शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

"महायुती सरकारने 'निवडणुकीपुरता शेतकरी आणि मतांपुरती लाडकी बहीण' अशी नवी म्हण केली रुढ’’, काँग्रेसची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 13:15 IST

Harshwardhan Sapkal Criticize Mahayuti Government: "कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी" अशी मराठीत एक म्हण आहे. पण महायुती सरकारने "निवडणुकीपुरता शेतकरी आणि मतांपुरती लाडकी बहीण" अशी नवी म्हण रुढ केली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ य़ांनी केली आहे.

गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारसाठी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती. या योजनेच्या जोरावर महायुतीने निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला होता. दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी  महायुती सरकारने पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना महिना २१०० रुपये देण्याचं तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्ता आल्यानंतर आता राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा हवाला देत लाडकी बहीण आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महायुती सरकारने हात आखडता घेण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती  सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

या संदर्भात केलेल्या एक्सवरून केलेल्या टीकेमध्ये हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की,   "कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी" अशी मराठीत एक म्हण आहे. पण महायुती सरकारने "निवडणुकीपुरता शेतकरी आणि मतांपुरती लाडकी बहीण" अशी नवी म्हण रुढ केली आहे. कर्जमाफीचे आश्वासन देऊन शेतक-यांची मते घेतली सत्तेवर येताच कर्जमाफी मिळणार नाही चूपचाप पैसे भरा असे मस्तवालपणे सांगत आहेत. विविध कारणे देऊन सातत्याने लाडक्या बहिणींना योजनेतून वगळले जाते आहे. महाभ्रष्ट महायुती सरकारकडूत फक्त जनतेचा विश्वासघात आणि फसवणूकच सुरू आहे,, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.  

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMahayutiमहायुतीHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळ