शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

"सभागृहाला पण आहे काळजी आदित्य ठाकरेंच्या लग्नाची", फडणवीस यांच्या कोटीने हशा आणि खसखसही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 07:15 IST

आदित्य ठाकरे यांनी ‘ही काही वेगळी राजकीय धमकी आहे का? की लग्न लावून देतो नाही तर आमच्यासोबत बसा’ अशी गुगली हसत हसत टाकली.

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या लग्नावरून मंगळवारी विधानसभेत मिश्कील टिप्पणी झाली. ठाकरे यांचे विरोधक मानले जाणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या विधानाचा आधार घेत केलेल्या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला आणि त्यात सर्वपक्षीय सदस्य सहभागी झाले. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी एकलहरे येथील रखडलेल्या वीज प्रकल्पाबद्दल लक्षवेधी मांडली होती. त्यावर चर्चा करतानाच वरील किस्सा घडला. यावेळी आमदार बच्चू कडू म्हणाले, एखाद्या प्रकल्पाचे काम सुरू झाले की अनेक कामगार त्यांचा गाव सोडून तेथे जातात. वर्ष दोन वर्षांतच प्रकल्पाचे काम बंद पडते. त्यामुळे कामगार बेरोजगार होतात. उद्या एखाद्या कामगाराचे लग्न तुटले तर त्याची जबाबदारी सरकार घेणार का?

आदित्य ठाकरे यांनी नाशिक आणि नागपूरमधील ॲशपॉन्डचा मुद्दा मांडला. नांदगाव आणि वारेगाव येथे ७००-८०० एकर जागेत सात ते आठ फूट राख साठली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नांदगावमधील ॲशपॉन्ड साफ करण्याचा प्रयत्न केला गेला. आता पुन्हा अनेक ठिकाणी राख साठवणे सुरू झाले आहे. पावसाळ्यापूर्वी ती राख काढली गेली नाही तर ती वाहून शेतात जाण्याची शक्यता असते. ती काढणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.  

त्यावर उत्तर देण्यास फडणवीस उभे राहिले. बच्चू कडू यांनी हा प्रश्न बहुधा आदित्य ठाकरे यांच्याकडे बघत बघत विचारला का? असे फडणवीस यांनी आदित्य यांच्याकडे पाहून विनोदाने विचारले. सरकारने लग्न लावायचे… तर सरकार जबाबदारी घ्यायला तयार आहे, असे ते म्हणाले. त्यावर आदित्य ठाकरे यांनी ‘ही काही वेगळी राजकीय धमकी आहे का? की लग्न लावून देतो नाही तर आमच्यासोबत बसा’ अशी गुगली हसत हसत टाकली. त्यांच्या या गुगलीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘आधी लग्न कोंढाण्याचं,…असे म्हणत आणखी कोपरखळी मारली. 

तोंड बंद करायचे, तर लग्न हा प्रभावी उपाय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्ही लग्न लावून द्यायची जबाबदारी घेतो… एखाद्याचे तोंड बंद करायचे असले तर हाच उत्तम आणि प्रभावी उपाय आहे. हे मी अनुभवातून सांगत आहे, असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस