शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

हवामान बदलाचा धाेका; राज्य उष्णतेच्या फेऱ्यांत, मार्चच्या मध्यातच तापमानाचा पारा ४० अंशांच्या पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 08:16 IST

राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आणि तेलंगणाच्या लगतच्या भागात तापमान ४० अंशांवर पोहोचले आहे. मुंबईसह राज्यभरात वाढत्या पाऱ्याने नागरिकांना घाम फोडला असून, मार्चच्या मध्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या पार गेला.

मुंबई : राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आणि तेलंगणाच्या लगतच्या भागात तापमान ४० अंशांवर पोहोचले आहे. मुंबईसह राज्यभरात वाढत्या पाऱ्याने नागरिकांना घाम फोडला असून, मार्चच्या मध्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या पार गेला. एप्रिल व मे महिन्यात यात आणखी भर पडणार असून, त्यामुळे तूर्तास तरी उष्णतेपासून दिलासा मिळण्याची आशा नाही.

मुंबईकरांनी १३ ते १७ मार्च असे पाच दिवस कडक उन्हात काढले. मुंबईत २३ मार्च रोजी कमाल तापमान ३८.२ अंशांवर पोहोचल्याने उष्मा पुन्हा शिगेला पोहोचला. उत्तर-पश्चिम मैदानी भागातही पारा वाढत आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेने जमीन तापत आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगराळ राज्यांमध्येही उष्णता जाणवत आहे. राजस्थान आणि लगतच्या पाकिस्तानमध्ये अडथळा नसल्यामुळे उबदार वारे उत्तर आणि मध्य भारताकडे सरकत आहेत. वारा आणि कोरडे हवामान वायव्य भारतात पुन्हा एकदा तापमान वाढवेल. ज्यामुळे उष्णतेची लाट निर्माण होईल. हळूहळू उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसून येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मार्चच्या अखेरीस मध्य आणि उत्तर-पश्चिम भारताच्या काही भागांमध्ये उष्णतेचा तडाखा बसेल, अशी अपेक्षा होती. परंतु ती इतक्या लवकर असे होईल, अशी अपेक्षा नव्हती. पण हे आश्चर्यकारक नाही. कारण गेल्या काही वर्षांत आपण दिवसाच्या तापमानात हळूहळू वाढ होत असल्याचे पाहत आहोत. कमाल तापमान विक्रम मोडत आहे व जागतिक तापमानात वाढ होत आहे.- महेश पलावत, हवामानशास्त्र, स्कायमेट वेदर 

उष्णतेचे परिणाम कोणत्याही एका शहरात समान प्रमाणात जाणवत नाहीत. ज्या लोकांना सेल्फ-कूलिंग उपकरणे उपलब्ध नाहीत किंवा ज्यांना बाहेर काम करावे लागते, जसे की मजूर, रस्त्यावरील विक्रेते. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की तीव्र उष्णतेच्या लाटांवरील उपायांचेही भिन्न परिणाम होऊ शकतात. म्हणून अति उष्णतेचे विषम परिणाम लक्षात ठेवणे गरजेचे आहे.- डॉ. चांदनी सिंग, वरिष्ठ संशोधक, इंडियन इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन सेटलमेंट्स

टॅग्स :weatherहवामानMaharashtraमहाराष्ट्र