शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

Monsoon Update: येत्या पाच दिवसांत वाढणार मान्सूनचा जोर, मुंबई, ठाण्यात मुसळधार कोसळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 07:25 IST

Monsoon Update: मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असला, तरी आजही निम्मा महाराष्ट्र कोरडा आहे. मात्र, आता हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, पुढील पाच दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी मान्सूनचा जोर वाढेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

मुंबई : मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असला, तरी आजही निम्मा महाराष्ट्र कोरडा आहे. मात्र, आता हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, पुढील पाच दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी मान्सूनचा जोर वाढेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. विशेषत: मुंबई आणि ठाण्यात पावसाचा जोर वाढेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.गेल्या २४ तासांत विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत पावसाने शुक्रवारी उघडीप घेतली. गुरुवारी सकाळी मात्र पावसाने बऱ्यापैकी जोर पकडला होता. दुपारी आणि सायंकाळी त्याने उघडीप घेतली आणि शुक्रवार सायंकाळपर्यंत कोरडा गेला. मुंबईतला पाऊस गायब होताच, येथील उन्हात आणि उकाड्यात वाढ झाली असून, वाहणाऱ्या घामाच्या धारांनी मुंबईकर ओलेचिंब होत आहेत.

नेमका अंदाज काय?n कोकण, गोव्यात १९ ते २१ जूनदरम्यान तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.n मध्य महाराष्ट्रात २० आणि २१ जून रोजी घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस.n विदर्भात १८ ते २१ जूनदरम्यान मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस.

पाच दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या तीन दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि ठाण्यातही रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे.    - कृष्णानंद होसाळीकर,     अतिरिक्त महासंचालक, भारतीय     हवामान शास्त्र विभाग

टॅग्स :RainपाऊसweatherहवामानMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई