शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

"महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत नाही"; चेन्नीथला म्हणाले, "ज्यांना एबी फॉर्म दिलाय त्यांनाच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 16:17 IST

महाविकास आघाडीत मैत्रीपुर्ण लढत होणार नसल्याचे मविआच्या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.

Ramesh Chennithala: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपली. ही मुदत संपताच महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला. मात्र अनेक ठिकाणी जागेवरुन घटक पक्षांमध्ये आधी आणि नंतर चर्चा झाली. मात्र तरीही प्रश्न न सुटल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महाविकास आघाडीने २८८ उमेदवार जाहीर केले असले तरी अनेक ठिकाणी घटक पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे म्हटलं जात आहे. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी एबी फॉर्म दिलेल्या उमेदवारांनी आपले उमेदरवारी अर्ज दाखल केले. मात्र तरीही मित्रपक्षातील इच्छुकांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना आव्हान देत उमेदवारी अर्ज भरले. त्यामुळे अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचे म्हटलं जात आहे. या लढती रोखण्यासाठी आता महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. अशातच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असं म्हटलं आहे. उमेदवारांनी भरलेले अर्ज ४ तारखेपर्यंत मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही चेन्नीथला यांनी स्पष्ट केलं.

महाविकास आघाडीमध्ये कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असेही चेन्नीथला यांनी बजावले आहे. "ज्या उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत त्यांनाच आम्ही 'एबी' फॉर्म दिले आहेत. ज्या काँग्रेस नेत्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत त्यांनी अर्ज मागे घ्यावेत," असे रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.

मैत्रीपूर्ण लढतीवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केलं आहे. "आमच्या ९६ उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. काँग्रेसने पण आमच्यापेक्षा दोन-तीन जागा जास्त भरलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील चांगले अर्ज भरले आहेत. आम्हाला एकत्र बसून लढायचे आणि जिंकाचे आहे. त्यानुसार आम्ही योग्य तो मार्ग काढू," असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.   

"कोणत्याही आघाडीमध्ये अशा घटना घडत असतात. निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या तारखेच्या  आधी आम्ही एकत्र बसू आमच्या प्रत्येक घटकाच्या उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे त्यांची आम्ही समजूत काढू. आम्हाला या राज्यात बदल घडवायचा आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र राहण्याची गरज आहे. २८८ जागा आघाडीमध्ये कोणालाच लढता येत नाही. ९० टक्के जागांवर आम्ही तिन्ही पक्षांची समजूत काढलेली आहे," असेही संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसSanjay Rautसंजय राऊतNana Patoleनाना पटोले