शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

राज्यातील ६ साखर कारखाने झाले सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 10:32 IST

लांबलेल्या पावसामुळे धुराडी उशिराने पेटली

ठळक मुद्देदीड महिना विलंबगेल्या वर्षी परतीचा पाऊस न झाल्याने ऊस क्षेत्र होते घटलेगेल्या वर्षी १९५ कारखाने गाळप हंगामात सहभागी

पुणे : गेल्या वर्षीचा दुष्काळ व पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये यंदाचा ऊस गाळप हंगाम अडकला आहे. राज्यातील गाळप हंगाम एक ते दीड महिना विलंबाने सुरू झाला असून, सोमवार अखेरीस (दि. २५) जेमतेम सहा कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. गेल्या वर्षी परतीचा पाऊस न झाल्याने ऊस क्षेत्र घटले होते. त्यातच आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत ऊसपिकाचे मोठे नुकसान झाले. या सर्व कारणांमुळे गत हंगामाच्या तुलनेत ऊस क्षेत्र ११.६२ लाख हेक्टरवरून ८.२२ लाख हेक्टरपर्यंत घटले आहे.  गेल्या वर्षी १९५ कारखाने गाळप हंगामात सहभागी झाले होते. तर, ९५२ लाख हेक्टर ऊस गाळपातून १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. तसेच, साखरेचे उत्पादनदेखील ५८ लाख टनांच्या आसपास राहिले. यंदाच्या हंगामासाठी १६२ कारखान्यांनी केले अर्ज केले आहेत. त्यातील १२५ कारखान्यांना गाळप परवाने दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील माळेगाव, सोमेश्वर, दौंड शुगर, संगमनेर, यू टेक यांच्यासह आणखी एक  कारखाना सुरू झाला आहे. गत हंगामाच्या तुलनेत यंदा ३३ कारखान्यांनी अर्जच केले नाहीत. तर, ३७ कारखान्यांकडे उसाच्या रास्त व किफायतशीर दरापोटी (एफआरपी) रक्कम शिल्लक असल्याने त्यांचा परवाना मंजूर केला नसल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. ..........पुराचा साडेतीन लाख टन उसाला फटकाराज्यात आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या उसाचे मोठे नुकसान झाले आहे. ४सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.४तब्बल साडेतीन लाख टन ऊस पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झाला आहे. ..........उसाचा रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) गेल्यावर्षी प्रमाणे कायम आहे. दहा टक्के साखर उताºयासाठी २७५० रुपये प्रतिटन व वरील प्रत्येक टक्क्यासाठी २७५ रुपये अधिक दर देण्यात येईल. केंद्र सरकारने जाहीर केलेला साखरेचा किमान विक्री दरही ३१०० रुपये प्रतिक्विंटल इतका कायम आहे. .......... 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीGovernmentसरकार