शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

वाघ आला रे आला, वस्तीत वाजणार सायरन ! हल्ले रोखण्यासाठी जंगलांबाहेर अदृश्य कुंपण देणार माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 08:11 IST

Tiger: वाघांच्या हल्ल्यात सहा वर्षांत २५० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. वाघांकडून दिवसाआड एका तरी व्यक्तीवर हल्ला होत असल्याची वन क्षेत्रात राहणाऱ्या गावकऱ्यांची तक्रार आहे.

मुंबई : वाघांच्या हल्ल्यात सहा वर्षांत २५० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. वाघांकडून दिवसाआड एका तरी व्यक्तीवर हल्ला होत असल्याची वन क्षेत्रात राहणाऱ्या गावकऱ्यांची तक्रार आहे. हे रोखण्यासाठी आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची मदत घेतली जाणार आहे. वस्तीच्या आसपास वाघ येताच गावकऱ्यांना अलर्ट करण्यासाठी सायरन वाजणार आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाजवळील दोन गावांत अशा प्रकारचे सायरन बसवण्यात येत आहेत.नुकतीच व्याघ्र गणना जाहीर झाली, त्यात महाराष्ट्रात ४०० च्या आसपास वाघ वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. ही संख्या वाढत असतानाच त्यांचा मानवाशी होणारा संघर्षही वाढीस लागला आहे. 

विधिमंडळाच्या अधिवेशनातही याचे पडसाद उमटले होते. सातारा सांगलीपासून विदर्भातील लोकप्रतिनिधींनी वाघ-बिबट्यांच्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली होती. सांगली जिल्ह्यातील वाळवा व शिराळा तालुक्यात गेल्या काही दिवसांत ५०० पेक्षा अधिक गाई-गुरांना बिबट्याने ठार केल्याची आकडेवारी आहे.  ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सुमारे ८६ वाघ आहेत, चंद्रपूरमध्ये ११७ तर गडचिरोलीत २७ वाघ आहेत. 

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेंतर्गत ३७६ कोटी खर्चचंद्रपूर जिल्ह्यात मानव वाघांच्या वाढत्या संघर्षावर मुख्य वन संरक्षकांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती नेमण्यात आली. त्यात वनांवरील गावकऱ्यांचे अवलंबन कमी करण्यास सुचवण्यात आले. त्याशिवाय डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेंतर्गत गावकऱ्यांना घरगुती गॅस, सौरऊर्जा उपकरणे, सौरऊर्जा कुंपण पुरवण्यासाठी आतापर्यंत ३७६ कोटी ७८ लाख रुपये खर्च करण्यात आले.

अदृष्य कुंपण असे करेल काम n आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा आधार घेत वाघांच्या आगमनाची सूचना देणारी यंत्रणा लावण्यात येत आहे. n यासाठी जंगलाबाहेर अदृश्य कुंपण उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये थर्मल लहरींचा वापर केला जाईल. n यातून वाघ-बिबट्या जाताच त्यांच्या आगमनाचा इशारा गावकऱ्यांना मिळेल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

टॅग्स :TigerवाघforestजंगलMaharashtraमहाराष्ट्र