शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

...मग मुख्यमंत्री काय वडिलांची इच्छा पूर्ण करायला झालात का?; चंद्रकांत पाटलांचा घणाघात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 16:58 IST

स्व. बाळासाहेब ठाकरेंनी कधीही पद घेतले नाही, त्यांनी ठरविले असते तर राष्ट्रपतीसुद्धा त्यांना बनता आलं असतं.

पुणे - राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्रिपद मिळविले त्यामुळे भाजपाला सत्तेपासून दूर राहावं लागलं. विरोधी पक्षातील भाजपाने आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारवर विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी झालात का? असा सवाल केला आहे. 

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एका कार्यक्रमात सांगतात, साखरेचा विषय आला तर मी जयंत पाटलांकडे पाहतो, महसूलचा विषय आला तर मी बाळासाहेब थोरातांकडे पाहतो. मग तुम्ही काय करता? केवळ वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री झालात का? मग राज्याला असा मुख्यमंत्री चालणार का? अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीका केली. 

तसेच अवेळी पावसाच्यावेळी ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, बांध काय आहे हे तुम्हाला कळतं नाही, एकर, हेक्टर याचा फरक माहित नाही. हेक्टर म्हणजे काय? एका हेक्टरमध्ये किती एकर, एक एकरात किती गुंठे अन् एका गुंठ्यात किती चौरस फूट जागा असते हे पहिलं सांगा. एमएसपी, एफआरपी हे सुद्धा कळत नाही. कोणत्याही प्रश्नांची उत्तरे माहिती नाही असा घणाघात भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला. 

दरम्यान, स्व. बाळासाहेब ठाकरेंनी कधीही पद घेतले नाही, त्यांनी ठरविले असते तर राष्ट्रपतीसुद्धा त्यांना बनता आलं असतं. पहिल्यांदाच आमदार झालेल्यांना कोणताही अनुभव नसताना थेट कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं त्यावरुन चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली. सत्तेसाठी सरकारने नीतीमुल्ये सोडली आहेत. जनतेच्या प्रश्नांचे त्यांना काही पडलेले नाही. सत्तावाटपात १५ मंत्रिपदे आली त्यातील ३ घटकपक्षांना दिली. उरलेल्या १२ मंत्रिपदातही स्वत:च्या घरात २ मंत्रिपदं घेतली. उरलेल्या १० जणांना सगळ्यांना सामावून घेता येत नाही म्हणून ज्येष्ठ नेत्यांना घरी पाठविले अशी टीका चंदकांत पाटील यांनी शिवसेनेवर केली. 

महत्त्वाच्या बातम्या 

शिवसेनेकडे एकनाथ खडसेंना द्यायला आहे तरी काय? चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

खासदारांसमोरच आंदोलक महिलांच्या नदीत उड्या; सर्वांचीच उडाली तारांबळ!

नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत की पाकिस्तानचे राजदूत?; ममता बॅनर्जींनी केला सवाल 

'आयुष्यमान भारत' योजनेत मोठा घोटाळा उघडकीस; गुजरातमध्ये एकाच कुटुबांला दिले १७०० आरोग्य कार्ड

शिवसेना भगव्यात नाही, काँग्रेसच्या रंगात रंगलीय; नितीन गडकरींची टीका

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेchandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv SenaशिवसेनाBJPभाजपा