शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

"...तेव्हा जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या पाया पडले"; मुश्रिफांनी भाषणात सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 20:51 IST

कोल्हापूरच्या सगळ्या उस्तादांना भेटायला एक वस्ताद आलाय, त्या वस्तादाचं नाव शरदचंद्र पवार साहेब, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती.

मुंबई/बीड - कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रस पक्षाची निर्धार सभा पार पडली. या सभेला खासदार शरद पवारांनी संबोधित केलं. या सभेतून शरद पवार यांनी अजित पवार गटावर थेट निशाणा साधला. तर, सभेत बोलत आमदार जितेंद्र आव्हाडांनीअजित पवार गटावर टीका करताना त्यांना गद्दार असं संबोधलं. तसेच, हसन मुश्रीफ यांच्यावरही हल्लाबोल केला होता. त्या सभेपासून आव्हाड आणि मुश्रीफ यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांमधील शाब्दीक चकमक पायतानापर्यंत येऊन पोहोचली होती. मात्र, बीडमधील सभेतून हसन मुश्रीफ यांनी मोठा गौप्यस्फोट केला. 

कोल्हापूरच्या सगळ्या उस्तादांना भेटायला एक वस्ताद आलाय, त्या वस्तादाचं नाव शरदचंद्र पवार साहेब, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती. तसेच, काहींच्या रक्तातच गद्दारी असते असा घणाघातही त्यांनी नाव न घेता अजित पवार गटावर केला होता. जे साप बिळात होते, ते बाहेर पडले आहेत. या सापांना चेचण्यासाठी आपल्याला पायतानाचा वापर करावा लागेल. कोल्हापुरात पायतान प्रसिद्घ आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राने करावा, असा टोलाही आव्हाडांनी लगावला होता. या टीकेनंतर हसन मुश्रीफ यांनी आव्हाडांवर पलटवार केला. कोल्हापूरच्या कपाशीचं पायताना बसल्यावर त्याला कळेल, असे म्हटले. त्यानंतर, आता पुन्हा एकदा आव्हाड यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

बीडमधील सभेत जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना हसन मुश्रीफ यांनी गौप्यस्फोटच केला. यावेळी, जयंत पाटील यांनी ही घटना मला सांगितल्याचा संदर्भही मुश्रीफ यांनी दिला. एकनाथ शिंदे गुवाहटीला गेल्यानंतर भाजपासोबत जाण्यासाठी राष्ट्रवादीच्या ५३ आमदारांनी पत्रावर सह्या केल्या होत्या, तेव्हा आव्हाड यांनी कशी सही केली? असा प्रश्न मुश्रीफ यांनी बीडमधील सभेतून विचारला. तसेच, मला तर थक्क करणारी एक घटना जयंत पाटील यांनी सांगितली. ठाण्यामध्ये एकदा जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यावर अजित दादा विरोधी पक्षनेते होते, तेव्हा अजित दादांना आणि जयंत पाटलांना घेऊन ते अध्यक्षांच्या दालनात गेले होते. तेथे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. त्यावेळी, ते देवेंद्र फडणवीसांच्या पाया पडले आणि म्हणाले की मी आता विधानसभेची निवडणूक लढवणार नाही. मला विधानपरिषदेवर दादांनी पाठवावं, असा गौप्यस्फोटच हसन मुश्रीफ यांनी बीडमधील सभेत केला. तसेच, असा भेकड माणूस व्यासपीठावरुन काहीही बोलतो आणि साहेब त्याचं ऐकतात हे आश्चर्यं वाटतं, असेही मुश्रीफ यांनी म्हटलं.  

चप्पल बसली की कळेल

जितेंद्र आव्हाड मला फार ज्युनियर आहेत. त्यांनी पवार साहेबांवर काय जादू केली, मला माहित नाही. त्यांनी ठाण्यात पक्ष संपविण्याचं काम केलं. अजित पवार आणि आमच्याविषयी त्यांनी असं बोलायला नको. आम्ही सत्तेत जाण्यासाठी शरद पवारांना पत्र दिलं होतं. त्यात ५३ स्वाक्षऱ्या होत्या. त्यात त्यांचीही स्वाक्षरी होती. तेव्हा कुठं गेला होता तुझा धर्म असा सवाल करत मुश्रीफ म्हणाले, कोल्हापुरात चप्पल प्रसिद्ध नाही, कापशीची चप्पल प्रसिद्ध आहे. ती बसली की त्यांना कळेल, अशा जशास तसा टोला मुश्रीफ यांनी लगावला होता. त्यानंतर, पुन्हा ट्विट करुन आव्हाड यांनी हसन मुश्रीफ अस्वस्थ झाल्याचं म्हटलं आहे.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारJitendra Awhadजितेंद्र आव्हाडHasan Mushrifहसन मुश्रीफNCPराष्ट्रवादी काँग्रेस