शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांची प्रदीर्घ बैठक संपली; भेटीनंतर दिलीप वळसे पाटलांनी दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 17:25 IST

आज संध्याकाळी ६ वाजता पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

मुंबई – महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहखात्यावरून नाराजी असल्याची बातमी समोर आल्याने खळबळ माजली. शिवसेनेला गृहखाते हवं अशी मागणी नेत्यांकडून होऊ लागली आहे. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. गृहमंत्र्यांवर कुठलीही नाराजी नाही असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आला होता. या भेटीनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) म्हणाले की, संजय राऊत यांची भावना योग्य आहे. गृह विभागाकडून कुठली कमतरता होत असेल तर त्याबाबत सुधारणा करू. महाविकास आघाडीत विश्वासात घेऊनच अनेक निर्णय होत असतात. प्रशासकीय कामकाजाबाबत मुख्यमंत्र्याशी चर्चा झाली. आज संध्याकाळी ६ वाजता पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. गृहखाते मुख्यमंत्र्यांनी घ्यावं या प्रश्नावर मुख्यमंत्रीच उत्तर देतील. आमची बैठक पूर्वनियोजित होती असं त्यांनी सांगितले.

काय म्हणाले होते संजय राऊत?

महाविकास आघाडीत कुठेही विसंवाद नाही. कुठलाही संभ्रम निर्माण करू नका. मुख्यमंत्री प्रत्येक मंत्र्यांशी संवाद साधत असतात. राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद हवय असं भाजपा म्हणते. मग भाजपालाही मुख्यमंत्रिपद हवंय. ते पद कुणाला नको? भाजपाने उगाच त्रास करून घेऊ नये. मानसिक यातना झाल्यानंतर अशाप्रकारे झटके येत असतात. अडीच वर्ष तुम्हीही शांत बसा आणि आम्हालाही शांत बसूद्या. महाविकास आघाडीत ५ वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे राहील असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) यांनी भाजपाला लगावला.

तसेच गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्याची प्रदीर्घ बैठक झाली आहे. या बैठकीत चर्चा झाली आहे. एकमेकांची मते समजून घेतली आहेत. गृहमंत्री उत्तम काम करतायेत. महाविकास आघाडीचे सगळेच मंत्री काम करतायेत. त्यामुळे गैरसमज निर्माण करण्याचं काम कुणीही करू नये असंही राऊतांनी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी गृहखातं हाती घ्यावं अशी मागणी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. मागील सरकारमध्ये गृहखातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होते. मुख्यमंत्री आणि गृह खाते एकाकडेच असल्याच राज्याची प्रगती आणखी जोराने होऊ शकते असा दावा खैरे यांनी केला आहे.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलShiv Senaशिवसेना