शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

"महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत नाही"; चेन्नीथला म्हणाले, "ज्यांना एबी फॉर्म दिलाय त्यांनाच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 16:17 IST

महाविकास आघाडीत मैत्रीपुर्ण लढत होणार नसल्याचे मविआच्या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.

Ramesh Chennithala: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपली. ही मुदत संपताच महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला. मात्र अनेक ठिकाणी जागेवरुन घटक पक्षांमध्ये आधी आणि नंतर चर्चा झाली. मात्र तरीही प्रश्न न सुटल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महाविकास आघाडीने २८८ उमेदवार जाहीर केले असले तरी अनेक ठिकाणी घटक पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे म्हटलं जात आहे. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी एबी फॉर्म दिलेल्या उमेदवारांनी आपले उमेदरवारी अर्ज दाखल केले. मात्र तरीही मित्रपक्षातील इच्छुकांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना आव्हान देत उमेदवारी अर्ज भरले. त्यामुळे अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचे म्हटलं जात आहे. या लढती रोखण्यासाठी आता महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. अशातच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असं म्हटलं आहे. उमेदवारांनी भरलेले अर्ज ४ तारखेपर्यंत मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही चेन्नीथला यांनी स्पष्ट केलं.

महाविकास आघाडीमध्ये कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असेही चेन्नीथला यांनी बजावले आहे. "ज्या उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत त्यांनाच आम्ही 'एबी' फॉर्म दिले आहेत. ज्या काँग्रेस नेत्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत त्यांनी अर्ज मागे घ्यावेत," असे रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.

मैत्रीपूर्ण लढतीवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केलं आहे. "आमच्या ९६ उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. काँग्रेसने पण आमच्यापेक्षा दोन-तीन जागा जास्त भरलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील चांगले अर्ज भरले आहेत. आम्हाला एकत्र बसून लढायचे आणि जिंकाचे आहे. त्यानुसार आम्ही योग्य तो मार्ग काढू," असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.   

"कोणत्याही आघाडीमध्ये अशा घटना घडत असतात. निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या तारखेच्या  आधी आम्ही एकत्र बसू आमच्या प्रत्येक घटकाच्या उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे त्यांची आम्ही समजूत काढू. आम्हाला या राज्यात बदल घडवायचा आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र राहण्याची गरज आहे. २८८ जागा आघाडीमध्ये कोणालाच लढता येत नाही. ९० टक्के जागांवर आम्ही तिन्ही पक्षांची समजूत काढलेली आहे," असेही संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसSanjay Rautसंजय राऊतNana Patoleनाना पटोले