शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

मराठी भाषा स्वतंत्र नसल्याचा अहवालात उल्लेख; संस्कृत ही मराठीची बहीण आहे असा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 06:27 IST

नेमक्या त्रुटींवर इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी ठेवले बोट

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: केंद्र शासनाला २०१३ साली अभिजात भाषेच्या दर्जासंदर्भात अहवाल सादर केला होता. मात्र, याला अकरा वर्षे उलटूनही अजूनही हा प्रस्ताव प्रलंबित आहे. या प्रस्तावातून अभिजात दर्जासंदर्भातील निकषांची पूर्तता होत नाही, असे म्हणत असताना त्यात नेमक्या त्रुटींवर इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी बोट ठेवले आहे. संस्कृत ही मराठीची बहीण आहे असा दावा या अहवालात आला असल्याने तेथेच मराठीचे अभिजत्व रद्द होते. त्यामुळे मराठी भाषा स्वतंत्र असूनही तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकत नसल्याचे म्हटले आहे.

तसेच, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिजात दर्जा पाठपुरावा समितीला पत्र लिहून अहवालात बदल करण्याचीही मागणी केली आहे. आर्यावांश सिद्धांतासारखाच असलेला इंडो-युरोपियन भाषा समूह सिद्धांत गृहीत धरून मराठीला मिडल इंडो-युरोपियन गटात टाकून मराठीला संस्कृतपेक्षा दुय्यम स्थान दिले गेले आहे. इसवी सन चारमध्येच विमल सुरी यांनी “पउमचरिय” हे रामावरील आद्य महाकाव्य महाराष्ट्री प्राकृतात लिहिले. या राष्ट्रीय संस्कृतीत मोलाची भर घालणाऱ्या रामावरील आद्य महाकाव्याचा फक्त ओझरता उल्लेख या अहवालात केला गेला आहे.  मौलिक साहित्य हा अभिजात भाषेचा महत्त्वाचा निकष असताना हे महत्त्वाचे साहित्य विवेचनातून सुटावे व ओझरती दखल घेतली जावी हे दुर्दैवी आहे. माहाराष्ट्री (मराठी) भाषेचे वय हे किमान तीन हजार वर्षे एवढे येते, ही बाब अहवालात नमूद नाही.

भाषेचा प्रवास नेमका कसा होतो, लोक सुलभीकरणासाठी उच्चार कालौघात कसे बदलत नेतात, जीवन व्यवहारातील गुंतागुंत वाढते तशी भाषेचीही गुंतागुंत कशी वाढते व नवे शब्द कसे उदयाला येतात अथवा अर्थबदल करून परभाषेतून कसे स्वीकारले जातात, या भाषाशास्त्रीय प्रक्रियेचा व त्यांना असलेला भौगोलिक संदर्भांचा कसलाही आधार या अहवालात घेतला गेला नाही. मराठी भाषा अभिजात कशी हे सिद्ध करण्यात हा अहवाल कमी पडतो असे मत आहे. या काही बाबी  अहवालात आहेत, ज्या दुरुस्त करण्याची नितांत आवश्यकता आहे.-संजय सोनवणी, इतिहास संशोधक

टॅग्स :marathiमराठीEknath Shindeएकनाथ शिंदेCentral Governmentकेंद्र सरकार