शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

"...तर मी उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्षप्रमुख म्हणून शुभेच्छा दिल्या असत्या’’, रामदास कदम यांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 14:07 IST

Ramdas Kadam Criticize Uddhav Thackeray: रांमदास कदम म्हणाले की, मी उद्धव ठाकरेंना माजी मुख्यमंत्री म्हणूनच शुभेच्छा देईन, कारण त्यांनी शरद पवारांचं नेतृत्व सोडून बाळासाहेबांच्या विचारांचं नेतृत्व ठेवलं असतं तर त्यांना मी निश्चितपणे शिवसेनेचे प्रमुख म्हटलं असतं.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचां आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना विविध क्षेत्रातून शुभेच्छा देण्यात येत आहेत. दरम्यान, शिवसेनेत बंडखोरी करून वेगळा झालेल्या शिंदे गटाच्या नेत्यांकडूनही उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेला. तर शिवसेनेचे कोकणातील बंडखोर नेते असलेल्या रामदास कदम यांनीही उद्धव ठाकरे यांना खोचक भाषेत शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र मी उद्धव ठाकरे यांना माजी मुख्यमंत्री म्हणूनच शुभेच्छा देईन, असे रामदास कदम म्हणाले.

''मी उद्धव ठाकरेंना माजी मुख्यमंत्री म्हणूनच शुभेच्छा देईन, कारण त्यांनी शरद पवारांचं नेतृत्व सोडून बाळासाहेबांच्या विचारांचं नेतृत्व ठेवलं असतं तर त्यांना मी निश्चितपणे शिवसेनेचे प्रमुख म्हटलं असतं. मात्र आज ते बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून काम पाहत नाहीत, तर ते शरद पवार यांच्या मांडीवर बसून त्यांच्या विचारांशी सहमत होऊन काम करताहेत. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमाई, बाळासाहेबांच्या पाठीत खंजिर खुपसण्याचं काम, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी ही दुर्दैवाने उद्धव ठाकरेंकडून झाली आहे, अशी खरमरीत टीका रामदास कदम यांनी केली.

सध्या उद्धव ठाकरे महाराष्ट्रात अमूक गद्दार, तमूक हरामखोर ही भाषा वापरत आहेत. ही भाषा वापरण्यापेक्षा स्वत:चं आत्मपरीक्षण करून बघा. कोण गद्दार आहे याचं आत्मपरीक्षण तुम्ही करून बघा. ५१ आमदार का जातात, १२-१४ खासदार का जातात, शेकडो नगरसेवक का जातात, आज माझ्या खेडमधील पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. हकालपट्टीशिवाय दुसरं काम काय सुरू आहे. फक्त शिवसैनिकांना भावनात्मक ब्लॅकमेल करायचं, आवाहन करायचं एवढंच काम सुरू आहे. तीन वर्षांत आमदारांना भेटले असते तर ही वेळ आली नसती, असा टोला रामदास कदम यांनी लगावला.

तुम्ही आजारी होतात, पण आदित्य ठाकरे तर आजारी नव्हते ना. आदित्य ठाकरेंना स्वत:चं खातं राहिलं बाजूला इतरांची खाती पाहायची आहेत.त्यांना आमदारांना भेटायचं नव्हतं, खासदारांना भेटायचं नव्हतं. आज तुमच्या जनसंवाद यात्रा निघताहेत, शिवसेना भवनचे मातोश्रीचे दरवाजे उघडे ठेवले जाताहेत. पण हेच जर तीन वर्षे आधी केलं असतं तर ही वेळ आली नसती, असा चिमटा रामदास कदम यांनी काढला.

तसेच उद्धव ठाकरेंच्या सामनामध्ये झालेल्या मुलाखतीवरही रामदास कदम यांनी टीका केली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंची कालची मुलाखत म्हणजे उंदराला मांजर साक्षी. संजय राऊत प्रश्न विचारणार आणि तुम्ही उत्तरं देणार. हे सगळं हास्यास्पद आहे. बरं त्यात नवीन काय होतं. ती गंजलेली तलवार, आईचं दूध, शिवसेना आई होती, बाळासाहेबांची शिवसेना आई होती. बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत, बाळासाहेबांच्या विचारांसोबत गद्दारी कुणी केली, हे तुम्ही सांगा ना. आईच्या दुधाची आठवण तुम्ही ठेवताय, तर मग शिवसेनेची आई बाळासाहेबांचे विचार होते. मग बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी तुम्ही केली. हे बाकीच्यांना ठीक आहे, नवीन शिवसैनिक, तरुण पिढी या भावनिक ब्लॅकमेलमध्ये थोडे अडकतील, पण जुन्या शिवसैनिकांनी अनुभव घेतलाय, असा टोला रामदास कदम यांनी लगावला. 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे