शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

सत्तास्थापनेसाठी किमान समान कार्यक्रम ठरविताना तिन्ही पक्षांची होणार कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 04:35 IST

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशा तीन पक्षांनी एकत्रितपणे सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू

मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशा तीन पक्षांनी एकत्रितपणे सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असून, सरकार चालविण्यासाठी किमान समान कार्यक्रम निश्चित केला जात आहे. तिन्ही पक्षांची ध्येयधोरणे, विचारसरणी बघता हा कार्यक्रम ठरविताना अडचणी येतील, असे दिसते. शिवसेनेची विचारसरणी हिंदुत्वाची आहे. मुस्लिमांच्या आरक्षणाचे या पक्षाने कधीही समर्थन केलेले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी या आरक्षणासाठी नेहमीच आग्रही राहिली आहे. आघाडी सरकारच्या काळात असे आरक्षण दिलेले होते, पण ते टिकले नव्हते. शिवसेनेने सातत्याने कडवट हिंदुत्वाची भूमिका घेत मुस्लिमांवर टीका केली आहे.शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य या मुद्द्यांवर तिन्ही पक्षांची भूमिका एकच असल्याचे दिसते. शिवसेनेच्या वचननाम्यात दहा रुपयांत सर्वसामान्यांना जेवणाची थाळी ही प्रमुख घोषणा होती. तथापि, लोकानुनयाच्या अशा घोषणांनी सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडतो, अशी भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतली, तर अडचण होऊ शकते.शिवसेनेने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना ‘भारतरत्न’ द्यावे, अशी आग्रही मागणी केली आहे. मात्र, काँग्रेसने अशी मागणी कधीही केलेली नव्हती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेला मुरड घालावी लागेल का, हा औत्सुक्याचा विषय आहे. शिवसेनेइतकीच कसरत काँग्रेसला करावी लागणार आहे. धर्मनिरपेक्ष काँग्रेसला हिंदुत्ववादी शिवसेनेशी जुळवून घेताना अनेक मुद्द्यांवर धोरणात्मक अडचणी येऊ शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे. शिवसेनेसोबत सरकार स्थापन करताना आणि त्यासाठीचा किमान समान कार्यक्रम निश्चित करताना या व्होट बँकेवर आच येणार नाही, याची काळजी काँग्रेस-राष्ट्रवादीला घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस