शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

...म्हणून जी घरात नीती तीच राजकारणात पण : ठाकरे सरकारविषयी आंबेडकरांचे सूचक वक्तव्य 

By दीपक अविनाश कुलकर्णी | Published: January 14, 2021 7:34 PM

राज्यात औरंगाबाद व उस्मानाबाद या शहरांच्या नामांतराच्या हालचाली सुरु आहे...

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून नामांतराच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत संघर्षाची ठिणगी पडली असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. आघाडीतील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत वेळोवेळी आपल्या भूमिका जाहिर देखील केल्या आहेत. तसेच मुख्यमंत्र्याच्या 'CMO' या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून औरंगाबादचा संभाजीनगर व उस्मानाबादच्या पुढे धाराशिव असा उल्लेख करण्यात आल्यामुळे नामांतराचा वाद आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच मुद्द्याचा संदर्भ घेत वंचित बहुजन विकास आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारविषयी सूचक वक्तव्य केले आहे. 

पुण्यात प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, राज्यात औरंगाबाद व उस्मानाबाद या शहरांच्या नामांतराच्या हालचाली सुरु आहे. शिवसेनेची औरंगाबाद शहराचे नामकरण करण्याबाबत पहिल्यापासून एक ठाम भूमिका आहे. मात्र काँग्रेसने या नामांतराला स्पष्टपणे विरोध दर्शविला आहे. घरात सारखे वाद झाले की नेमके काय होते हे आपल्या सगळ्यांनाच चांगल्याप्रकारे ठाऊक आहे. त्यामुळे जी घरातील नीती तीच राजकारणात देखील अस्तित्वात आहे. यात नवीन काहीच नाही. 

... म्हणून पुण्याला संभाजी महाराजांचं नाव देणे योग्य...  पुण्याला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे अशी मागणी केली आहे. या बोलताना ते म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ पुण्यात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याला जर कोणाचे नाव द्यायचा विचार झाला तर त्यांचे नाव अगदी योग्य राहील, असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. 

''धिस ईज अ राईट टाईम!'' धनंजय मुंडे प्रकरणावर महत्वपूर्ण भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी केलेल्या बलात्कारसंबंधी आरोपावर प्रतिक्रिया देताना हा गंभीर स्वरूपाचा आरोप असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे आता यावर मुंडे यांनी हे प्रकरण गांभीर्यानं घ्यायचे आहे की नाही ते ठरवायला हवे. मात्र आज ना उद्या केलेला गुन्हा हा बाहेर येतच असतो. त्याच अनुषंगाने आता मुंडे यांनीच 'धिस ईज अ राईट टाईम' म्हणावे असे महत्वपूर्ण विधान केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारण