शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

नियमाने लावलेले भोंगे काढायचा प्रश्नच नाही; भोंगे काढा असे निकालात नाही - दिलीप वळसे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 09:52 IST

...मात्र, ज्या न्यायालयीन निर्णयाचा आधार घेत ही वक्तव्ये केली जात आहेत त्या निकालात भोंगे काढा असे कुठेच म्हटलेले नाही.

मुंबई : भोंगे काढा असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात कुठेच म्हटले नाही. रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत भोंगे लावू नयेत, असा न्यायालयाचा निकाल आहे. त्यामुळे परवानगी घेऊन, नियमानुसार लावलेले भोंगे उतरविण्याचा प्रश्नच येत नाही, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शनिवारी स्पष्ट केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ठाण्यातील भाषणात ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवा, असा इशारा राज्य सरकारला दिला होता. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले की, हे असे इशारे सरकारने गांभीर्याने घेतले आहेत. मात्र, ज्या न्यायालयीन निर्णयाचा आधार घेत ही वक्तव्ये केली जात आहेत त्या निकालात भोंगे काढा असे कुठेच म्हटलेले नाही. रात्री दहा ते सकाळी सहा या काळात भोंगे लावू नयेत, असा निकाल आहे. त्यामुळे ज्या मंदिर, मस्जिद किंवा अन्य प्रार्थनास्थळांनी नियमानुसार परवानगी घेऊन भोंगे लावले आहेत, तिथले भोंगे उतरवायचा प्रश्नच येत नाही. कोणी हे भोंगे उतरविण्याचा प्रयत्न केलाच तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशाराही गृहमंत्र्यांनी दिला.

महाआरती आणि हनुमान चालीसावरून सुरू असलेल्या वादंगावर गृहमंत्री म्हणाले की, ज्यांना हनुमान चालीसा, महाआरती वगैरे म्हणायचे आहे किंवा ज्याला जे जे करायचे आहे ते त्यांनी आपल्या घरात, तीर्थस्थानावर, आपापल्या मंदिर, मस्जिद आणि प्रार्थनास्थळी करावे. पण सध्या या गोष्टींचे विनाकारण राजकीय भांडवल करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही वळसे-पाटील यांनी केला. महाराष्ट्र पोलीस मुस्लीम संघटनांसोबत बोलणे करत आहेत. त्यांना भोंगे आणि आवाजासंदर्भातील जे नियम आहेत, त्यांची सविस्तर माहिती दिली जात आहे, असेही वळसे पाटील म्हणाले.

विजय अपेक्षितच होता -कोल्हापूर येथील पोटनिवडणुकीतील विजय अपेक्षितच होता. आणखी मोठा विजय होणे अपेक्षित होते. भाजपने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक न लढविता धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला. भाजपने केवळ धार्मिक भावना पुढे करत प्रचार केला. परंतु, त्यांना मतदारांनी नाकारले आहे, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले.

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसे