शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

राज्यातील ६ साखर कारखाने झाले सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 10:32 IST

लांबलेल्या पावसामुळे धुराडी उशिराने पेटली

ठळक मुद्देदीड महिना विलंबगेल्या वर्षी परतीचा पाऊस न झाल्याने ऊस क्षेत्र होते घटलेगेल्या वर्षी १९५ कारखाने गाळप हंगामात सहभागी

पुणे : गेल्या वर्षीचा दुष्काळ व पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये यंदाचा ऊस गाळप हंगाम अडकला आहे. राज्यातील गाळप हंगाम एक ते दीड महिना विलंबाने सुरू झाला असून, सोमवार अखेरीस (दि. २५) जेमतेम सहा कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. गेल्या वर्षी परतीचा पाऊस न झाल्याने ऊस क्षेत्र घटले होते. त्यातच आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत ऊसपिकाचे मोठे नुकसान झाले. या सर्व कारणांमुळे गत हंगामाच्या तुलनेत ऊस क्षेत्र ११.६२ लाख हेक्टरवरून ८.२२ लाख हेक्टरपर्यंत घटले आहे.  गेल्या वर्षी १९५ कारखाने गाळप हंगामात सहभागी झाले होते. तर, ९५२ लाख हेक्टर ऊस गाळपातून १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. तसेच, साखरेचे उत्पादनदेखील ५८ लाख टनांच्या आसपास राहिले. यंदाच्या हंगामासाठी १६२ कारखान्यांनी केले अर्ज केले आहेत. त्यातील १२५ कारखान्यांना गाळप परवाने दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील माळेगाव, सोमेश्वर, दौंड शुगर, संगमनेर, यू टेक यांच्यासह आणखी एक  कारखाना सुरू झाला आहे. गत हंगामाच्या तुलनेत यंदा ३३ कारखान्यांनी अर्जच केले नाहीत. तर, ३७ कारखान्यांकडे उसाच्या रास्त व किफायतशीर दरापोटी (एफआरपी) रक्कम शिल्लक असल्याने त्यांचा परवाना मंजूर केला नसल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. ..........पुराचा साडेतीन लाख टन उसाला फटकाराज्यात आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या उसाचे मोठे नुकसान झाले आहे. ४सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.४तब्बल साडेतीन लाख टन ऊस पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झाला आहे. ..........उसाचा रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) गेल्यावर्षी प्रमाणे कायम आहे. दहा टक्के साखर उताºयासाठी २७५० रुपये प्रतिटन व वरील प्रत्येक टक्क्यासाठी २७५ रुपये अधिक दर देण्यात येईल. केंद्र सरकारने जाहीर केलेला साखरेचा किमान विक्री दरही ३१०० रुपये प्रतिक्विंटल इतका कायम आहे. .......... 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीGovernmentसरकार