शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

जागावाटपाची चर्चा लटकली; अजित पवार गटात अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 06:08 IST

लोकसभेला त्याग केला; विधानसभेला ते नकोच : नेत्यांचा अजित पवारांवर दबाव

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा महायुतीमध्ये सुरू होत नसल्याने अजित पवार गटात कमालीची अस्वस्थता आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या जागावाटपाचा घोळ घातला गेला तर त्याचा फटका महायुतीला बसेल असे या गटाला वाटते. जागावाटप लगेच ठरले नाही तर आपले काही आमदार हे शरद पवार यांच्यासोबत जातील, असे शंकेचे वातावरणही या गटात आहे. जागावाटप चर्चा लगेच सुरू करणार असे भाजप नेते सांगतात. भाजपच्या कोअर कमिटीची गेल्या आठवड्यात बैठक झाल्यानंतर तेच सांगण्यात आले. मात्र, अद्याप भाजपकडून शिंदेसेना वा अजित पवार गटाला कल्पना देण्यात आलेली नाही. 

देवेंद्र फडणवीस यांच्याशी ‘ट्युनिंग’ चांगले...अजित पवार गटाच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले की, जागावाटपाच्या दृष्टीने जो समन्वय सुरू व्हायला हवा होता तो अजूनही दिसत नाही. नोव्हेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार असे गृहित धरले तरी निदान जागावाटपाची चर्चा तरी लगेच सुरू व्हायला हवी. या नेत्याने अशीही भावना बोलून दाखविली, की ही चर्चा सुरू करण्याची आमची अपेक्षा ही भाजप आणि विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच आहे. आमचे त्यांच्याशी ‘ट्युनिंग’ चांगले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा पक्ष आमच्याप्रमाणेच भाजपचा मित्र आहे, त्यामुळे जागावाटपाच्या चर्चेसाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी आमची अपेक्षा नाही. 

कोणत्या जागा मिळणार याची खात्री द्यायला हवी...आमच्याकडे जे आमदार आहेत त्यांचे मतदारसंघ आमच्याकडेच राहतील असे गृहित धरून आम्ही काम सुरू केले आहे पण जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करून त्याबाबतची खात्री आम्हाला द्यायला हवी. तसेच, आमदार नसलेले कोणते मतदारसंघ आपल्याला मिळणार हे लगेच स्पष्ट झाले तर त्या मतदारसंघांवर फोकस करणे सोपे जाईल, अशी भावनाही या ज्येष्ठ नेत्याने बोलून दाखविली.

दरवेळी आपणच त्याग का करायचा?आपल्या गटाचे आणि अपक्ष मिळून अजित पवार यांच्याकडे ४५ हून अधिक आमदार आहेत.शिंदेंसेनेच्या तुलनेत आमच्याकडे आमदार फार कमी नाहीत, त्यामुळे जागावाटपात शिंदेंइतक्याच जागा मिळाव्यात यासाठी अजित पवार यांच्यावर त्यांच्याच गटातील नेत्यांनी दबाव आणला असल्याची माहिती मिळाली आहे.लोकसभेला महायुतीच्या हिताचा विचार करून आपण नमते घेतले आणि चार जागांवर समाधान मानले. दरवेळी आपणच त्याग का करायचा, अशी भावना आमच्या गटात असल्याचे संबंधित नेते म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस