शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

पाणी आहे तर वीज नाही : उपलब्धतेत ४ हजार मेगावॅटची घट

By admin | Updated: May 6, 2017 03:32 IST

राज्यातील बहुसंख्य भागात तापमानाने चाळीशी गाठल्याने व शेतीला पाणी देण्यासाठी विजेच्या मागणीत तब्बल २ हजार मेगावॅटची

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील बहुसंख्य भागात तापमानाने चाळीशी गाठल्याने व शेतीला पाणी देण्यासाठी विजेच्या मागणीत तब्बल २ हजार मेगावॅटची वाढ होऊन ती १८ हजार मेगावॅटवर गेली आहे. मात्र विविध कारणांमुळे मागणीच्या तुलनेत वीज उपलब्धतेत अंदाजे ४ हजार मेगावॅटपर्यंत घट झाली आहे. परिणामी मुंबईत वगळता राज्यात मोठ्या प्रमाणात भारनियमन करावे लागत आहे. त्यामुळे पाणी आहे तर वीज नाही, अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. गुरुवारी महावितरणकडून १५०० मेगावॅट भारनियमन करण्यात आले. प्रशासनाच्या नियोजनाअभावी कोयना धरणातील पाण्याचा राज्याचा निर्धारीत हिस्सा संपल्याने वीज निर्मितीत घट झाली आहे. पाणी लवादाच्या वाटपानुसार कोयना धरणातून राज्याच्या वाट्याला ६७ टीएमसी पाणी येते. मात्र पाण्याचा याआधीच वीज निर्मितीसाठी भरमसाठ वापर झाला. उन्हाळ््यासाठी पाणी राखीव ठेवण्याबाबत कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल २ हजार मेगावॅटने विजेची मागणी वाढल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. महानिर्मितीच्या संचापैकी कोराडी संच क्र. १० (६६० मे.वॅ.), खापरखेडा संच क्र. २ (२१० मे.वॅ.), परळी संच क्र. ८ (२५० मे.वॅ.) तसेच अदानी संच क्र. १ (६६० मे.वॅ.), रतन इंडियाचे संच क्र. ४ व ५ (प्रत्येकी २७० मे.वॅ.) हे तांत्रिक कारणांमुळे बंद आहेत. अदानी आणि रतन इंडिया यांच्या चालू असलेल्या संचामधून कमी वीजनिर्मिती होत आहे. त्यातच देखभाल दुरुस्तीसाठी चंद्रपूर संच क्र. ७ (५०० मे.वॅ.), कोराडी संच क्र. ६(२१० मे.वॅ.) केंद्राकडून मिळणारा सिपत संच क्र. १ व तारापूर संच क्र. ४ (४०० मे.वॅ.) नियोजितरित्या अगोदरच बंद केल्याने विजेची उपलब्धता ४ हजार मे.वॅ. ने कमी झाली आहे. मात्र त्यानंतरही ३ व ४ मे रोजी महावितरणकडून १ हजार ते १,२०० मे.वॅ. इतकेच भारनियमन करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. अकृषक ग्राहकांना ४०० ते ६०० मे.वॅ. भारनियमनाला सामोरे जावे लागले.कृषी ग्राहकांसाठी वेळांमध्ये बदलमहावितरणने ५ मे पासून कृषीग्राहकांच्या वाहिन्यांवरून रात्री १ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दोन टप्प्यांमध्ये रात्री व दिवसा ८ तास तीन फेजचा वीजपुरवठा उपलब्ध करून दिला आहे.चंद्रपूर, कोराडीत हजार मेगावॅटची तूटचंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचा एक संच देखभाल दुरूस्तीकरिता बंद आहे. त्यामुळे २९२० मेगावॅट क्षमतेपैकी १९२१ मेगावॅट वीज निर्मिती शुक्रवारी सुरू होती. कोराडी वीज केंद्राची क्षमता २,१७० मेगावॅट आहे. एक संच बंद असून एकूण ११४० मेगावॅट वीजनिर्मिती केली जात आहे. खापरखेडा वीजनिर्मितीची क्षमता १३४० मेगावॅट आहे. सध्या ८८२ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे.आठवडाभरात परिस्थिती पूर्ववतअदानी आणि इंडिया बुल्स कंपन्यांना कोळसा न पोहोचल्यामुळे वीज निर्मिती कमी झाली. त्यामुळे भारनियमनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने संबंधितांची बैठक घेऊन, कराराप्रमाणे वीज द्यावीच लागेल, असे कंपन्यांना सांगितले आहे. आठवडाभरात सर्व परिस्थिती पूर्ववत होईल. - चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जा मंत्री.धरणाच्या पायथा वीजगृहावर भिस्तकोयना धरणातील टप्पा क्र. ४ ची वीजनिर्मिती बंद झाली. धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने पायथा वीजगृहाच्या विजेवरच भिस्त आहे. ५० टीएमसी पाणी हे सिंचन, बिगर सिंचन, पिण्याच्या पाण्यासहित पूर्वेकडे ताकारी, टेंभू योजनांसाठी वापरण्यात येते. पूर्वेकडील पाणी वापर २६.८७ टीएमसी असून पाणीसाठा २१.०१ टीएमसी आहे.विविध स्त्रोतांतून वीज खरेदीमहानिर्मिती व अदानी यांच्या निर्मिती संचांपासून वीज उपलब्धतेमध्ये सुमारे ७०० मे.वॅ. इतकी वाढ झाली आहे.