शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

...तर महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही; गडकरींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 16:40 IST

लोकमतचे नागपूर निवासी संपादक गजानन जानभोर यांनी नितीन गडकरी यांनी मुलाखत घेतली.

नागपूर : लोकांना स्वप्ने दाखविणे खूप सोपे आहे, जनता खूश होते; मात्र ही स्वप्ने पूर्ण न केल्यास जनता नाराज होते असे सांगत भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भविष्यात महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या करणार नसल्याचा दावा केला आहे. 

लोकमतचे नागपूर निवासी संपादक गजानन जानभोर यांनी नितीन गडकरी यांनी मुलाखत घेतली. यावेळी गडकरी यांनी नागपूरला जगातील सर्वात सुंदर शहर बनविण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच मी आवाक्याबाहेर लोकांना स्वप्ने दाखविली परंतू त्या स्वप्नांपेक्षा जास्त कामे केली. स्वप्ने कधी संपत नाहीत. एका मागोमाग एक पडत राहतात. यामुळे लोकांना स्वप्ने दाखविणे खूप सोपे आहे, जनता खूश होते; मात्र ही स्वप्ने पूर्ण न केल्यास जनता नाराज होते असे गडकरी यांनी सांगितले. 

याचबरोबर महाराष्ट्राला विविध जलसिंचन प्रकल्पांसाठी 1 लाख कोटी रुपये दिले आहेत. 20 हजार कोटी बळीराजा योजना, 50 टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण होऊनही बंद पडलेल्या 108 प्रकल्पांना निधी दिला, प्रधानमंत्री सिंचाई प्रकल्प 26 प्रकल्पांना असे मिळून 40 हजार कोटी दिले आहेत. तर तापी-नार-नर्मदा, दमनगंगा-पिंजर या दोन नद्याजोड प्रकल्पांना 60 हजार कोटींचा निधी दिला आहे. यामुळे गोदावरी डॅम पूर्ण भरेल. यामुळे सह्याद्रीच्या पठारावरून समुद्रात जाणारे पाणी मराठवाड्याला, जायकवाडी धरणाला मिळेल. जायकवाडी 80 टक्के भरणार आहे. यामुळे महाराष्ट्रात जलस्तर वाढेल आणि शेतकऱ्यांचे उत्पादन 2.5 पटींना वाढणार आहे. महाराष्ट्रामध्ये जलसिंचन 50 टक्क्यांवर जाईल तेव्हा एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा दावा गडकरी यांनी केला. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाnagpurनागपूर