शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
7
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
8
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
9
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
10
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
11
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
12
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
13
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
14
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
15
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
16
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
17
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
18
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
19
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
20
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क

"२६/११ च्या हल्ल्यासारखं बंदूक, बॉम्ब हातात न घेता काहीजण मुंबई अस्थिर करतायेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 12:33 IST

काश्मीर, मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चाललीय त्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे असं संजय राऊत म्हणाले.

मुंबई - २६/११ च्या हल्ल्यात दहशतवादी समुद्रीमार्गे मुंबईत घुसले. मुंबई विकलांग करण्याचे हे आंतरराष्ट्रीय कारस्थान होते. दहशतवाद्यांनी मुंबईच्या अनेक महत्त्वाच्या इमारतींवर, सार्वजनिक ठिकणांवर हल्ले केले. आमच्या पोलिसांनी झुंज दिली, हौताम्य पत्करलं आणि मुंबईचे रक्षण केले. मुंबई कमजोर करण्याचे प्रयत्न तेव्हा पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी केले. आता काही राजकीय लोकं करतायेत. त्यांच्या हातात बंदूक, बॉम्ब नसतील पण काहीही करून त्यांना मुंबई अस्थिर आणि विकलांग करून या शहराचे महत्त्व कमी करायचे आहे असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला.

संजय राऊत म्हणाले की, आजचा दिवस राजकीय चर्चेचा नाही. जे निरपराध नागरीक या हल्ल्यात मारले गेले त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा आजचा दिवस आहे.जे पोलीस अधिकारी, शिपाई शहीद झाले त्यांना अभिवादन करण्याचा आज दिवस आहे. मुंबई आज सुरक्षित वाटत असली तरी लष्करी अधिकाऱ्यांचे बलिदान काश्मीर, मणिपूरमध्ये सुरू आहे. काश्मीरात गेल्या ८ दिवसांत ६ लष्करी अधिकाऱ्यांचे बलिदान झाले आहे.२ कॅप्टन, ४ सुरक्षा जवान यांचा समावेश आहे. मणिपूरमध्ये रोज पोलीस, लष्करावर हल्ले होतायेत. काश्मीर, मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चाललीय त्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे असं त्यांनी सांगितले. 

२०२४ ची राजकीय लढाई ही संविधान वाचवण्यासाठीची...

आज संविधान दिवस आहे. देशाला संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे मिळाले. संविधानामुळे देशातील लोकशाही आणि स्वातंत्र्य मजबूत राहिले. पण गेल्या १० वर्षापासून नक्कीच संविधानाचे खासगीकरण सुरू आहे. संविधान कमजोर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संविधानात हवे तसे आपल्या सोयीने बदल करून खासगी संविधान देशावर लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणून हे संविधान वाचवण्याची जबाबदारी देशातील प्रत्येक नागरिकांवर आहे. २०२४ ची राजकीय लढाई ही देशातील संविधान वाचवण्यासाठीच होईल.संविधान नसेल तर हा देश राहणार नाही हे शिवसेनाही मान्य करते आणि देशातील प्रत्येक राजकीय पक्षाने हे सत्य स्वीकारले पाहिजे. देशातील संविधानावर ज्याप्रकारे हल्ले सुरू आहेत ते आपण एकत्रितपणे परतवून लावले पाहिजे असं विधान संजय राऊतांनी केले. 

५ राज्यात भाजपा जिंकणार नाही 

मिझारोममध्ये भाजपा जिंकणार नाही. तिथे काँग्रेसचं अस्तित्व आहे. पण मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड इथं मोदींची जादू चालणार नाही हे सूर्यप्रकाशाइतके सत्य झालेले आहे. तेलंगणात भाजपा कुठेही स्पर्धेत नाही. तेलंगणात भाजपानं कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तुम्ही केसीआर, एमआयएम यांना मतदान करा पण काँग्रेसला मतदान करू नका असा निरोप लोकांना दिलाय. ही भाजपाची रणनीती आहे.स्वत:येणार नसेल काँग्रेसला येऊ द्यायचे नाही. परंतु याही परिस्थितीत तेलंगणात काँग्रेसनं चांगली मुसंडी मारली आहे. तिथे चांगला निकाल लागेल.छत्तीसगड, मध्य प्रदेशात भाजपाचा दारूण पराभव होणार आहे. राजस्थानात अशोक गहलोत हे जादूगार आहेत. गहलोत यांनी देशाच्या पंतप्रधानांना आव्हान दिले आहे. राजस्थानाची राजकीय समीकरणे अशी असतात जो ५ वर्ष राज्य करतो तो पुढच्यावेळी निवडून येत नाही.पण यावेळेला ते चित्र बदलेल. सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी या सगळ्यांनी ५ राज्यात प्रचाराचं रान पेटवलं आहे.जनता त्यांच्या पाठिशी आहे.गांधी कुटुंबाची लाट आलीय असं रस्त्यावर जनतेचा महासागर उसळला होता त्यातून दिसले आहे.त्यामुळे ५ राज्यात ४ राज्याची लढत सरळ आहे. राजस्थानात अटीतटीची लढत असली तरी तिथे काँग्रेस बाजी मारेल हे चित्र राहुल गांधींनी निर्माण केलंय असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.

...तर हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर मत मागण्याचा तुम्हाला अधिकार

भाजपा विकासाच्या कामावर मतदान का मागत नाही? रामलल्लाचे दर्शन मोफत घडवू यावर मतदान मागण्यापेक्षा काश्मीरात हिंदू पंडितांची घरवापसी करून दाखवली असती तर नक्कीच तुम्हाला हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर मत मागण्याचा अधिकार होता.तुम्ही २०१४ पासून काश्मीर पंडितांच्या प्रश्नावर मते मागतायेत. पण पुलवामा इथं आपल्या बेफिकीरीमुळे ४० जवानांच्या हत्या तुम्ही घडवल्या आहेत. तुम्हाला मते मागण्याचा अधिकारच नाही. रामलल्लाचे मोफत दर्शन हे निवडणूक आचारसंहितेचा भंग असून निवडणूक आयोगाने ताबडतोब नोटीस बजावायला हवी होती.भाजपाची मान्यता रद्द करायला हवी होती. भाजपावर निवडणूक आयोग कारवाई करत नाही असा आरोपही राऊतांनी केला आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्ला