शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

...त्या बैठकीत काँग्रेससोबत तीव्र मतभेद झाले; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 19:59 IST

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील सांगितला. यानंतर राज्यातील आलेल्या राजकीय़ भूकंपावरही खुलासा केला.

 मुंबई : अजित पवारांनी शपथ घेतल्याचा फोन आला, माझा विश्वासच बसत नव्हता. मात्र, त्यांच्या शपथविधीला उपस्थित असलेले चेहरे पाहिले आणि निश्वास सोडल्याचा खुलासा शरद पवारांनी केला. 

एबीपी माझाने आज शरद पवार यांची मुलाखत घेतली. यामध्ये पवार यांनी मोठे खुलासे केले. त्यांनी यावेळी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील सांगितला. यानंतर राज्यातील आलेल्या राजकीय़ भूकंपावरही खुलासा केला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याचा मला फोन आला पण विश्वास बसला नाही. पण त्यातले चेहरे पाहिल्यानंतर हे लोक माझं ऐकणारे असल्याने आपण हे सुधारु शकतो हे लक्षात आल आणि त्या आमदारांना परत आणल्याचे पवारांनी सांगितले. 

काँग्रेस आणि राष्ट्रवीदमध्ये बैठकी होत होत्या नेहरू सेंटरमध्ये दुर्दैवाने काँग्रेसच्या नेत्यांशी माझेच तीव्र मतभेद झाले. सत्तास्थापनेवरून नाही तर काही वेगळ्या विषयांवरून वाद झाले. त्या बैठकीतून मी बाहेर पडलो. इथे बसण्यात काही अर्थ नाही म्हणालो. ही वादावादी झाली तेव्हा आमच्याकडून प्रफुल्ल पटेल, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष होते. अजितने काही सहकाऱ्यांना सांगितले की आताच जर हे अशी टोकाची भूमिका घ्यायला लागले तर हे सरकार चालणार कसे. नंतर शिवसेना येणार, त्यामुळे काँग्रेसची भूमिका योग्य नाही. यानंतर अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचा धक्कादायक खुलासा केला. 

फडणवीसांना वाटत होतो की आधी आमच्य़ाशी बोलावे. दिल्लीत जेव्हा भाजपा नेत्यांना भेटायचो तेव्हा ते सांगायचे की एकत्र येऊन काम केले पाहिजे. अजित पवारांनी मला विचारले, की फडणवीस बोलण्यासाठी बोलावत आहेत. त्याला मी सांगितले की बोलण्यात काय गैर आहे, जा. यानंतर अजितने देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे मला सांगण्याचा प्रयत्न केला. परंतू मी थोडे थांबण्यास सांगितले. भाजपाची मते जाणून घ्यायची होती. मी नंतर ऐकेन असे सांगितल्याचे पवार म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी