शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
2
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
4
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
5
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
6
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
7
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
8
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
9
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
10
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
11
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
12
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
13
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
14
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
15
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
16
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
17
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
18
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
19
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
20
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘नेतृत्वाविरोधात टीका किती सहन करायची याला मर्यादा’, वरुण सरदेसाईंनी सुनावले, मविआतील वाद वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 20:33 IST

Varun Sardesai Criticize Congress leaders: सांगलीच्या जागेवरून आक्रमक भूमिका घेतलेले काँग्रेसचे नेते ठाकरे गटावर टीका करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर वरुण सरदेसाई यांनी विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांना इशारा दिला आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने सांगलीमधून चंद्रहार पाटील यांना दिलेल्या उमेदवारीवरून ठाकरे गट आणि काँग्रेसचे नेते सध्या आमने सामने आलेले आहे. सांगली हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने तो आपल्यालाच मिळावा, असा काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांचा आग्रह आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाने सांगलीतून चंद्रहार पाटील यांना थेट उमेदवारी जाही केल्याने काँग्रेसची कोंडी झाली आहे. दरम्यान, सांगलीच्या जागेवरून आक्रमक भूमिका घेतलेले काँग्रेसचे नेते ठाकरे गटावर टीका करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर वरुण सरदेसाई यांनी विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांना इशारा दिला आहे. 

सांगलीच्या जागेसाठी विश्वजित कदम आणि सतेज पाटील यांच्यासह स्थानिक नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना वरुण सरदेसाई म्हणाले की, मला जेवढी कल्पना आहे त्यानुसार विश्वजित कदम आणि सतेज पाटील हे वाटाघाटीच्या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना कदाचित अपुरी माहिती असेल. कोल्हापूरची जागा वर्षांनुवर्षे शिवसेनेच्या हक्काची जागा होती. २०१९ मध्येही आम्ही येथून विजय मिळवला होता. यावेळी स्वत: शाहू महाराज छत्रपती हे तिथून लढत असल्याने आम्ही कोल्हापूरऐवजी सांगलीची जागा घेतली. त्यामुळे कुणीही असं विधान करू नये शेवटी शिवसैनिक म्हटल्यावर आमच्या नेतृत्वाविरोधात किती टीका सहन करायची, यालाही मर्यादा आहेत, असे वरुण सरदेसाई यांनी सुनावले.

महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून असलेला तणाव वगळता इतर सर्वकाही व्यवस्थित असल्याचेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीमध्ये सगळं व्यवस्थित आहे. बाळासाहेब थोरात किंवा शरद पवार यांच्यावर बोलण्याएवढा मी काही मोठा नाही. पण मी एक सांगू इच्छितो की, ज्या शिवसेनेच्या पारंपरिक जागा होत्या. त्यापैकी जागावाटपामध्ये ज्या जागा आम्हाला मिळालेल्या आहेत. त्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. आता महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा मान राखत असताना काही कार्यकर्त्यांना वाटत असतं की, अमूक जागा आपल्याला हवी आहे. मात्र तो त्या त्या पक्षाच्या आणि त्या पक्षामधील नेत्यांचा प्रश्न आहे.  अशा विषयात त्यांच्या पक्षाचं नेतृत्व त्यांच्या स्थानिक नेत्यांची मनधरणी करतील, अशी आम्हाला खात्री आहे, असा विश्वास वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केला.  

महाविकास आघाडी म्हणून, इंडिया आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत. नुकतीच राहुल गांधी यांची सभा झाली तेव्हा सर्वजण एकत्र होते. महाविकास आघाडीमध्ये अत्यंत उत्तम वातावरण आहे. एखाद दुसरा मतदारसंघ सोडता जवळपास सगळीकडे आम्ही एकत्र आलो आहोत. पहिल्यांदाच आघाडी होतेय, म्हटल्यावर ह्या गोष्टी होणारच, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Varun Sardesaiवरुण सरदेसाईsangli-pcसांगलीcongressकाँग्रेसVishwajeet Kadamविश्वजीत कदमlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४