शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

Dilip Walse Patil On Loudspeaker : भोग्यांविषयी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांशी, संघटनांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार - दिलीप वळसे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 17:03 IST

Dilip Walse Patil On Loudspeaker : कायदा हाती घेण्याचा प्रयत्न झाल्यास कठोर कारवाई होणार, गृहमंत्र्यांचा इशारा.

Dilip Walse Patil On Loudspeaker : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यादरम्यान मशिदींवरील भोंग्यांचा प्रश्न उपस्थित केला. तसंच त्यानंतर ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या उत्तर सभेतही त्यांनी हा प्रश्न उपस्थित करत ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. ३ मे पर्यंत हे भोंगे न काढल्यास त्या समोर हनुमान चालीसा लावली जाईल असा इशाराही त्यांनी दिला होता. दरम्यान, आता या मुद्द्यावरुन राजकारण तापत असून सरकारही अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

“यासंदर्भात पोलीस महासंचालकांनी एक बैठक घेतली. याचा अहवालही त्यांनी दिला आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्यात जी परिस्थिती उद्भवू शकते त्या संदर्भात उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोनातून, अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून काय तयारी केली याचा आढावा त्यांनी दिला आहे. कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याचा ही जबाबदारी आमच्यावर आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुरू आहे. त्याबाबतीत सरकार अतिशय गंभीर आहे. कायदा कोणी हाती घेण्याचा प्रयत्न करू नका ही सर्वांना विनंती आहे. संघर्ष वाढवू नका, तेढ निर्माण करू नका. अशी कृती झाल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा वळसे-पाटील यांनी दिला.

"हा प्रश्न काही नवा नाही"“हा निर्माण झालेला प्रश्न हा काही नवीन नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा २००५ चा निर्णय आहे. त्यानंतर २०१५, २०१७ मध्ये राज्यानं काही जीआर काढले आहेत. त्या जीआरमध्ये लाऊडस्पीकरच्या संदर्भातील पद्धत ठरवून दिली आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भातील सूचना संबंधितांना देण्यात येतील. यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्यापूर्वी राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलवून याबाबत चर्चा केली जाईल. काही संघटनांशी बैठक बोलावून त्यांच्यासोबतही चर्चा केली जाईल. त्यानंतर याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.औरंगाबाद पोलीस आयुक्त निर्णय घेतीलराज ठाकरे हे १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. त्यांनी यासंदर्भात घोषणाही केली होती. परंतु त्यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीसह काही जणांकडून करण्यात आली. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना “अशा प्रकारची कोणतीही निवेदनं गृहखात्याकडे आलेलं नाही. ती औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांकडे आली आहे. ते परिस्थिती पाहूनच निर्णय घेतील,” असं वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे