शहरं
Join us  
Trending Stories
1
एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं! शॅम्पेनची ती पेटती बाटली छताला लागली अन्... प्रत्यक्षदर्शीने सांगितला तो थरार!
2
ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर
3
विशेष लेखः भाजप - यश कळसाला, शिस्त तळाला! पक्षाची संस्कृती ढासळली तर...
4
फेब्रुवारीची ही संध्याकाळ आत्ताच बुक करून ठेवा...; आठपैकी सहा ग्रह उघड्या डोळ्यांनी पाहता येणार, सातवी पृथ्वी, ज्यावर तुम्ही असणार...
5
निष्ठेला शिक्षा, सत्तेचा दर्प! इतर पक्षातील इच्छुकांना उमेदवारी द्या, हे कोणत्या सर्वेक्षणातून समोर आले?
6
Numerology: 'या' जन्मतारखांसाठी २०२६ ठरणार 'गोल्डन वर्ष'; पैसा, प्रसिद्धी आणि लक्झरीने भरणार झोळी
7
“मराठी महापौरच हवा असेल तर भाजपा शिवाय पर्याय नाही, ममदानी मुंबईत...”; कुणी केला दावा?
8
ट्रम्प यांचे हात निळे का पडले? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या प्रकृतीचं गूढ वाढलं; खुद्द ट्रम्प यांनीच सांगितलं कारण!
9
ऑनलाईन खरेदी महागात पडली! शूज ऑर्डर केला, होल्डवर पडल्याचा फोन आला अन् ५५ हजार रुपये झटक्यात उडाले
10
तुमची पत्नी गृहिणी आहे आणि SIP चालवतेय, मग टॅक्स नक्की कोण भरणार? जाणून घ्या इन्कम टॅक्सचा महत्त्वाचा नियम
11
Stock Market Today: कमकुवत सुरुवातीनंतर शेअर बाजारात वाढ, निफ्टीत ३० अंकांची तेजी; FMCG इंडेक्स आजही घसरला
12
पहिल्यांदाच जगासमोर आली किम जोंग उन यांची मुलगी; किम जु आए उत्तर कोरियाची पुढची हुकूमशहा बनणार?
13
Astro Tips: २०२६ मध्ये प्रगतीचे शिखर गाठायचे आहे? शेंदरी हनुमानाची 'ही' उपासना सुरु करा!
14
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
15
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
16
१ फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार; ब्रँड अन् लांबीवरून ठरणार किंमत
17
कर्नाटकात बॅनर वादातून रक्तरंजित खेळ! दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी; गोळीबारात एकाचा मृत्यू
18
अखेरच्या क्षणी महिंद्राची टाटाला ओव्हरटेक! तिसऱ्या नंबरवर फेकली गेली; किया, एमजीची चांगली कामगिरी...
19
माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण! ‎​हिडमाच्या खात्म्यानंतर नक्षली बॅकफूटवर: तेलंगणात केले आत्मसमर्पण
20
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
Daily Top 2Weekly Top 5

"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 22:05 IST

"माझा मराठी माणसाला आग्रह आहे की एखाद संकट येईपर्यंत, आपण एकत्र होण्याची वाट कशाला बघायची. आपण नुसते एकवटलो आहोत. तर या संकटाला माघारी जावे लागले. म्हणून आता आलेली जाग आपल्याला कायम ठेवावी लागेल." 

राज्यात, पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याच्या मु्द्द्यावरून राज्यातील राजकारण तापले असतानाच, आज राज्य सरकारने हिंदी भाषेसंदर्भातील निर्णय मागे घेतला. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषा धोरणाचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. यासंदर्भात, आता राज्य सरकारच्या वतीने डॉ नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात येईल आणि या समितीच्या अहवालानंतर त्रिभाषा सूत्र लागू करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. यानंतर, शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया आली आहे. "आज हे आंदोलन केल्यानंतर, आता मराठी माणूस एकत्र होऊ नये, ५ तारखेला आम्ही जो मोर्चा ठरवला, तो मोर्चा होऊ नये, म्हणजे मराठी माणून एकत्र येऊ नये, म्हणून हा जीआर रद्द करण्यात आला," असे ठाकरे यांनी म्हटले आहे. 

ठाकरे म्हणाले, "आज संपूर्ण राज्यभरात हिंदी सक्तीच्या विरोधक आंदोलन करण्यात आले. भाजप सरकारने काढलेल्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरलेली आहे. आपल्या राज्यातील सरकारने मराठी माणसाची एकजूट तोडण्याचा प्रयत्न केला. मराठी मते भाजपकडे खेचायची असा छुपा अजेंडा यामध्ये होता. पण समाधानाची गोष्ट म्हणजे, मराठी माणसाने जी एक समज्यस भूमिका घेतली की, आमचा भाषेला विरोध नाही, तर सक्तीला विरोध आहे. यामुळे इतर भाषिकांनाही कळले की, आपल्या भाषेविरुद्ध नाही, तर या राज्यातील मातृभाषेविरुद्ध जी सक्ती केली जाते, त्या सक्तीच्या विरोधात हे आंदोलन आहे. यामुळे ही फूट पडली नाही."

"या सरकारचा हाच प्रयत्न होता की, मराठी माणसांतील फूट आपल्याला लाभदायक ठरेल, असे त्यांना वाटले होते. म्हणून मराठी माणसांत फूट पाडायची. मराठी माणूस इतक्या मोठ्या प्रमाणात एकवटेल याची सरकारला कल्पना नव्हती. आज हे आंदोलन केल्यानंतर, आता मराठी माणूस एकत्र होऊ नये, कारण ५ तारखेला आम्ही जो मोर्चा ठरवला, तो मोर्चा होऊ नये, म्हणजे मराठी माणून एकत्र येऊ नये, म्हणून जीआर रद्द केला," उसे उद्धव ठाकरे म्हणाले.  भाजप म्हणजे अफवांची फॅक्टरी -ठाकरे पुढे म्हणाले, "मध्यंतरी एक पिक्चर आला होता, हरिश्चंद्राची फॅक्ट्री, तसा भाजप म्हणजे अफवांची फॅक्टरी झालाय. अफवा पसरायच्या, विरोधकांची बदनामी करायची आणि खोट्या मार्गाने विजय प्राप्त करणे हा भाजपचा धंदा झाला आहे. त्या धंद्याला आज मराठी माणसाने चोख उत्तर दिलं आहे. माझा मराठी माणसाला आग्रह आहे की एखाद संकट येईपर्यंत, आपण एकत्र होण्याची वाट कशाला बघायची. आपण नुसते एकवटलो आहोत. तर या संकटाला माघारी जावे लागले. म्हणून आता आलेली जाग आपल्याला कायम ठेवावी लागेल." 

"सर्व मराठी माणसांना मी हात जोडून विनंती करतो की, आपण या सक्तीच्या विरोधात एकवटलो होतो. ती सक्ती मागे घेण्यात आली आहे. तरीही पाच तारखेला आपण मोर्चा काढायचा की सभा घ्यायची, कुठे घ्यायची, कधी घ्यायची, यासंदर्भातील कार्यक्रमासंदर्भात दोन दिवसांमध्ये सगळ्यांसोबत बोलून मी ठरवेल,"  असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारBJPभाजपाShiv Senaशिवसेना