शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

२००४ मध्येच NCP-BJP-शिवसेना युती होणार होती, पण...; प्रफुल पटेलांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 10:34 IST

माझ्या पुस्तकाची वाट पाहा, अशा बऱ्याच गोष्टी ज्या अजितदादांनाही माहिती नाहीत त्या मला माहिती आहेत असं प्रफुल पटेल म्हणाले.

मुंबई - २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना-भाजपा यांची युती होणार होती. लोकसभेच्या निवडणुकीत १६-१६-१६ जागा लढवण्याचं ठरवलं होतं. दिल्लीत माझ्या घरी ही बैठक झाली होती. तिथे युतीचं जवळपास सर्व निश्चित झालं होते असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी केला आहे. कर्जत येथील चिंतन शिबिरात बोलताना पटेल यांनी हा दावा केला. 

प्रफुल पटेल म्हणाले की, दिल्लीत प्रमोद महाजन यांच्यासोबत युतीची चर्चा सुरू केली. ही चर्चा अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि जसवंत सिंह यांच्या सूचनेवरून ही बैठक झाली. युती होणार म्हणून गोपीनाथ मुंडे खुश होते. परंतु या चर्चेत मुंडे फारसे सहभागी नव्हते.प्रमोद महाजन यांना ही युती नको होती. कारण जर युती झाली तर दिल्लीतील श्रेष्ठी शरद पवारांचे जास्त ऐकतील आणि आपले महत्त्व कमी होईल असं त्यांना वाटत होते. महाजन यांनी ही बातमी बाळासाहेबांना सांगितली. त्यानंतर बाळासाहेबांनी काही विधाने केली आणि २००४ मध्ये होणारी युती फिस्कटली असं त्यांनी म्हटलं. 

तसेच माझ्या पुस्तकाची वाट पाहा, अशा बऱ्याच गोष्टी ज्या अजितदादांनाही माहिती नाहीत त्या मला माहिती आहेत. २०१४ ला युतीचा प्रयत्न झाला तो दुसऱ्यांदा झाला होता. त्याआधी २००४ मध्ये झाला होता. जे काही झाले ते झाले. शरद पवारांवर आपण काही बोलत नाही. व्यक्तिगत टिप्पणीही करण्याचं कारण नाही.पण सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष असताना १४० खासदार हे शरद पवारांसोबत होते.मात्र देवेगौडा पंतप्रधान झाले. केसरी यांच्या स्वभावाला कंटाळून देवेगौडा राजीनामा देणार होते. त्यांनी शरद पवारांना पंतप्रधान होण्यासाठी निरोपही पाठवला. देवेगौडा आणि १४० खासदार एकत्र असूनही शरद पवार ऐनवेळी माघारी फिरले. हे मला अजूनही कळाले नाही.शरद पवारांना संधी असूनही शेवटच्या क्षणी ते माघारी फिरतात असं विधानही प्रफुल पटेलांनी शरद पवारांबद्दल केले आहे.

दरम्यान, आपल्या पक्षाचा प्रवास केवळ विधानसभा, लोकसभा निवडणुकीपर्यंत नाही. पुढील २० ते २५ वर्षे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. हे शिबिर घेण्यामागे एक भावना आहे. पक्षात चिंतन, मंथन, पक्षाची ध्येयधोरणे ठरवली जातात म्हणून हे शिबिर घेतले आहे. अजितदादा पवार यांनी घेतलेल्या निर्णयामागे हजारो, लाखो लोक आहेत. अजितदादा पवार यांनी घेतलेला निर्णय ही साधी गोष्ट नाही. जसा शंभर टक्के पवारसाहेबांच्या पाठीशी राहिलो तसा अजितदादांच्या पाठीशी राहणार आहे. अजितदादांनी घेतलेली महत्वाची भूमिका ही राज्यासाठी, देशासाठी आणि पक्षासाठी आहे. आपला पक्ष, आपले घर मजबूत करायचे आहे, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे असे आवाहन प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्यांना केले.  

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेलNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाSharad Pawarशरद पवार