शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

आबांवर ‘तो’ आरोप नको

By admin | Updated: March 10, 2015 01:59 IST

सर्वाधिक काळ जवळपास अकरा वर्षे राज्याचे गृहमंत्री पद सांभाळणा-या आर. आर. पाटील यांनी कधी तत्वांशी तडजोड केली नाही.

मुंबई : सर्वाधिक काळ जवळपास अकरा वर्षे राज्याचे गृहमंत्री पद सांभाळणा-या आर. आर. पाटील यांनी कधी तत्वांशी तडजोड केली नाही. पारदर्शीपणे कारभार केला. पण, शेवटपर्यंत त्यांच्या मनाला एक बोचणी होती. ती म्हणजे २६/११च्या मुंबई हल्ल्यानंतर ‘बडे बडे शहरों मैं..’ हे वाक्य त्यांच्या तोंडी घालण्यात आले. आबा तसे बोलले याचा कोणताच पुरावा नाही. त्यांनी स्वत: त्याचा इन्कार केला. पण माध्यमांसह सर्वांनीच त्यांच्यावर टीका केली. या आरोपाची बोच त्यांना कायम होती. किमान आता तरी त्या आरोपातून आबांची मुक्तता करा, असे भावनिक आवाहन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केले. आर. आर. पाटील यांच्यावरील शोकप्रस्तावावर ते बोलत होते. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत नेत्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, शिवसेनेचे प्रकाश (बाळा) सावंत, माजी मंत्री जगन्नाथराव जाधव, रमेश पान्या वळवी, भागूजी गाडेपाटील, सुखदेव उईके, रामकिशन दायमा, विश्वनाथराव जाधव आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. यावेळी फडणवीस म्हणाले की, आबांच्या निधनाने राज्याने संवेदनशील लोकप्रतिनिधी गमावला. सामान्य कुटुंबातून राजकारणात आलेल्या आबांनी कायम सर्वसमान्य जनतेचा विचार केला. संसदीय राजकारणातील सारी आयुधे जनहितासाठी वापरण्यासाठी त्यांची धडपड असे. म्हणूनच संसदेच्या धर्तीवर जेव्हा विधिमंडळात उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्काराची सुरुवात करण्यात आली, तेव्हा त्याचे पहिले मानकरी आबा ठरले. गृहमंत्रीपद सांभाळताना वशील्याशिवाय, पारदर्शक अशी पोलिस भरतीची प्रक्रीया आबांनी राबवली. तंटामुक्ती सारख्या त्यांच्या योजनांची दखल जागतिक पातळीवर घेतली गेल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावावर बोलताना अजित पवार म्हणाले की, निवडणुकीनंतर पहिल्या चार महिन्यात तीन विद्यमान आमदार आपल्यातून गेले. त्यात गेली २५ वर्षे अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजविणा-या आबांचा मृत्यू मनाला चटका लावणारा आहे. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटंीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, छगन भुजबळ, पतंगराव कदम, जयंत पाटील, गणपतराव देशमुख, शरद सोनावणे, अर्जुन खोतकर, अबू आझमी आदी नेत्यांनी श्रध्दांजलीपर भाषणे केली. शोकप्रस्तावानंतर विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. (विशेष प्रतिनिधी)