शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ५१४ रुग्ण वाढीसह ४० जणांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 21:50 IST

Coronavirus: ठाणे जिल्ह्यातील महापालिकांसह गांवपाड्यात गेल्या २४ तासात मंगळवारी ५१४ कोरोना रुग्णांची वाढ झाली ४० जणांचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटकर्क 

ठाणे : जिल्ह्यातील महापालिकांसह गांवपाड्यात गेल्या २४ तासात मंगळवारी ५१४ कोरोना रुग्णांची वाढ झाली ४० जणांचा मृत्यू झाला. आता मृतांची संख्या ९ हजार २८८ झाली . तर आतापर्यंत रुग्ण संख्या पाच लाख १६ हजार ९०३ नोंदली आहे.

ठाणे शहर परिसरात आज १२४ रुग्णांची वाढ होऊन तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात एकूण एक लाख २९ हजार १०४ रुग्णांसह एक हजार ९०४ मृतांची नोंद झाली. कल्याण डोंबिवलीला ११५ रुग्णांची वाढ तर २० मृत्यू झाले आहेत. या शहरातील रुग्ण संख्या एक लाख ३३ हजार १६० झाली असून मृतांची संख्या आता दोन हजार २५ नोंदली आहे. 

उल्हासनगरात ३३ रुग्ण आढळले असून एक मृत्यू झाला आहे. येथील मृतांची संख्या आता ४७४ झाली असून रुग्ण संख्या २० हजार ४८८ नोंद झाली आहे. भिवंड शहरात सहा रुग्ण आढळले असता एक मृत्यू झाला आहे.  या शहरात १० हजार ४६४ रुग्णांसह ४४० मृतांची नोंद करण्यात आली. मीरा-भाईंदरलाही ५६ रुग्णांच्या वाढीसह आज तीन मृत्यू झाले. येथील रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार ३७ झाली असून मृतांची संख्या एक हजार २७८ नोंद झाली.

अंबरनाथ शहरात १९ रुग्ण वाढल्याने येथील रूग्ण संख्या आता १९ हजार ३१५ झाली. तर ४०७ मृतांची नोंद करण्यात आली. बदलापूरला २५ रुग्णांची वाढ होऊन एकही मृत्यू नाही. एकूण २० हजार ६०९ रुग्ण संख्या झाली असून २१५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. ग्रामीण भागात ६० रुग्ण आढळले असून सहा मृत्यू झाले आहेत. आता जिल्ह्यातील या गांवपाड्यात ३६ हजार ६३३ रुग्णांसह ८९४ मृतांची नोंद करण्यात आली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे