शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सत्तास्थापनेसाठी किमान समान कार्यक्रम ठरविताना तिन्ही पक्षांची होणार कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 04:35 IST

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशा तीन पक्षांनी एकत्रितपणे सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू

मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशा तीन पक्षांनी एकत्रितपणे सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असून, सरकार चालविण्यासाठी किमान समान कार्यक्रम निश्चित केला जात आहे. तिन्ही पक्षांची ध्येयधोरणे, विचारसरणी बघता हा कार्यक्रम ठरविताना अडचणी येतील, असे दिसते. शिवसेनेची विचारसरणी हिंदुत्वाची आहे. मुस्लिमांच्या आरक्षणाचे या पक्षाने कधीही समर्थन केलेले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी या आरक्षणासाठी नेहमीच आग्रही राहिली आहे. आघाडी सरकारच्या काळात असे आरक्षण दिलेले होते, पण ते टिकले नव्हते. शिवसेनेने सातत्याने कडवट हिंदुत्वाची भूमिका घेत मुस्लिमांवर टीका केली आहे.शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य या मुद्द्यांवर तिन्ही पक्षांची भूमिका एकच असल्याचे दिसते. शिवसेनेच्या वचननाम्यात दहा रुपयांत सर्वसामान्यांना जेवणाची थाळी ही प्रमुख घोषणा होती. तथापि, लोकानुनयाच्या अशा घोषणांनी सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडतो, अशी भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतली, तर अडचण होऊ शकते.शिवसेनेने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना ‘भारतरत्न’ द्यावे, अशी आग्रही मागणी केली आहे. मात्र, काँग्रेसने अशी मागणी कधीही केलेली नव्हती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेला मुरड घालावी लागेल का, हा औत्सुक्याचा विषय आहे. शिवसेनेइतकीच कसरत काँग्रेसला करावी लागणार आहे. धर्मनिरपेक्ष काँग्रेसला हिंदुत्ववादी शिवसेनेशी जुळवून घेताना अनेक मुद्द्यांवर धोरणात्मक अडचणी येऊ शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे. शिवसेनेसोबत सरकार स्थापन करताना आणि त्यासाठीचा किमान समान कार्यक्रम निश्चित करताना या व्होट बँकेवर आच येणार नाही, याची काळजी काँग्रेस-राष्ट्रवादीला घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस