शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

...तर महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही; गडकरींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 16:40 IST

लोकमतचे नागपूर निवासी संपादक गजानन जानभोर यांनी नितीन गडकरी यांनी मुलाखत घेतली.

नागपूर : लोकांना स्वप्ने दाखविणे खूप सोपे आहे, जनता खूश होते; मात्र ही स्वप्ने पूर्ण न केल्यास जनता नाराज होते असे सांगत भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भविष्यात महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या करणार नसल्याचा दावा केला आहे. 

लोकमतचे नागपूर निवासी संपादक गजानन जानभोर यांनी नितीन गडकरी यांनी मुलाखत घेतली. यावेळी गडकरी यांनी नागपूरला जगातील सर्वात सुंदर शहर बनविण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच मी आवाक्याबाहेर लोकांना स्वप्ने दाखविली परंतू त्या स्वप्नांपेक्षा जास्त कामे केली. स्वप्ने कधी संपत नाहीत. एका मागोमाग एक पडत राहतात. यामुळे लोकांना स्वप्ने दाखविणे खूप सोपे आहे, जनता खूश होते; मात्र ही स्वप्ने पूर्ण न केल्यास जनता नाराज होते असे गडकरी यांनी सांगितले. 

याचबरोबर महाराष्ट्राला विविध जलसिंचन प्रकल्पांसाठी 1 लाख कोटी रुपये दिले आहेत. 20 हजार कोटी बळीराजा योजना, 50 टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण होऊनही बंद पडलेल्या 108 प्रकल्पांना निधी दिला, प्रधानमंत्री सिंचाई प्रकल्प 26 प्रकल्पांना असे मिळून 40 हजार कोटी दिले आहेत. तर तापी-नार-नर्मदा, दमनगंगा-पिंजर या दोन नद्याजोड प्रकल्पांना 60 हजार कोटींचा निधी दिला आहे. यामुळे गोदावरी डॅम पूर्ण भरेल. यामुळे सह्याद्रीच्या पठारावरून समुद्रात जाणारे पाणी मराठवाड्याला, जायकवाडी धरणाला मिळेल. जायकवाडी 80 टक्के भरणार आहे. यामुळे महाराष्ट्रात जलस्तर वाढेल आणि शेतकऱ्यांचे उत्पादन 2.5 पटींना वाढणार आहे. महाराष्ट्रामध्ये जलसिंचन 50 टक्क्यांवर जाईल तेव्हा एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा दावा गडकरी यांनी केला. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाnagpurनागपूर