक्युलर असल्याचं म्हणत शरद पोंक्षेंनी हिंदुत्वावर त्यांचं मत व्यक्त केलं. 'गर्व कहो से हम हिंदू है म्हटल्यानं इतर धर्मांचा अपमान होत नाही. पण मला माझ्या धर्माचा गर्व आहे. कारण हिंदू असणं म्हणजेच सेक्युलर असणं. हिंदू असणं म्हणजेच मनुष्य असणं. हिंदू असणं म्हणजेच मानवतावादी असणं. त्यामुळे आम्ही सेक्युलर आहोत हे वेगळं सांगण्याची गरज लागत नाही,' असं पोंक्षे म्हणाले.  

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरSharad Ponksheशरद पोंक्षेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी