शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

"... दिलेलं आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकलं पाहिजे," मराठा आरक्षणावरून अजित पवार यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 08:36 IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा वेळा दिला असून आता त्यांनी राज्यात दौरा सुरू केलाय. दुसरीकडे आरक्षणासाठी सरकारनं स्थापन केलेल्या समितीनंही काम सुरू केलं आहे. राज्यभरात कुणबी नोंद असलेले कागपत्रांची शोध मोहिम सुरू केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणावर भाष्य करताना दिलेलं आरक्षण कायद्याच्या, नियमांच्या चौकटीत टिकलं पाहिजे असं म्हटलं."प्रत्येकाला आपल्या समाजाकरिता आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. याबद्दल कोणतंही दुमत नाही. ते देताना ते कायद्याच्या, नियमाच्या चौकटीत टिकलं पाहिजे. यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं होतं. त्यावेळी आम्हीही मंत्रिमंडळात होतो. परंतु दुर्देवानं ते उच्च न्यायालयात टिकलं नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं. त्यांनी आरक्षण दिलं. ते उच्च न्यायालयात टिकलं, पण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही," असं अजित पवार म्हणाले. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतीथीनिमित्त कराडच्या प्रीतिसंगमावरील समाधीला अभिवादन केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरही भाष्य केलं."त्या घटकाला, समाजाला असं वाटतं की आम्हाला राज्यकर्ते खेळवतायत की काय? जे निर्णय घेतायत त्यांच्याबद्दलही समज गैरसमज निर्माण होतात. काहींनी त्याच्याबद्दल वक्तव्य केल्यावर नव्या पिढीच्या मनात वेगळी भावना वाढीला लागते. आज अनेक समाज पुढे आले आहेत. राज्याचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांनी त्यंच्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण देणारच असं म्हटलं," असं त्यांनी नमूद केलं.त्यांनी काही समित्याही नेमल्या आहेत. मागास आयोगालाही सांगण्यात आलंय. कशाप्रकारे हा समाज मागासलेला आहे हे मागास आयोगालाही ते सिद्ध करावं लागतं. इतरही निराळ्या समाजांची मागणी आहे. धनगर समाजाचीही मागणी आहे. जेव्हा ही मागणी पुढे येते तेव्हा आदिवासी समाजाची त्यात वेगळी भूमिका आहे. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. परंतु तो मांडत असताना कटुता होऊ, चीड, समज गैरसमज निर्माण होऊ नये याबद्दलची काळजी सर्वांनी घ्यावी अशी विनंतही त्यांनी केली. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaratha Reservationमराठा आरक्षण