शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

सरकारला बहुमताची गरज नव्हती, मग राष्ट्रवादीला का घेतले?; शिवसेनेने कारण सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 14:20 IST

आज जे मंत्रिमंडळ झाले त्यामुळे काहींच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत असं आमदार संजय शिरसाट म्हणाले.

मुंबई – राज्यात शिवसेना-भाजपा सरकारला १ वर्षपूर्ती होत असताना पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडला. ज्या अजित पवारांवर आरोप करत शिवसेना आमदारांनी मविआ सरकार पाडले त्याच अजित पवारांना सेना-भाजपा सरकारमध्ये सामील करून घेतले. अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारला पाठिंबा दिला. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीत फूट पडल्याचे चित्र दिसले त्याचसोबत शिवसेना आमदारांचीही कोंडी झाली.

अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बहुमताची गरज नसताना सरकारमध्ये का घेतले? असा प्रश्न विचारला जाऊ लागला त्यावर शिवसेना आमदार संजय शिरसाट म्हणाले की, राष्ट्रवादीत असंतोष वाढत होता याची जाणीव आधीच होती. त्यामुळे अजित पवार इथं येणार हे माहिती होते. मग सरकार १७२ बहुमत असताना राष्ट्रवादीला सोबत का घेतले असं विचारले जाते. परंतु राजकारणात काही समीकरणे बसवताना, लोकसभा, विधानसभा असेल. पक्षाची ताकद असतेच परंतु वैयक्तिक ताकदही असते. ही ताकद एकत्र झाल्यावर निवडणुका जिंकणे सोपे असते. आम्ही ४५ जिंकू, ४८ जिंकू हे बोलणे सोपे असते पण कसे याचे आराखडे बांधले जातात. तोच आराखडा एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांनी बांधला आहे असं त्यांनी म्हटलं.

तसेच आज जे मंत्रिमंडळ झाले त्यामुळे काहींच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. हे सगळे प्लॅनिंग करून झाले आहे. आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार येत्या रविवारपर्यंत होईल. मंत्रिमंडळाचे विभाजन वाटून समझौत्याने होत आहे. अनेकदा सरकार बनलेली आहेत. उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राजकारणाला झटका देण्याचे काम या खेळीने झाले आहे असा टोला आमदार संजय शिरसाट यांनी लगावला.

दरम्यान, आमची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. येत्या आठवडाभरात तुम्हाला उलगडा होईल. आमच्याकडे जशी मंत्रिपदाची आस लावून आहेत तशी भाजपाकडेही आहेत. राजकारणात काही तडजोडी कराव्या लागतात. नियोजन कसे करावे हे वरिष्ठ नेते ठरवतील. न्याय सगळ्यांना द्यावा लागेल. प्रत्येकाची वेगवेगळी अपेक्षा असते. राष्ट्रवादीसोबत आली म्हणून हात खाली झाले असं नाही. शिंदे-फडणवीस यांचे बोलणे चांगले आहे. कोणाच्या अधिकारावर गदा येणार नाही याची काळजी मुख्यमंत्री घेतील. सत्तेत असले तर वेगळे वलय निर्माण होते. अजितदादा चांगले काम करतील. आम्हाला काही मिळणार नाही असं काही होत नाही असं म्हणत आमदार संजय शिरसाट यांनी नाराजीच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेस