शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: सर्वोच्च न्यायालय सत्तासंघर्षाचा चेंडू दुसरीकडे भिरकावण्याची शक्यता; उज्ज्वल निकमांचे स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 16:17 IST

उद्या निकाल असेल तर आज सायंकाळी समजणार... उज्ज्वल निकमांनी मोजल्या उणिवा... याचिकांवर याचिका, सत्तासंघर्षाची खिचडी झाली; उज्ज्वल निकम म्हणाले सर्वोच्च न्यायालयही अंधारात

घटनापीठातील एक न्यायामूर्ती १५ मे रोजी निवृत्त होत आहेत. यामुळे परवापर्यंत हा निकाल नक्कीच लागलेला असेल. उद्या जर निकाल असेल तर आज सायंकाळी समजणार आहे. सर्वोच्च न्यायालया नोटीशीद्वारे ते जाहीर करत असते. आजच्या नोटीशीमध्ये आले नाही तर परवापर्यंत निकाल निश्चितच लागेल, असा अंदाज प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला आहे. 

१६ आमदार अपात्र ठरले तर कोणालाच बहुमत नाही; बापटांनी सांगितला 'त्यांच्या' मनातला निकाल

लोकमत व्हिडीओचे संपादक आशिष जाधव यांनी लोकमत डॉट कॉमवर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची मुलाखत घेतली. यामध्ये त्यांनी सुनावणी अद्याप अपुरीच असल्याचे सांगितले. माझे असे मत आहे की हा निकाल एकमताने येण्याची शक्यता कमी आहे. घटनापीठाने आठ ते नऊ याचिकांवर ऐकले. उपाध्यक्ष झिरवाळ यांना अधिकार नाही हा मुद्दा होता. राज्यपालांची कृती, नवीन अध्यक्षांची नियुक्ती, ठाकरे गटाचा व्हीप आदी याचिका एकमेकांत गुंतलेल्या आहेत. खिचडी आहे. ती वेगवेगळी कसे करते यावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असेल, असे निकम म्हणाले.

प्रमुख मुद्दा १६ आमदारांच्या अपात्रतेचा आहे. यावर सुनावणी झालेली नाही. फक्त बाजू मांडलेली आहे. शिंदे गट आपोआप अपात्र झालेत का, हे देखील पहावे लागेल. सर्वोच्च न्यायालय हा चेंडू आपल्या कोर्टात न ठेवता दुसरीकडे भिरकावण्याची शक्यता आहे. दोन न्यायमूर्ती असले तरी त्यांची मते वेगवेगळी असू शकतात, असे निकम म्हणाले. 

...तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतील; उल्हास बापटांचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी महत्वाचे विधान

जेव्हा विधानसभा अध्यक्ष नसतील तेव्हा त्यांचे अधिकार उपाध्यक्षांकडे वर्ग होतात. न्यायालयाने पक्षांतर बंदी कायदा लागू होतो, ते विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असे म्हटले तर नार्वेकरांकडे जाईल का, असा सवाल केला. यावर निकम यांनी झिरवाळ हे अध्यक्षपदाची धुरा सांभाळत होते. त्यांनी अपात्रतेची नोटीस पाठविली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालय काही निर्णय घेईल का, सर्वोच्च न्यायालय अध्यक्षांना निरीक्षणे नोंदवून त्यांना निर्णय घ्या असे सांगू शकते. आता तो नव्या अध्यक्षांकडे जातो, झिरवळांकडे की हंगामी अध्यक्षाकडे ते पहावे लागेल. हे एकमेकांत अ़डकलेले त्रांगडे आहे, असे म्हणाले.

पक्षविरोधी कारवाया झालेल्या आहेत, असे जर का घटनापीठाला वाटले आणि अपात्रतेची थेट कारवाई करत अध्यक्षांना अंमलबजावणी करण्यास सांगू शकते का, यावर त्यांनी नाही असे म्हटले. स्वायत्त संस्थांना दिलेला अधिकार न्यायालयाने परस्पर घेतला असा त्याचा अर्थ होईल. न्यायालय निरीक्षण नोंदवू शकते, पूर्णपणे विधिमंडळात हा प्रश्न टाकणार नाही, असे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालय यातून कसा मार्ग काढते ते पहावे लागेल. पक्षच हायजॅक झाला आणि आम्ही पक्ष फोडला नाही असे म्हणणे दाव्या परिशिष्ठला बगल दिलीय का, फक्त आमदारांचे बहुमत एका बाजुला असेल तर पक्षविरोधी कारवाया होऊ शकते का, मुळता दहावे परिशिष्ठ आज वाचले तर त्यात मोठ्या उणीवा आहेत हे दिसेल. महाराष्ट्राच्या निमित्ताने न्यायालयाला यावर काही कठोर निरीक्षणे नोंदवावी लागतील, यावर संसदेला विचार करावा लागेल, असे निकम म्हणाले. 

१६ आमदार अपात्र झाले तर उरलेल्या २४ जणांचे काय? उल्हास बापटांनी 'कायद्याचे राजकारण' सांगितले...

राज्यपालांच्या कृतीवर सरन्यायाधीशांनी तोंडी नाराजी व्यक्त केली आहे. मोठ्या खंडपीठाकडे हे प्रकरण जाण्याची शक्यता नाहीय. सर्वोच्च न्यायालयाने एकामागोमाग एक अशा आठ-नऊ याचिका दाखल करून घेतल्या. ती खिचडी झाली. तेव्हा कोणीच मुद्दा उचलला नाही. काही याचिका रद्द करायला हव्या होत्या. त्या केल्या नाहीत. यामुळे ते या विलंबाला जबाबदार आहेत. जेवढे सर्वोच्च न्यायालय अंधारात आहे, तेवढाच मी देखील आहे, असे निकम म्हणाले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना