शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

...तर १९९६ मध्ये शरद पवार देशाचे पंतप्रधान झाले असते; प्रफुल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 21:13 IST

मला एका गोष्टीची खंत वाटते. शरद पवारांनीही ती खंत असेल अशी भावना राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशाचे माजी कृषीमंत्री असलेले शरद पवार यांच्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी गौप्यस्फोट केला आहे. १९९६ साली जर शरद पवारांनी ठोस भूमिका घेतली असती तर देशाला मराठी पंतप्रधान मिळाला असता असा दावा पटेल यांनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवार आणि पंतप्रधानपद याबाबत राजकीय चर्चेला उधाण आले आहे. 

प्रफुल पटेल म्हणाले की, मला एका गोष्टीची खंत वाटते. शरद पवारांनीही ती खंत असेल. १९९६ साली देवेगौडा यांचा पाठिंबा काँग्रेसकडून केसरींनी काढून घेतला. त्यावेळी काँग्रेस पक्षात जे वातावरण होते त्यात १०१ टक्के लोक शरद पवारांच्या पाठिशी उभे होते आणि त्यावेळी शरद पवारांनी ठाम राहून निर्णय घेतला असता तर देवेगौडा यांच्यानंतर आर.के गुजराल नव्हे तर शरद पवारच देशाचे पंतप्रधान झाले असते असं त्यांनी सांगितले. 

तसेच त्यावेळी आम्ही कुठेतरी कमी पडलो. केसरी यांनी लोकसभा निवडणुका होऊन अवघ्या अकराव्या महिन्यानंतर देवेगौडा यांचा पाठिंबा काढून घेतला. तेव्हा काँग्रेसची परिस्थितीही फार काही चांगली नव्हती. काँग्रेसचे १४५ खासदार होते आणि शरद पवार हे पक्षाचे संसदीय नेते होते. पाठिंबा काढून घेतल्यानंतर पुढे निवडणुका लागतील अशी परिस्थिती होती. कोणत्या खासदारांना ११ महिन्यानंतर निवडणुका परत हव्या होत्या? अचानक तुम्ही निवडणुकांना सामोरे गेले तर काय तुमची परिस्थिती राहणार आहे अशी भीती खासदारांना होती. निवडून येणार की नाही, पक्ष निवडून येणार की नाही असे बरेच प्रश्न होते. सीताराम केसरी यांनी कुठलाही विचार न करता स्वत:च्या मर्जीने सरकारचा पाठिंबा काढून घेतला. कदाचित मी स्वत: पंतप्रधान होईल असं केसरींना वाटले असावे असंही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सांगितले. 

शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणात आल्यापासून त्यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न जगजाहीर आहे. अनेकदा पंतप्रधानपदाची नावे पुढे आली तर त्यात शरद पवार हे नाव नक्कीच चर्चेत असते. काँग्रेस काळातही शरद पवार हे आघाडीचे नेते होते. देशात त्यांचे राजकीय वजन होते. परंतु कालांतराने सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्द्यावरून शरद पवारांनी काँग्रेसपासून वेगळी चूल मांडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. राष्ट्रवादी काँग्रेसची पकड महाराष्ट्रात मजबूत असली तरी इतर राज्यात राष्ट्रवादीला म्हणावं तेवढं वर्चस्व स्थापन करता आले नाही. त्यामुळे अद्यापही शरद पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही.   

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPraful Patelप्रफुल्ल पटेलcongressकाँग्रेस