शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

...तर आम्ही हे सहन करणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा ओवेसींसह महाविकास आघाडीलाही थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 13:02 IST

"त्या औरंग्याच्या थडग्यावर जाऊन त्या ठिकाणी जर तुम्ही नमस्कार करत असाल, आदाब करत असाल, तर हे आम्ही सहन करणार नाही..." 

मला समजलं, आज या मतदारसंघांमध्ये ओवेसी आले होते. ओवेसींनी या ठिकाणी सभा घेतली. अलीकडच्या काळात ओवेसी देखील पोपटासारखे बोलत आहेत, पण मी ओवेसी यांना कालच सांगितलं, हे हैदराबाद नाही, ही मुंबई आहे, हा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवरायांच्या तळपत्या तलवारीने ज्या महाराष्ट्राने देव, देश आणि धर्मासाठी लढाई लढली आणि मोगलांना चारोखाने चित केलं, तो हा महाराष्ट्र आहे. अरे या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही रजाकारांचं सरकार पुन्हा इथे आणण्याचं स्वप्न पाहू नका. ओवेसी ज्या रजाकारांना आम्ही या महाराष्ट्रातनं घालवलं, त्यांना पुन्हा इथे आणण्याचं स्वप्न बघाल तर तुमचं स्वप्न याच महाराष्ट्रामध्ये गाढून टाकू, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओवेसींना दिला आहे. ते मुंबईतील ओशिवरा मतदारसंघात महायुतीच्या प्राचर सभेत बोलत होते.

 फडणवीस म्हणाले, "अरे आम्ही कोण्या धर्माच्या विरोधात नाही आहोत, पण औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन कोणी जर तिथे फुल टाकत असेल तर लक्षात ठेवा, आमच्या संभाजी राजांनी औरंगजेबावर अशी परिस्थिती आणली की त्याचं थडग देखील याच महाराष्ट्रात तयार करावं लागलं. पण मराठ्यांना औरंगजेब कधी हरवू शकला नाही. त्या औरंग्याच्या थडग्यावर जाऊन त्या ठिकाणी जर तुम्ही नमस्कार करत असाल, आदाब करत असाल, तर हे आम्ही सहन करणार नाही." 

या देशात छत्रपती शिवाजी महाराजांनी जो स्वधर्म आम्हाला शिकवलाय, तोच चालणार - उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, "अरे आम्ही विकास करू, हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई, सगळ्यांचा विकास करू. पण तुम्ही, जर या ठिकाणी उलेमांच्या त्या ठिकाणी १७ मागण्या, काय मागण्या आहेत? वक्फ बोर्डाला हजार कोटी द्या, आमच्या लोकांना जे काही आमचे काजी आहेत त्यांना पगार द्या, १० टक्के मुस्लिमांना आरक्षण द्या, या १७ मागण्या, ज्या मागण्या देश हिताच्या मागण्या नाहीयेत." एवढेच नाही तर, "त्या मागण्यांवर जर या ठिकाणी काँग्रेस, उबाठा आणि शरद पवारांची पार्टी लेखी देत असेल आणि त्यांच्या पायावर लोटांगण घालत असेल आणि त्यांचे पाय चाटत असेल, तर आम्ही सहन करणार नाही. या देशामध्ये केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो स्वधर्म आम्हाला शिकवलाय, तोच चालणार आहे. मतांचं लांगुल चालन हे आम्ही चालू देणार नाही," अशा शब्दात फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही निशाणा साधला.

तर व्होटांचं धर्मयुद्ध आम्हाला करता येतं -"या ठिकाणी जर ते व्होट जिहादचा नारा देत असतील तर व्होटांचं धर्मयुद्ध आम्हाला करता येतं. व्होटांचं धर्मयुद्ध पुकारा आणि त्या धर्मयुद्धामध्ये आपल्याला माहिती आहे, पार्थाने सांगितलं होतं, जिथे सत्य आहे तिथेच विजय आहे. सत्य आपल्या बाजूने आहे आणि म्हणून विजय देखील आपल्याच बाजूने आहे. उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी मतांकरता लाचारी पत्करली असेल, अरे आम्ही हार पतकरू पण लाचारी पत्करणार नाही, आम्ही शिवबाची पोरं आहोत, शिवबाचे मावळे आहोत," असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेस