शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

चर्चेची ‘दिशा’ बदलली, टीकेने गाठले टोक; दानवे-महाजन, परब-चित्रा वाघ यांच्यात खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 07:41 IST

विधानसभेत एकमेकांविरुद्ध टोकाची वैयक्तिक टीका झाल्याने सभागृहातील चर्चेचा दर्जा पार घसरला...

मुंबई : विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये दिशा सालियनच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणावरून गुरुवारी एकच गदारोळ झाला. विधानपरिषदेत तीनवेळा तर विधानसभेत कामकाज एकवेळा तहकूब करावे लागले. विधानसभेत एकमेकांविरुद्ध टोकाची वैयक्तिक टीका झाल्याने सभागृहातील चर्चेचा दर्जा पार घसरला. 

विधान परिषदेत शिंदेसेनेच्या आ. मनीषा कायंदे यांनी माहितीच्या मुद्द्याचा आधार घेत दिशा सालियन हत्येप्रकरणी तिचे वडील उच्च न्यायालयात गेले आहेत. त्यांनी काही कलाकार, राजकीय व्यक्तींवर संशय व्यक्त करीत तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे सांगितले. भाजप गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी हे प्रकरण सीबीआयकडे पाठवून नव्याने चौकशीची मागणी केली. तर, आ. चित्रा वाघ, आ. उमा खापरे यांनी एसआयटी चौकशीचे निष्कर्ष समोर आले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

ठाकरे गट गैरहजर, काँग्रेस-राष्ट्रवादीचे मौनसभागृहात कोणत्याही सदस्याने संबंधित माजी मंत्र्याचे नाव घेतले नाही.  मंत्री नितेश राणे यांनी त्या माजी मंत्र्याच्या अटकेची मागणी केली. मंत्री शंभूराज देसाई यांनी ती उचलून धरली. गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, या प्रकरणात कुणीही असो, कायद्यानुसार कारवाई केली जाईल.

दानवे-महाजन, परब-चित्रा वाघ यांच्यात खडाजंगीसभापतींनी या विषयावर चर्चेला परवानगी दिली असता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. शिक्षकांत शिंदे यांनी आक्षेप घेतला.  आपण सत्ताधाऱ्यांकडे पाहत आहात. विरोधी पक्षाकडे पाहतच नाही, असा आरोप केला. यावरून दानवे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात वाद होऊन त्यांनी एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान दिले.

आ. अनिल परब यांनी आदित्य ठाकरेंची केस कोर्टात पाच वर्षे चालू आहे. यात सीआयडी, सीबीआय आणि एसआयटी चौकशी झाली. दीड वर्ष होऊनही एसआयटी चौकशी रिपोर्ट बाहेर आला नाही. न्यायप्रविष्ठ प्रकरण असताना हा विषय येतोच कसा, असा सवाल केला. आ. कायंदे यांचे जुने ट्विट दाखवीत त्यांच्यावरही आरोप केला. यावरून सत्ताधारी आक्रमक झाले. परब आणि आ. वाघ यांच्यात यावेळी मोठा शाब्दिक वाद झाला. भाजपसह सत्ताधारी आमदारांनी घोषणाबाजी केली. 

कस्टोडियल इंटरॉगेशन करण्याची मागणीविधानसभेत भाजपचे आमदार अमित साटम यांनी माहितीच्या मुद्दयाद्वारे दिशा सालियन मृत्यू प्रकरण सभागृहात मांडले. सरकारने चौकशीसाठी एसआयटी नेमली होती तिचा अहवाल जनतेसमोर कधी ठेवणार, असा प्रश्नही केला.

दिशाचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत जी नावे घेतली आहेत, त्यात दिशा सालियनचे चार मित्र आहेत, तत्कालीन शासनातील मंत्री आहेत, मुंबई शहराच्या तत्कालीन महापौर आहेत, अशी माहिती दिली व या सर्व व्यक्तींची चौकशी एसआयटी करणार का? गरज पडल्यास या सर्व व्यक्तींचे ‘कस्टोडियल इंटरॉगेशन ’ करणार का? असे प्रश्न उपस्थित केले. खोटेनाटे आरोप करत असाल तर भाविष्यात तुम्हालाच अडचणी निर्माण होतील. आमच्या घराण्याच्या सहा ते सात पिढ्या जनतेसमोर आहेत. आमचा या प्रकरणात दुरान्वयानेही संबंध नाही. पण राजकारण वाईट बाजूने न्यायचे असेल तर मात्र सर्वांचीच पंचाईत होईल. तुम्ही खोट्याचा नायटा करत असाल तर तुमच्यावरही हे पलटू शकते.उद्धव ठाकरे, अध्यक्ष उद्धव सेना

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणात एसआयटीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. पण चौकशी अधिक जलद गतीने केली जाईल, असे सांगितले. सत्ताधारी भाजप व शिवसेना आमदारांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे कामकाज तहकूब झाले. 

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनChitra Waghचित्रा वाघAnil Parabअनिल परबGirish Mahajanगिरीश महाजनAmbadas Danweyअंबादास दानवेDisha Salian Caseदिशा सालियान मृत्यू प्रकरण