शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

दलित-मराठा वाद नाही, दोन्ही समाजातील नेत्यांची संयुक्त बैठक : धर्मांध शक्तींकडून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 20:23 IST

कोरेगाव भीमा दंगलीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील दलित व मराठा समाजातील नेत्यांनी एकत्रित येत दलित-मराठा वाद नसल्याचे स्पष्ट केले आहे. काही धर्मांध शक्तींकडून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापार्श्वभुमीवर लवकरच पुण्यात मराठा-दलित सामाजिक सलोखा परिषद घेणार असल्याचे या नेत्यांनी सांगितले.

पुणे : कोरेगाव भीमा दंगलीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील दलित व मराठा समाजातील नेत्यांनी एकत्रित येत दलित-मराठा वाद नसल्याचे स्पष्ट केले आहे. काही धर्मांध शक्तींकडून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापार्श्वभुमीवर लवकरच पुण्यात मराठा-दलित सामाजिक सलोखा परिषद घेणार असल्याचे या नेत्यांनी सांगितले.

विविध दलित संघटना, मराठा संघटना व राजकीय पक्षांमधील दलित-मराठा नेत्यांनी एकत्रितपणे बैठक घेतली. याबाबत माहिती देण्यासाठी शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, आमदार शरद रणपिसे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, मराठा क्रांती मोर्चाचे शांताराम कुंजीर, प्रविण गायकवाड, महेंद्र कांबळे, हणमंत मोटे, कैलास पाठारे, बाळासाहेब अमराळे, राहुल डंबाळे, रोहिदास गायकवाड, प्रभाकर दुर्गे आदी यावेळी उपस्थित होते. 

बागवे म्हणाले, कोरेगाव भीमा दंगलीनंतर मराठा विरूध्द दलित असे चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. जातीयवादी व धर्मांध प्रवृत्तीच्या शक्तींनी ही तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, मराठा व दलित यांच्यात वाद नाही. दोन्ही समाजातील नेत्यांची यासंदर्भात एकत्रित बैठक घेण्यात आली आहे. सामाजिक सलोखा टिकविण्यासाठी दोन्ही समाज प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी सामाजिक सलोखा परिषद घेण्याचा निर्णय झाला आहे.

मराठा क्रांती मोर्चाने दलित समाजातील नेत्यांना एकत्रित येण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार दोन्ही समाजातील नेत्यांच्या बैठकीत एकत्रितपणे विविध निर्णय घेण्यात आले. याबाबत शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, असे कुंजीर यांनी सांगितले. सामाजिक सलोख्याचे हे मॉडेल महाराष्ट्रात नेले जाईल, असे रणपिसे म्हणाले. वढु बु. येथील संभाजी महाराजांचे स्मारक विशिष्ट विचारांच्या संघटनांच्या ताब्यात न देता ते शासनाने ताब्यात घेवून त्याचा विकास करावा. तसेच गोविंद गायकवाड महार यांचे योगदानही मान्य करत त्यांची समाधी बांधून योग्य इतिहास जनतेपर्यंत पोहचवावा, असे गायकवाड यांनी नमुद केले.

भाजपासोबत तात्वीक युती नाही

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी उपमहापौर धेंडे यांनी केली. तसेच आम्ही भाजपासोबत असलो तरी ही केवळ राजकीय स्वरूपाची युती आहे. आमची तात्वीक युती नाही. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदार आठवले यांनीही याबाबत भुमिका मांडल्याचे धेंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

दोन्ही समाजाच्या बैठकीतील निर्णय व मागण्या -

- दंगलीचे सुत्रधार मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांना अटक करून त्यांची नार्कोटेस्ट करण्यात यावी.

- कोरेगाव भीमा विजयस्तंभ येथे २४ तास कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था पुरवावी

- ग्रामीण भागातील दलित वस्त्यांमध्ये पोलिस संरक्षण द्यावे

- घटनेतील जखमींना २ ते ५ लाख रुपयांची मदत करावी

- अ‍ॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल होणार नाहीत याबाबत दोन्ही समाजाकडून खबरदारी घेण्यात येईल.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावPuneपुणे