शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

Dilip Walse Patil On Loudspeaker : भोग्यांविषयी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांशी, संघटनांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार - दिलीप वळसे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 17:03 IST

Dilip Walse Patil On Loudspeaker : कायदा हाती घेण्याचा प्रयत्न झाल्यास कठोर कारवाई होणार, गृहमंत्र्यांचा इशारा.

Dilip Walse Patil On Loudspeaker : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यादरम्यान मशिदींवरील भोंग्यांचा प्रश्न उपस्थित केला. तसंच त्यानंतर ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या उत्तर सभेतही त्यांनी हा प्रश्न उपस्थित करत ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. ३ मे पर्यंत हे भोंगे न काढल्यास त्या समोर हनुमान चालीसा लावली जाईल असा इशाराही त्यांनी दिला होता. दरम्यान, आता या मुद्द्यावरुन राजकारण तापत असून सरकारही अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

“यासंदर्भात पोलीस महासंचालकांनी एक बैठक घेतली. याचा अहवालही त्यांनी दिला आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्यात जी परिस्थिती उद्भवू शकते त्या संदर्भात उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोनातून, अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून काय तयारी केली याचा आढावा त्यांनी दिला आहे. कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याचा ही जबाबदारी आमच्यावर आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुरू आहे. त्याबाबतीत सरकार अतिशय गंभीर आहे. कायदा कोणी हाती घेण्याचा प्रयत्न करू नका ही सर्वांना विनंती आहे. संघर्ष वाढवू नका, तेढ निर्माण करू नका. अशी कृती झाल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा वळसे-पाटील यांनी दिला.

"हा प्रश्न काही नवा नाही"“हा निर्माण झालेला प्रश्न हा काही नवीन नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा २००५ चा निर्णय आहे. त्यानंतर २०१५, २०१७ मध्ये राज्यानं काही जीआर काढले आहेत. त्या जीआरमध्ये लाऊडस्पीकरच्या संदर्भातील पद्धत ठरवून दिली आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भातील सूचना संबंधितांना देण्यात येतील. यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्यापूर्वी राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलवून याबाबत चर्चा केली जाईल. काही संघटनांशी बैठक बोलावून त्यांच्यासोबतही चर्चा केली जाईल. त्यानंतर याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.औरंगाबाद पोलीस आयुक्त निर्णय घेतीलराज ठाकरे हे १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. त्यांनी यासंदर्भात घोषणाही केली होती. परंतु त्यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीसह काही जणांकडून करण्यात आली. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना “अशा प्रकारची कोणतीही निवेदनं गृहखात्याकडे आलेलं नाही. ती औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांकडे आली आहे. ते परिस्थिती पाहूनच निर्णय घेतील,” असं वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे