शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

सरकारला बहुमताची गरज नव्हती, मग राष्ट्रवादीला का घेतले?; शिवसेनेने कारण सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 14:20 IST

आज जे मंत्रिमंडळ झाले त्यामुळे काहींच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत असं आमदार संजय शिरसाट म्हणाले.

मुंबई – राज्यात शिवसेना-भाजपा सरकारला १ वर्षपूर्ती होत असताना पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडला. ज्या अजित पवारांवर आरोप करत शिवसेना आमदारांनी मविआ सरकार पाडले त्याच अजित पवारांना सेना-भाजपा सरकारमध्ये सामील करून घेतले. अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारला पाठिंबा दिला. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीत फूट पडल्याचे चित्र दिसले त्याचसोबत शिवसेना आमदारांचीही कोंडी झाली.

अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बहुमताची गरज नसताना सरकारमध्ये का घेतले? असा प्रश्न विचारला जाऊ लागला त्यावर शिवसेना आमदार संजय शिरसाट म्हणाले की, राष्ट्रवादीत असंतोष वाढत होता याची जाणीव आधीच होती. त्यामुळे अजित पवार इथं येणार हे माहिती होते. मग सरकार १७२ बहुमत असताना राष्ट्रवादीला सोबत का घेतले असं विचारले जाते. परंतु राजकारणात काही समीकरणे बसवताना, लोकसभा, विधानसभा असेल. पक्षाची ताकद असतेच परंतु वैयक्तिक ताकदही असते. ही ताकद एकत्र झाल्यावर निवडणुका जिंकणे सोपे असते. आम्ही ४५ जिंकू, ४८ जिंकू हे बोलणे सोपे असते पण कसे याचे आराखडे बांधले जातात. तोच आराखडा एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांनी बांधला आहे असं त्यांनी म्हटलं.

तसेच आज जे मंत्रिमंडळ झाले त्यामुळे काहींच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. हे सगळे प्लॅनिंग करून झाले आहे. आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार येत्या रविवारपर्यंत होईल. मंत्रिमंडळाचे विभाजन वाटून समझौत्याने होत आहे. अनेकदा सरकार बनलेली आहेत. उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राजकारणाला झटका देण्याचे काम या खेळीने झाले आहे असा टोला आमदार संजय शिरसाट यांनी लगावला.

दरम्यान, आमची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. येत्या आठवडाभरात तुम्हाला उलगडा होईल. आमच्याकडे जशी मंत्रिपदाची आस लावून आहेत तशी भाजपाकडेही आहेत. राजकारणात काही तडजोडी कराव्या लागतात. नियोजन कसे करावे हे वरिष्ठ नेते ठरवतील. न्याय सगळ्यांना द्यावा लागेल. प्रत्येकाची वेगवेगळी अपेक्षा असते. राष्ट्रवादीसोबत आली म्हणून हात खाली झाले असं नाही. शिंदे-फडणवीस यांचे बोलणे चांगले आहे. कोणाच्या अधिकारावर गदा येणार नाही याची काळजी मुख्यमंत्री घेतील. सत्तेत असले तर वेगळे वलय निर्माण होते. अजितदादा चांगले काम करतील. आम्हाला काही मिळणार नाही असं काही होत नाही असं म्हणत आमदार संजय शिरसाट यांनी नाराजीच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेस