शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

...मग मुख्यमंत्री काय वडिलांची इच्छा पूर्ण करायला झालात का?; चंद्रकांत पाटलांचा घणाघात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 16:58 IST

स्व. बाळासाहेब ठाकरेंनी कधीही पद घेतले नाही, त्यांनी ठरविले असते तर राष्ट्रपतीसुद्धा त्यांना बनता आलं असतं.

पुणे - राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्रिपद मिळविले त्यामुळे भाजपाला सत्तेपासून दूर राहावं लागलं. विरोधी पक्षातील भाजपाने आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारवर विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी झालात का? असा सवाल केला आहे. 

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एका कार्यक्रमात सांगतात, साखरेचा विषय आला तर मी जयंत पाटलांकडे पाहतो, महसूलचा विषय आला तर मी बाळासाहेब थोरातांकडे पाहतो. मग तुम्ही काय करता? केवळ वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री झालात का? मग राज्याला असा मुख्यमंत्री चालणार का? अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीका केली. 

तसेच अवेळी पावसाच्यावेळी ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, बांध काय आहे हे तुम्हाला कळतं नाही, एकर, हेक्टर याचा फरक माहित नाही. हेक्टर म्हणजे काय? एका हेक्टरमध्ये किती एकर, एक एकरात किती गुंठे अन् एका गुंठ्यात किती चौरस फूट जागा असते हे पहिलं सांगा. एमएसपी, एफआरपी हे सुद्धा कळत नाही. कोणत्याही प्रश्नांची उत्तरे माहिती नाही असा घणाघात भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला. 

दरम्यान, स्व. बाळासाहेब ठाकरेंनी कधीही पद घेतले नाही, त्यांनी ठरविले असते तर राष्ट्रपतीसुद्धा त्यांना बनता आलं असतं. पहिल्यांदाच आमदार झालेल्यांना कोणताही अनुभव नसताना थेट कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं त्यावरुन चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली. सत्तेसाठी सरकारने नीतीमुल्ये सोडली आहेत. जनतेच्या प्रश्नांचे त्यांना काही पडलेले नाही. सत्तावाटपात १५ मंत्रिपदे आली त्यातील ३ घटकपक्षांना दिली. उरलेल्या १२ मंत्रिपदातही स्वत:च्या घरात २ मंत्रिपदं घेतली. उरलेल्या १० जणांना सगळ्यांना सामावून घेता येत नाही म्हणून ज्येष्ठ नेत्यांना घरी पाठविले अशी टीका चंदकांत पाटील यांनी शिवसेनेवर केली. 

महत्त्वाच्या बातम्या 

शिवसेनेकडे एकनाथ खडसेंना द्यायला आहे तरी काय? चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

खासदारांसमोरच आंदोलक महिलांच्या नदीत उड्या; सर्वांचीच उडाली तारांबळ!

नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत की पाकिस्तानचे राजदूत?; ममता बॅनर्जींनी केला सवाल 

'आयुष्यमान भारत' योजनेत मोठा घोटाळा उघडकीस; गुजरातमध्ये एकाच कुटुबांला दिले १७०० आरोग्य कार्ड

शिवसेना भगव्यात नाही, काँग्रेसच्या रंगात रंगलीय; नितीन गडकरींची टीका

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेchandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv SenaशिवसेनाBJPभाजपा