शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

...तर महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही; गडकरींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 16:40 IST

लोकमतचे नागपूर निवासी संपादक गजानन जानभोर यांनी नितीन गडकरी यांनी मुलाखत घेतली.

नागपूर : लोकांना स्वप्ने दाखविणे खूप सोपे आहे, जनता खूश होते; मात्र ही स्वप्ने पूर्ण न केल्यास जनता नाराज होते असे सांगत भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भविष्यात महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या करणार नसल्याचा दावा केला आहे. 

लोकमतचे नागपूर निवासी संपादक गजानन जानभोर यांनी नितीन गडकरी यांनी मुलाखत घेतली. यावेळी गडकरी यांनी नागपूरला जगातील सर्वात सुंदर शहर बनविण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच मी आवाक्याबाहेर लोकांना स्वप्ने दाखविली परंतू त्या स्वप्नांपेक्षा जास्त कामे केली. स्वप्ने कधी संपत नाहीत. एका मागोमाग एक पडत राहतात. यामुळे लोकांना स्वप्ने दाखविणे खूप सोपे आहे, जनता खूश होते; मात्र ही स्वप्ने पूर्ण न केल्यास जनता नाराज होते असे गडकरी यांनी सांगितले. 

याचबरोबर महाराष्ट्राला विविध जलसिंचन प्रकल्पांसाठी 1 लाख कोटी रुपये दिले आहेत. 20 हजार कोटी बळीराजा योजना, 50 टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण होऊनही बंद पडलेल्या 108 प्रकल्पांना निधी दिला, प्रधानमंत्री सिंचाई प्रकल्प 26 प्रकल्पांना असे मिळून 40 हजार कोटी दिले आहेत. तर तापी-नार-नर्मदा, दमनगंगा-पिंजर या दोन नद्याजोड प्रकल्पांना 60 हजार कोटींचा निधी दिला आहे. यामुळे गोदावरी डॅम पूर्ण भरेल. यामुळे सह्याद्रीच्या पठारावरून समुद्रात जाणारे पाणी मराठवाड्याला, जायकवाडी धरणाला मिळेल. जायकवाडी 80 टक्के भरणार आहे. यामुळे महाराष्ट्रात जलस्तर वाढेल आणि शेतकऱ्यांचे उत्पादन 2.5 पटींना वाढणार आहे. महाराष्ट्रामध्ये जलसिंचन 50 टक्क्यांवर जाईल तेव्हा एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा दावा गडकरी यांनी केला. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाnagpurनागपूर