शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

"... दिलेलं आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकलं पाहिजे," मराठा आरक्षणावरून अजित पवार यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 08:36 IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा वेळा दिला असून आता त्यांनी राज्यात दौरा सुरू केलाय. दुसरीकडे आरक्षणासाठी सरकारनं स्थापन केलेल्या समितीनंही काम सुरू केलं आहे. राज्यभरात कुणबी नोंद असलेले कागपत्रांची शोध मोहिम सुरू केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणावर भाष्य करताना दिलेलं आरक्षण कायद्याच्या, नियमांच्या चौकटीत टिकलं पाहिजे असं म्हटलं."प्रत्येकाला आपल्या समाजाकरिता आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. याबद्दल कोणतंही दुमत नाही. ते देताना ते कायद्याच्या, नियमाच्या चौकटीत टिकलं पाहिजे. यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं होतं. त्यावेळी आम्हीही मंत्रिमंडळात होतो. परंतु दुर्देवानं ते उच्च न्यायालयात टिकलं नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं. त्यांनी आरक्षण दिलं. ते उच्च न्यायालयात टिकलं, पण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही," असं अजित पवार म्हणाले. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतीथीनिमित्त कराडच्या प्रीतिसंगमावरील समाधीला अभिवादन केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरही भाष्य केलं."त्या घटकाला, समाजाला असं वाटतं की आम्हाला राज्यकर्ते खेळवतायत की काय? जे निर्णय घेतायत त्यांच्याबद्दलही समज गैरसमज निर्माण होतात. काहींनी त्याच्याबद्दल वक्तव्य केल्यावर नव्या पिढीच्या मनात वेगळी भावना वाढीला लागते. आज अनेक समाज पुढे आले आहेत. राज्याचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांनी त्यंच्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण देणारच असं म्हटलं," असं त्यांनी नमूद केलं.त्यांनी काही समित्याही नेमल्या आहेत. मागास आयोगालाही सांगण्यात आलंय. कशाप्रकारे हा समाज मागासलेला आहे हे मागास आयोगालाही ते सिद्ध करावं लागतं. इतरही निराळ्या समाजांची मागणी आहे. धनगर समाजाचीही मागणी आहे. जेव्हा ही मागणी पुढे येते तेव्हा आदिवासी समाजाची त्यात वेगळी भूमिका आहे. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. परंतु तो मांडत असताना कटुता होऊ, चीड, समज गैरसमज निर्माण होऊ नये याबद्दलची काळजी सर्वांनी घ्यावी अशी विनंतही त्यांनी केली. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaratha Reservationमराठा आरक्षण