शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

...म्हणूनच वाल्मीक कराडला शरणागती पत्करावी लागली; CM फडणवीसांनी इतर आरोपींनाही दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 16:06 IST

तीन आठवड्यांपासून फरार असलेला वाल्मीक कराड अखेर सीआयडीला शरण आला. पुण्यात वाल्मीक कराडने आत्मसमर्पण केले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. 

खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असल्याचे आरोप होत असलेला वाल्मीक कराड पोलिसांना शरण आला. पुण्यात वाल्मीक सीआयडी कार्यालयात जाऊन वाल्मीक कराडने आत्मसमर्पण केले. त्यानंतर या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही आणि कोणालाही सोडणार नाही, असा इशारा फडणवीसांनी दिला.  

मुंबई माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की, बीडच्या प्रकरणात कुणालाही आम्ही सोडणार नाही. ज्याचा ज्याचा, ज्या ज्या प्रकरणात संबंध आढळेल; त्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल. अतिशय कडक कारवाई करण्यात येईल. गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही", असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. 

"कोणालाही अशा प्रकारची हिंसा करता येणार नाही, खंडणी मागता येणार नाही. यादृष्टीने तपास अतिशय गतिशील केलेला आहे. त्यामुळेच आज त्यांना (वाल्मीक कराड) त्याठिकाणी शरणागती पत्करावी लागली आहे. आता हत्येतील जे आरोपी फरार आहेत, त्यांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या टीम या कामाला लागल्या आहेत. कुठलाही आरोपी आम्ही सोडणार नाही. सगळ्यांना शोधून काढू", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीसांची धनंजय देशमुखांशी चर्चा

मयत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. 

"आज (३१ डिसेंबर २०२४) स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंशी माझी फोनवर चर्चा झाली आहे. त्यांनाही मी आश्वस्त केलेलं आहे की, तुम्ही काळजी करू नका. काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाहीत, तोपर्यंत सगळी कारवाई पोलीस करतील, हा विश्वास मी त्यांना दिला आहे", असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

 

टॅग्स :walmik karadवाल्मिक कराडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBeedबीडMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार