शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा अजगर अन् मगरीसारखी, सोबत असतात त्यांना खाऊन टाकते; संजय राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 11:22 IST

ज्यांनी शिवसेनेच्या पाठित खंजीर खुपसला, बेईमानी केली, जे पैशाला विकले गेले त्यांच्यासाठी परत दरवाजे उघडले जाणार नाही असा उद्धव ठाकरेंनी धोरणात्मक निर्णय घेतला आहे असं राऊतांनी सांगितले.

मुंबई - भाजपा अजगर, मगरीसारखी आहे. जे त्यांच्यासोबत गेले त्यांना भाजपाने खाऊन टाकले. भाजपाचा मूळ स्वभाव आणि भूमिका सोडली नाही. गजानन किर्तीकरांसारखा आमचे जुने सहकारी तिथे जाऊनसुद्धा सुखी आनंदी नाहीत याचा अर्थ भाजपाने हा कोंबड्यांचा खुराडा पाळला आहे. त्यातील एक एक कोंबडी कापायला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरेंची भूमिका योग्य होती हे त्यांना कळेल अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि शिंदे गटावर केली आहे. 

संजय राऊत म्हणाले की,  गजानन किर्तीकर सोडून जाणे हे आमच्यासाठी वेदनादायी होते, पण आज ते भाजपा आम्हाला लाथा घालतायेत, नीट वागवत नाही असं सांगतात, मग आम्ही काय वेगळे सांगत होतो. भाजपा शिवसेनेला सावत्रपणाची वागणूक देतेय, म्हणून शिवसेना त्यांच्यापासून वेगळी झाली, फुटलेल्या गटात अस्वस्थता आणि नाराजी आहे. झालेल्या गटातच २ गट पडले आहेत. गजानन किर्तीकरांनी जे सांगितले ती आमची भूमिका आहे. दिलेला शब्द पाळला नाही, शिवसेनेच्या आमदार, खासदारांची कामे रखडवून ठेवली. सत्तेत असताना निधी दिला जात नव्हता. प्रमुख लोकांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला. समान भागीदारी असून शिवसेनेला न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सर्वांशी चर्चा करून एक भूमिका घेतली तेच आज सांगितले जातंय असं त्यांनी म्हटलं. 

गद्दारांना पुन्हा प्रवेश नाही ज्यांनी शिवसेनेच्या पाठित खंजीर खुपसला, बेईमानी केली, जे पैशाला विकले गेले त्यांच्यासाठी परत दरवाजे उघडले जाणार नाही असा उद्धव ठाकरेंनी धोरणात्मक निर्णय घेतला आहे आणि ही महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेची आणि शिवसैनिकांची इच्छा आहे. आम्हाला शिवसैनिकांना तोंड द्यावे लागेल. गद्दारांबद्दल रोष व्यक्त होतोय. आमच्या संपर्कात आहेत, मेसेज देतात. चेहऱ्यावर काहीही असले तरी मनातील भावना गजानन किर्तीकरांनी बोलून दाखवली. जे पक्ष सोडून गेले त्यांना पुन्हा प्रवेश नाही. आमच्याच नाही सर्व पक्षातील लोकांनी हेच करावे असं सांगत राऊतांनी शिंदेसोबत गेलेल्यांसाठी परतीचे दरवाजे बंद केल्याची माहिती दिली. 

देवेंद्र फडणवीसांची दया येते....महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीत आहे. मुख्यमंत्री सातत्याने दिल्लीत हेलपाटे मारतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काय जबाबदारी आहे माहिती नाही. आधी मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते आणि उपमुख्यमंत्री झाले. काल मुख्यमंत्र्यांची गाडी चालवत होते. मला देवेंद्र फडणवीसांची दया आणि किव येते. या संकटातून फडवीसांची सुटका व्हावी ही प्रार्थना आहे असा खोचक टोला राऊतांनी फडणवीसांना लगावला. 

अर्बन नक्षलवाद हे भाजपा सरकारचे अपयश अर्बन नक्षलवाद अद्याप मोडता आला नाही त्याला जबाबदार कोण? गृहमंत्री कोण आहेत? हे तुमचे अपयश आहे. तुमच्या व्यवस्थेविरोधात हे बंड आहे. सरकार कष्टकरी, शेतकरी, बेरोजगारांच्या प्रश्न सोडवण्यात अपयशी पडतेय, त्यामुळे अशा वृत्ती, प्रवृत्ती राज्यात फोफावतायेत. हे तुमच्या सरकारचे अपयश आहे. नक्षलवादाच्या नावाखाली निरपराध, चुकीच्या लोकांना अटक करताय. खोट्या प्रकरणात गृहखात्याचा वापर करून तुम्ही लोकांना नक्षलवादी ठरवताय असा आरोप राऊतांनी भाजपा सरकावर केला.   

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाGajanan Kirtikarगजानन कीर्तीकर