शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर

By admin | Updated: April 2, 2015 04:52 IST

जिल्हा परिषदेने ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. आजघडीला पालघर जिल्ह्यात पाणीटंचाई

पंकज रोडेकर, ठाणे जिल्हा परिषदेने ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. आजघडीला पालघर जिल्ह्यात पाणीटंचाईला सुरुवात झाल्याने तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. ठाणे जिल्ह्यातपाणीटंचाई भासत नसली तरी तेथील काही तालुक्यांमधून टँकरची मागणी होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.या आराखड्यात एप्रिल आणि जून या महिन्यांत ठाणे जिल्ह्यातील १४८ गावे, २६८ पाडे तसेच पालघरमधील ७५ गावे आणि ३६२ पाडे पाणीटंचाईग्रस्त म्हणून प्रस्तावित करण्यात आली आहेत. ही टंचाई दूर व्हावी म्हणून ठाण्यासाठी १८१.३० लाख तर पालघरसाठी २०७.५० लाख अपेक्षित खर्च प्रशासनाने डोळ्यांसमोर ठेवल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर प्रथमच दोन्ही जिल्ह्यांसाठी वेगवेगळे संभाव्य पाणीटंचाईचे कृती आराखडे तयार करण्यात आले. त्यानुसार, आॅक्टोबर २०१४ ते जून २०१५ दरम्यान १७८ गावे तर ३९५ पाडे ठाणे जिल्ह्यात संभाव्य टंचाईग्रस्त असून त्यांच्यासाठी ४११.९५ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यामध्ये आॅक्टोबर ते डिसेंबर २०१४ दरम्यान अपेक्षित खर्च शून्य मांडला होता. जानेवारी ते मार्च २०१५ दरम्यान ३० गावे आणि १२७ पाड्यांमध्ये टंचाई उद्भवण्याची शक्यता वर्तवित त्यासाठी २३०.६५ खर्च अपेक्षित धरला आहे. मात्र, मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यात पाणीटंचाई उद्भवली नसली तरी एप्रिल ते जूनदरम्यान १४८ गावांत, २६८ पाड्यांत पाणीटंचाईची शक्यता वर्तवित त्यासाठी १८१.३० लाख रुपये अपेक्षित धरण्यात आले आहेत. त्याचबरोबर उपाययोजना म्हणून टँकर आणि बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.पालघर जिल्ह्यात आॅक्टोबर २०१४ ते जून २०१५ दरम्यान १०२ गावे तर ४५० पाडे संभाव्य टंचाईग्रस्त असून त्यासाठी २९०.९० लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. त्यामधील आॅक्टोबर ते डिसेंबर २०१४ दरम्यान अपेक्षित खर्च म्हणून ठेवलेल्या २६.२५ लाख रकमेला जिल्हाधिकाऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यात मंजुरी दिली आहे. जानेवारी ते मार्च २०१५ दरम्यान ८३.४० खर्च अपेक्षित धरला होता. या वेळी २७ गावे आणि ८८ पाड्यांमध्ये टंचाई उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार, मोखाडा आणि जव्हारमध्ये पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मोखाड्यात दोन तर जव्हारात एका टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिल ते जून २०१५ दरम्यान ७५ गावे आणि ३६२ पाड्यांत संभाव्य टंचाई डोळ्यांसमोर ठेवून २०७.५० लाख खर्च अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.