शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांची प्रदीर्घ बैठक संपली; भेटीनंतर दिलीप वळसे पाटलांनी दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 17:25 IST

आज संध्याकाळी ६ वाजता पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

मुंबई – महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहखात्यावरून नाराजी असल्याची बातमी समोर आल्याने खळबळ माजली. शिवसेनेला गृहखाते हवं अशी मागणी नेत्यांकडून होऊ लागली आहे. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. गृहमंत्र्यांवर कुठलीही नाराजी नाही असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आला होता. या भेटीनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) म्हणाले की, संजय राऊत यांची भावना योग्य आहे. गृह विभागाकडून कुठली कमतरता होत असेल तर त्याबाबत सुधारणा करू. महाविकास आघाडीत विश्वासात घेऊनच अनेक निर्णय होत असतात. प्रशासकीय कामकाजाबाबत मुख्यमंत्र्याशी चर्चा झाली. आज संध्याकाळी ६ वाजता पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. गृहखाते मुख्यमंत्र्यांनी घ्यावं या प्रश्नावर मुख्यमंत्रीच उत्तर देतील. आमची बैठक पूर्वनियोजित होती असं त्यांनी सांगितले.

काय म्हणाले होते संजय राऊत?

महाविकास आघाडीत कुठेही विसंवाद नाही. कुठलाही संभ्रम निर्माण करू नका. मुख्यमंत्री प्रत्येक मंत्र्यांशी संवाद साधत असतात. राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद हवय असं भाजपा म्हणते. मग भाजपालाही मुख्यमंत्रिपद हवंय. ते पद कुणाला नको? भाजपाने उगाच त्रास करून घेऊ नये. मानसिक यातना झाल्यानंतर अशाप्रकारे झटके येत असतात. अडीच वर्ष तुम्हीही शांत बसा आणि आम्हालाही शांत बसूद्या. महाविकास आघाडीत ५ वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे राहील असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) यांनी भाजपाला लगावला.

तसेच गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्याची प्रदीर्घ बैठक झाली आहे. या बैठकीत चर्चा झाली आहे. एकमेकांची मते समजून घेतली आहेत. गृहमंत्री उत्तम काम करतायेत. महाविकास आघाडीचे सगळेच मंत्री काम करतायेत. त्यामुळे गैरसमज निर्माण करण्याचं काम कुणीही करू नये असंही राऊतांनी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी गृहखातं हाती घ्यावं अशी मागणी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. मागील सरकारमध्ये गृहखातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होते. मुख्यमंत्री आणि गृह खाते एकाकडेच असल्याच राज्याची प्रगती आणखी जोराने होऊ शकते असा दावा खैरे यांनी केला आहे.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलShiv Senaशिवसेना