शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

...तर १९९६ मध्ये शरद पवार देशाचे पंतप्रधान झाले असते; प्रफुल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 21:13 IST

मला एका गोष्टीची खंत वाटते. शरद पवारांनीही ती खंत असेल अशी भावना राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशाचे माजी कृषीमंत्री असलेले शरद पवार यांच्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी गौप्यस्फोट केला आहे. १९९६ साली जर शरद पवारांनी ठोस भूमिका घेतली असती तर देशाला मराठी पंतप्रधान मिळाला असता असा दावा पटेल यांनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवार आणि पंतप्रधानपद याबाबत राजकीय चर्चेला उधाण आले आहे. 

प्रफुल पटेल म्हणाले की, मला एका गोष्टीची खंत वाटते. शरद पवारांनीही ती खंत असेल. १९९६ साली देवेगौडा यांचा पाठिंबा काँग्रेसकडून केसरींनी काढून घेतला. त्यावेळी काँग्रेस पक्षात जे वातावरण होते त्यात १०१ टक्के लोक शरद पवारांच्या पाठिशी उभे होते आणि त्यावेळी शरद पवारांनी ठाम राहून निर्णय घेतला असता तर देवेगौडा यांच्यानंतर आर.के गुजराल नव्हे तर शरद पवारच देशाचे पंतप्रधान झाले असते असं त्यांनी सांगितले. 

तसेच त्यावेळी आम्ही कुठेतरी कमी पडलो. केसरी यांनी लोकसभा निवडणुका होऊन अवघ्या अकराव्या महिन्यानंतर देवेगौडा यांचा पाठिंबा काढून घेतला. तेव्हा काँग्रेसची परिस्थितीही फार काही चांगली नव्हती. काँग्रेसचे १४५ खासदार होते आणि शरद पवार हे पक्षाचे संसदीय नेते होते. पाठिंबा काढून घेतल्यानंतर पुढे निवडणुका लागतील अशी परिस्थिती होती. कोणत्या खासदारांना ११ महिन्यानंतर निवडणुका परत हव्या होत्या? अचानक तुम्ही निवडणुकांना सामोरे गेले तर काय तुमची परिस्थिती राहणार आहे अशी भीती खासदारांना होती. निवडून येणार की नाही, पक्ष निवडून येणार की नाही असे बरेच प्रश्न होते. सीताराम केसरी यांनी कुठलाही विचार न करता स्वत:च्या मर्जीने सरकारचा पाठिंबा काढून घेतला. कदाचित मी स्वत: पंतप्रधान होईल असं केसरींना वाटले असावे असंही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सांगितले. 

शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणात आल्यापासून त्यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न जगजाहीर आहे. अनेकदा पंतप्रधानपदाची नावे पुढे आली तर त्यात शरद पवार हे नाव नक्कीच चर्चेत असते. काँग्रेस काळातही शरद पवार हे आघाडीचे नेते होते. देशात त्यांचे राजकीय वजन होते. परंतु कालांतराने सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्द्यावरून शरद पवारांनी काँग्रेसपासून वेगळी चूल मांडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. राष्ट्रवादी काँग्रेसची पकड महाराष्ट्रात मजबूत असली तरी इतर राज्यात राष्ट्रवादीला म्हणावं तेवढं वर्चस्व स्थापन करता आले नाही. त्यामुळे अद्यापही शरद पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही.   

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPraful Patelप्रफुल्ल पटेलcongressकाँग्रेस