शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

"महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत नाही"; चेन्नीथला म्हणाले, "ज्यांना एबी फॉर्म दिलाय त्यांनाच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 16:17 IST

महाविकास आघाडीत मैत्रीपुर्ण लढत होणार नसल्याचे मविआच्या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.

Ramesh Chennithala: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपली. ही मुदत संपताच महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला. मात्र अनेक ठिकाणी जागेवरुन घटक पक्षांमध्ये आधी आणि नंतर चर्चा झाली. मात्र तरीही प्रश्न न सुटल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महाविकास आघाडीने २८८ उमेदवार जाहीर केले असले तरी अनेक ठिकाणी घटक पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे म्हटलं जात आहे. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी एबी फॉर्म दिलेल्या उमेदवारांनी आपले उमेदरवारी अर्ज दाखल केले. मात्र तरीही मित्रपक्षातील इच्छुकांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना आव्हान देत उमेदवारी अर्ज भरले. त्यामुळे अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचे म्हटलं जात आहे. या लढती रोखण्यासाठी आता महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. अशातच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असं म्हटलं आहे. उमेदवारांनी भरलेले अर्ज ४ तारखेपर्यंत मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही चेन्नीथला यांनी स्पष्ट केलं.

महाविकास आघाडीमध्ये कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असेही चेन्नीथला यांनी बजावले आहे. "ज्या उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत त्यांनाच आम्ही 'एबी' फॉर्म दिले आहेत. ज्या काँग्रेस नेत्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत त्यांनी अर्ज मागे घ्यावेत," असे रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.

मैत्रीपूर्ण लढतीवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केलं आहे. "आमच्या ९६ उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. काँग्रेसने पण आमच्यापेक्षा दोन-तीन जागा जास्त भरलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील चांगले अर्ज भरले आहेत. आम्हाला एकत्र बसून लढायचे आणि जिंकाचे आहे. त्यानुसार आम्ही योग्य तो मार्ग काढू," असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.   

"कोणत्याही आघाडीमध्ये अशा घटना घडत असतात. निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या तारखेच्या  आधी आम्ही एकत्र बसू आमच्या प्रत्येक घटकाच्या उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे त्यांची आम्ही समजूत काढू. आम्हाला या राज्यात बदल घडवायचा आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र राहण्याची गरज आहे. २८८ जागा आघाडीमध्ये कोणालाच लढता येत नाही. ९० टक्के जागांवर आम्ही तिन्ही पक्षांची समजूत काढलेली आहे," असेही संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसSanjay Rautसंजय राऊतNana Patoleनाना पटोले