शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

महाराष्ट्रात तूर्त चिनी गुंतवणूक नाही; चिनी कंपन्यांशी केलेले करार सध्या ‘जैसे थे’च

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 6:19 AM

गेल्या आठवड्यात केलेले सामंजस्य करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी स्पष्ट केले आहे.

मुंबई : हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स आणि ग्रेट वॉल मोटर्स या चीन येथील तीन कंपन्यांसमवेत महाराष्ट्र सरकारने गेल्या आठवड्यात केलेले सामंजस्य करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी स्पष्ट केले आहे. याचा अर्थ ते रद्द केले आहेत, असा नसून त्यावरील पुढील कार्यवाही प्रतीक्षाधीन आहे, असेही ते म्हणाले. चीनने गलवान खोऱ्यात भारतीय जवानांना ज्या क्रूर व रानटी पद्धतीने मारहाण केली, त्यामुळे देशात संतापाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने करार रद्द केल्याची चर्चा होती.हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स (फोटोन सोबत संयुक्त भागीदारी) आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीन कंपन्यांनी अनुक्रमे २५० कोटी, १ हजार कोटी आणि ३ हजार ७७० कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यातील तळेगाव टप्पा-२ पुणेमध्ये करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र २ अंतर्गत करण्यात आलेल्या १६ हजार कोटी रुपयांच्या १२ करारामध्ये या तीन करारांचा समावेश होता. एकीकडे आपले जवान सीमेवर मारले जात असताना चिनी कंपन्यांशी करार करणे योग्य नाही अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.>केंद्राच्या धोरणाची वाट पाहत आहोतएकूण ५ हजार २० कोटी रुपयांच्या या प्रकल्पांसंदर्भात सध्याच्या वातावरणात केंद्र सरकारकडून स्पष्ट धोरण जाहीर होण्याची वाट पाहण्यात येईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले.भारत - चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी कंपन्यांशी गुंतवणुकीचे कोणतेही नवे करार करू नयेत, असा सल्ला परराष्ट्र मंत्रालयाने राज्यांना दिला आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीchinaचीन