शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

"...तेव्हा जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या पाया पडले"; मुश्रिफांनी भाषणात सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 20:51 IST

कोल्हापूरच्या सगळ्या उस्तादांना भेटायला एक वस्ताद आलाय, त्या वस्तादाचं नाव शरदचंद्र पवार साहेब, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती.

मुंबई/बीड - कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रस पक्षाची निर्धार सभा पार पडली. या सभेला खासदार शरद पवारांनी संबोधित केलं. या सभेतून शरद पवार यांनी अजित पवार गटावर थेट निशाणा साधला. तर, सभेत बोलत आमदार जितेंद्र आव्हाडांनीअजित पवार गटावर टीका करताना त्यांना गद्दार असं संबोधलं. तसेच, हसन मुश्रीफ यांच्यावरही हल्लाबोल केला होता. त्या सभेपासून आव्हाड आणि मुश्रीफ यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांमधील शाब्दीक चकमक पायतानापर्यंत येऊन पोहोचली होती. मात्र, बीडमधील सभेतून हसन मुश्रीफ यांनी मोठा गौप्यस्फोट केला. 

कोल्हापूरच्या सगळ्या उस्तादांना भेटायला एक वस्ताद आलाय, त्या वस्तादाचं नाव शरदचंद्र पवार साहेब, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती. तसेच, काहींच्या रक्तातच गद्दारी असते असा घणाघातही त्यांनी नाव न घेता अजित पवार गटावर केला होता. जे साप बिळात होते, ते बाहेर पडले आहेत. या सापांना चेचण्यासाठी आपल्याला पायतानाचा वापर करावा लागेल. कोल्हापुरात पायतान प्रसिद्घ आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राने करावा, असा टोलाही आव्हाडांनी लगावला होता. या टीकेनंतर हसन मुश्रीफ यांनी आव्हाडांवर पलटवार केला. कोल्हापूरच्या कपाशीचं पायताना बसल्यावर त्याला कळेल, असे म्हटले. त्यानंतर, आता पुन्हा एकदा आव्हाड यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

बीडमधील सभेत जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना हसन मुश्रीफ यांनी गौप्यस्फोटच केला. यावेळी, जयंत पाटील यांनी ही घटना मला सांगितल्याचा संदर्भही मुश्रीफ यांनी दिला. एकनाथ शिंदे गुवाहटीला गेल्यानंतर भाजपासोबत जाण्यासाठी राष्ट्रवादीच्या ५३ आमदारांनी पत्रावर सह्या केल्या होत्या, तेव्हा आव्हाड यांनी कशी सही केली? असा प्रश्न मुश्रीफ यांनी बीडमधील सभेतून विचारला. तसेच, मला तर थक्क करणारी एक घटना जयंत पाटील यांनी सांगितली. ठाण्यामध्ये एकदा जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यावर अजित दादा विरोधी पक्षनेते होते, तेव्हा अजित दादांना आणि जयंत पाटलांना घेऊन ते अध्यक्षांच्या दालनात गेले होते. तेथे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. त्यावेळी, ते देवेंद्र फडणवीसांच्या पाया पडले आणि म्हणाले की मी आता विधानसभेची निवडणूक लढवणार नाही. मला विधानपरिषदेवर दादांनी पाठवावं, असा गौप्यस्फोटच हसन मुश्रीफ यांनी बीडमधील सभेत केला. तसेच, असा भेकड माणूस व्यासपीठावरुन काहीही बोलतो आणि साहेब त्याचं ऐकतात हे आश्चर्यं वाटतं, असेही मुश्रीफ यांनी म्हटलं.  

चप्पल बसली की कळेल

जितेंद्र आव्हाड मला फार ज्युनियर आहेत. त्यांनी पवार साहेबांवर काय जादू केली, मला माहित नाही. त्यांनी ठाण्यात पक्ष संपविण्याचं काम केलं. अजित पवार आणि आमच्याविषयी त्यांनी असं बोलायला नको. आम्ही सत्तेत जाण्यासाठी शरद पवारांना पत्र दिलं होतं. त्यात ५३ स्वाक्षऱ्या होत्या. त्यात त्यांचीही स्वाक्षरी होती. तेव्हा कुठं गेला होता तुझा धर्म असा सवाल करत मुश्रीफ म्हणाले, कोल्हापुरात चप्पल प्रसिद्ध नाही, कापशीची चप्पल प्रसिद्ध आहे. ती बसली की त्यांना कळेल, अशा जशास तसा टोला मुश्रीफ यांनी लगावला होता. त्यानंतर, पुन्हा ट्विट करुन आव्हाड यांनी हसन मुश्रीफ अस्वस्थ झाल्याचं म्हटलं आहे.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारJitendra Awhadजितेंद्र आव्हाडHasan Mushrifहसन मुश्रीफNCPराष्ट्रवादी काँग्रेस