शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: सर्वोच्च न्यायालय सत्तासंघर्षाचा चेंडू दुसरीकडे भिरकावण्याची शक्यता; उज्ज्वल निकमांचे स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 16:17 IST

उद्या निकाल असेल तर आज सायंकाळी समजणार... उज्ज्वल निकमांनी मोजल्या उणिवा... याचिकांवर याचिका, सत्तासंघर्षाची खिचडी झाली; उज्ज्वल निकम म्हणाले सर्वोच्च न्यायालयही अंधारात

घटनापीठातील एक न्यायामूर्ती १५ मे रोजी निवृत्त होत आहेत. यामुळे परवापर्यंत हा निकाल नक्कीच लागलेला असेल. उद्या जर निकाल असेल तर आज सायंकाळी समजणार आहे. सर्वोच्च न्यायालया नोटीशीद्वारे ते जाहीर करत असते. आजच्या नोटीशीमध्ये आले नाही तर परवापर्यंत निकाल निश्चितच लागेल, असा अंदाज प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला आहे. 

१६ आमदार अपात्र ठरले तर कोणालाच बहुमत नाही; बापटांनी सांगितला 'त्यांच्या' मनातला निकाल

लोकमत व्हिडीओचे संपादक आशिष जाधव यांनी लोकमत डॉट कॉमवर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची मुलाखत घेतली. यामध्ये त्यांनी सुनावणी अद्याप अपुरीच असल्याचे सांगितले. माझे असे मत आहे की हा निकाल एकमताने येण्याची शक्यता कमी आहे. घटनापीठाने आठ ते नऊ याचिकांवर ऐकले. उपाध्यक्ष झिरवाळ यांना अधिकार नाही हा मुद्दा होता. राज्यपालांची कृती, नवीन अध्यक्षांची नियुक्ती, ठाकरे गटाचा व्हीप आदी याचिका एकमेकांत गुंतलेल्या आहेत. खिचडी आहे. ती वेगवेगळी कसे करते यावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असेल, असे निकम म्हणाले.

प्रमुख मुद्दा १६ आमदारांच्या अपात्रतेचा आहे. यावर सुनावणी झालेली नाही. फक्त बाजू मांडलेली आहे. शिंदे गट आपोआप अपात्र झालेत का, हे देखील पहावे लागेल. सर्वोच्च न्यायालय हा चेंडू आपल्या कोर्टात न ठेवता दुसरीकडे भिरकावण्याची शक्यता आहे. दोन न्यायमूर्ती असले तरी त्यांची मते वेगवेगळी असू शकतात, असे निकम म्हणाले. 

...तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतील; उल्हास बापटांचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी महत्वाचे विधान

जेव्हा विधानसभा अध्यक्ष नसतील तेव्हा त्यांचे अधिकार उपाध्यक्षांकडे वर्ग होतात. न्यायालयाने पक्षांतर बंदी कायदा लागू होतो, ते विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असे म्हटले तर नार्वेकरांकडे जाईल का, असा सवाल केला. यावर निकम यांनी झिरवाळ हे अध्यक्षपदाची धुरा सांभाळत होते. त्यांनी अपात्रतेची नोटीस पाठविली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालय काही निर्णय घेईल का, सर्वोच्च न्यायालय अध्यक्षांना निरीक्षणे नोंदवून त्यांना निर्णय घ्या असे सांगू शकते. आता तो नव्या अध्यक्षांकडे जातो, झिरवळांकडे की हंगामी अध्यक्षाकडे ते पहावे लागेल. हे एकमेकांत अ़डकलेले त्रांगडे आहे, असे म्हणाले.

पक्षविरोधी कारवाया झालेल्या आहेत, असे जर का घटनापीठाला वाटले आणि अपात्रतेची थेट कारवाई करत अध्यक्षांना अंमलबजावणी करण्यास सांगू शकते का, यावर त्यांनी नाही असे म्हटले. स्वायत्त संस्थांना दिलेला अधिकार न्यायालयाने परस्पर घेतला असा त्याचा अर्थ होईल. न्यायालय निरीक्षण नोंदवू शकते, पूर्णपणे विधिमंडळात हा प्रश्न टाकणार नाही, असे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालय यातून कसा मार्ग काढते ते पहावे लागेल. पक्षच हायजॅक झाला आणि आम्ही पक्ष फोडला नाही असे म्हणणे दाव्या परिशिष्ठला बगल दिलीय का, फक्त आमदारांचे बहुमत एका बाजुला असेल तर पक्षविरोधी कारवाया होऊ शकते का, मुळता दहावे परिशिष्ठ आज वाचले तर त्यात मोठ्या उणीवा आहेत हे दिसेल. महाराष्ट्राच्या निमित्ताने न्यायालयाला यावर काही कठोर निरीक्षणे नोंदवावी लागतील, यावर संसदेला विचार करावा लागेल, असे निकम म्हणाले. 

१६ आमदार अपात्र झाले तर उरलेल्या २४ जणांचे काय? उल्हास बापटांनी 'कायद्याचे राजकारण' सांगितले...

राज्यपालांच्या कृतीवर सरन्यायाधीशांनी तोंडी नाराजी व्यक्त केली आहे. मोठ्या खंडपीठाकडे हे प्रकरण जाण्याची शक्यता नाहीय. सर्वोच्च न्यायालयाने एकामागोमाग एक अशा आठ-नऊ याचिका दाखल करून घेतल्या. ती खिचडी झाली. तेव्हा कोणीच मुद्दा उचलला नाही. काही याचिका रद्द करायला हव्या होत्या. त्या केल्या नाहीत. यामुळे ते या विलंबाला जबाबदार आहेत. जेवढे सर्वोच्च न्यायालय अंधारात आहे, तेवढाच मी देखील आहे, असे निकम म्हणाले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना