शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

२००४ मध्येच NCP-BJP-शिवसेना युती होणार होती, पण...; प्रफुल पटेलांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 10:34 IST

माझ्या पुस्तकाची वाट पाहा, अशा बऱ्याच गोष्टी ज्या अजितदादांनाही माहिती नाहीत त्या मला माहिती आहेत असं प्रफुल पटेल म्हणाले.

मुंबई - २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना-भाजपा यांची युती होणार होती. लोकसभेच्या निवडणुकीत १६-१६-१६ जागा लढवण्याचं ठरवलं होतं. दिल्लीत माझ्या घरी ही बैठक झाली होती. तिथे युतीचं जवळपास सर्व निश्चित झालं होते असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी केला आहे. कर्जत येथील चिंतन शिबिरात बोलताना पटेल यांनी हा दावा केला. 

प्रफुल पटेल म्हणाले की, दिल्लीत प्रमोद महाजन यांच्यासोबत युतीची चर्चा सुरू केली. ही चर्चा अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि जसवंत सिंह यांच्या सूचनेवरून ही बैठक झाली. युती होणार म्हणून गोपीनाथ मुंडे खुश होते. परंतु या चर्चेत मुंडे फारसे सहभागी नव्हते.प्रमोद महाजन यांना ही युती नको होती. कारण जर युती झाली तर दिल्लीतील श्रेष्ठी शरद पवारांचे जास्त ऐकतील आणि आपले महत्त्व कमी होईल असं त्यांना वाटत होते. महाजन यांनी ही बातमी बाळासाहेबांना सांगितली. त्यानंतर बाळासाहेबांनी काही विधाने केली आणि २००४ मध्ये होणारी युती फिस्कटली असं त्यांनी म्हटलं. 

तसेच माझ्या पुस्तकाची वाट पाहा, अशा बऱ्याच गोष्टी ज्या अजितदादांनाही माहिती नाहीत त्या मला माहिती आहेत. २०१४ ला युतीचा प्रयत्न झाला तो दुसऱ्यांदा झाला होता. त्याआधी २००४ मध्ये झाला होता. जे काही झाले ते झाले. शरद पवारांवर आपण काही बोलत नाही. व्यक्तिगत टिप्पणीही करण्याचं कारण नाही.पण सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष असताना १४० खासदार हे शरद पवारांसोबत होते.मात्र देवेगौडा पंतप्रधान झाले. केसरी यांच्या स्वभावाला कंटाळून देवेगौडा राजीनामा देणार होते. त्यांनी शरद पवारांना पंतप्रधान होण्यासाठी निरोपही पाठवला. देवेगौडा आणि १४० खासदार एकत्र असूनही शरद पवार ऐनवेळी माघारी फिरले. हे मला अजूनही कळाले नाही.शरद पवारांना संधी असूनही शेवटच्या क्षणी ते माघारी फिरतात असं विधानही प्रफुल पटेलांनी शरद पवारांबद्दल केले आहे.

दरम्यान, आपल्या पक्षाचा प्रवास केवळ विधानसभा, लोकसभा निवडणुकीपर्यंत नाही. पुढील २० ते २५ वर्षे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. हे शिबिर घेण्यामागे एक भावना आहे. पक्षात चिंतन, मंथन, पक्षाची ध्येयधोरणे ठरवली जातात म्हणून हे शिबिर घेतले आहे. अजितदादा पवार यांनी घेतलेल्या निर्णयामागे हजारो, लाखो लोक आहेत. अजितदादा पवार यांनी घेतलेला निर्णय ही साधी गोष्ट नाही. जसा शंभर टक्के पवारसाहेबांच्या पाठीशी राहिलो तसा अजितदादांच्या पाठीशी राहणार आहे. अजितदादांनी घेतलेली महत्वाची भूमिका ही राज्यासाठी, देशासाठी आणि पक्षासाठी आहे. आपला पक्ष, आपले घर मजबूत करायचे आहे, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे असे आवाहन प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्यांना केले.  

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेलNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाSharad Pawarशरद पवार