शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

पाणी आहे तर वीज नाही : उपलब्धतेत ४ हजार मेगावॅटची घट

By admin | Updated: May 6, 2017 03:32 IST

राज्यातील बहुसंख्य भागात तापमानाने चाळीशी गाठल्याने व शेतीला पाणी देण्यासाठी विजेच्या मागणीत तब्बल २ हजार मेगावॅटची

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील बहुसंख्य भागात तापमानाने चाळीशी गाठल्याने व शेतीला पाणी देण्यासाठी विजेच्या मागणीत तब्बल २ हजार मेगावॅटची वाढ होऊन ती १८ हजार मेगावॅटवर गेली आहे. मात्र विविध कारणांमुळे मागणीच्या तुलनेत वीज उपलब्धतेत अंदाजे ४ हजार मेगावॅटपर्यंत घट झाली आहे. परिणामी मुंबईत वगळता राज्यात मोठ्या प्रमाणात भारनियमन करावे लागत आहे. त्यामुळे पाणी आहे तर वीज नाही, अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. गुरुवारी महावितरणकडून १५०० मेगावॅट भारनियमन करण्यात आले. प्रशासनाच्या नियोजनाअभावी कोयना धरणातील पाण्याचा राज्याचा निर्धारीत हिस्सा संपल्याने वीज निर्मितीत घट झाली आहे. पाणी लवादाच्या वाटपानुसार कोयना धरणातून राज्याच्या वाट्याला ६७ टीएमसी पाणी येते. मात्र पाण्याचा याआधीच वीज निर्मितीसाठी भरमसाठ वापर झाला. उन्हाळ््यासाठी पाणी राखीव ठेवण्याबाबत कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल २ हजार मेगावॅटने विजेची मागणी वाढल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. महानिर्मितीच्या संचापैकी कोराडी संच क्र. १० (६६० मे.वॅ.), खापरखेडा संच क्र. २ (२१० मे.वॅ.), परळी संच क्र. ८ (२५० मे.वॅ.) तसेच अदानी संच क्र. १ (६६० मे.वॅ.), रतन इंडियाचे संच क्र. ४ व ५ (प्रत्येकी २७० मे.वॅ.) हे तांत्रिक कारणांमुळे बंद आहेत. अदानी आणि रतन इंडिया यांच्या चालू असलेल्या संचामधून कमी वीजनिर्मिती होत आहे. त्यातच देखभाल दुरुस्तीसाठी चंद्रपूर संच क्र. ७ (५०० मे.वॅ.), कोराडी संच क्र. ६(२१० मे.वॅ.) केंद्राकडून मिळणारा सिपत संच क्र. १ व तारापूर संच क्र. ४ (४०० मे.वॅ.) नियोजितरित्या अगोदरच बंद केल्याने विजेची उपलब्धता ४ हजार मे.वॅ. ने कमी झाली आहे. मात्र त्यानंतरही ३ व ४ मे रोजी महावितरणकडून १ हजार ते १,२०० मे.वॅ. इतकेच भारनियमन करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. अकृषक ग्राहकांना ४०० ते ६०० मे.वॅ. भारनियमनाला सामोरे जावे लागले.कृषी ग्राहकांसाठी वेळांमध्ये बदलमहावितरणने ५ मे पासून कृषीग्राहकांच्या वाहिन्यांवरून रात्री १ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दोन टप्प्यांमध्ये रात्री व दिवसा ८ तास तीन फेजचा वीजपुरवठा उपलब्ध करून दिला आहे.चंद्रपूर, कोराडीत हजार मेगावॅटची तूटचंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचा एक संच देखभाल दुरूस्तीकरिता बंद आहे. त्यामुळे २९२० मेगावॅट क्षमतेपैकी १९२१ मेगावॅट वीज निर्मिती शुक्रवारी सुरू होती. कोराडी वीज केंद्राची क्षमता २,१७० मेगावॅट आहे. एक संच बंद असून एकूण ११४० मेगावॅट वीजनिर्मिती केली जात आहे. खापरखेडा वीजनिर्मितीची क्षमता १३४० मेगावॅट आहे. सध्या ८८२ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे.आठवडाभरात परिस्थिती पूर्ववतअदानी आणि इंडिया बुल्स कंपन्यांना कोळसा न पोहोचल्यामुळे वीज निर्मिती कमी झाली. त्यामुळे भारनियमनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने संबंधितांची बैठक घेऊन, कराराप्रमाणे वीज द्यावीच लागेल, असे कंपन्यांना सांगितले आहे. आठवडाभरात सर्व परिस्थिती पूर्ववत होईल. - चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जा मंत्री.धरणाच्या पायथा वीजगृहावर भिस्तकोयना धरणातील टप्पा क्र. ४ ची वीजनिर्मिती बंद झाली. धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने पायथा वीजगृहाच्या विजेवरच भिस्त आहे. ५० टीएमसी पाणी हे सिंचन, बिगर सिंचन, पिण्याच्या पाण्यासहित पूर्वेकडे ताकारी, टेंभू योजनांसाठी वापरण्यात येते. पूर्वेकडील पाणी वापर २६.८७ टीएमसी असून पाणीसाठा २१.०१ टीएमसी आहे.विविध स्त्रोतांतून वीज खरेदीमहानिर्मिती व अदानी यांच्या निर्मिती संचांपासून वीज उपलब्धतेमध्ये सुमारे ७०० मे.वॅ. इतकी वाढ झाली आहे.