शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

घटक पक्षांना मंत्रीपदे देण्यास ठाकरे-पवार सकारात्मक ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 12:34 IST

बच्चू कडू, जयंत पाटील, राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीला आणि समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

मुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आघाडीसोबत राहिलेल्या घटक पक्षांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे घटक पक्षांच्या मंत्रीपदांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार सकारात्मक असल्याचे सांगण्यात येत आहे. 

महाआघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, प्रहार संघटना आणि शेतकरी कामगार पक्षांनी साथ दिली. त्यामुळे या पक्षांच्या नेत्यांना मंत्रीपद मिळण्याचा संभव आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला अनुकूल वातावरण होते. त्या परिस्थितीत देखील हे घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिशी राहिले होते. 

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला राज्यातील सत्ता मिळविण्याचा मार्ग सुकर झाला असल्याचे सांगण्यात येत होते. मत चाचण्यांमध्येही ते दाखविण्यात आले होते. त्यामुळे महाआघाडीला पुन्हा एकदा विरोधात बसावे लागणार अशी स्थिती होती. तरी देखील घटक पक्षांनी आघाडीची साथ सोडली नाही. त्यांनी भाजपविरुद्ध एकवटून लढा दिला. 

पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी आघाडीला दोन्ही निवडणुकीत विनाअट पाठिंबा दर्शविला होता. तर भाजपने अजित पवारांच्या मदतीने सरकार स्थापन केल्यानंतर देखील बच्चू कडू यांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शविला होता. तर राजू शेट्टी देखील शेतकरी प्रश्नी आघाडीत सामील झाले होते. शेकापमुळे आघाडीला अनेक जागांवर फायदाच झाला. या घटक पक्षांनी अडचणीच्या काळातही आघाडीची साथ सोडली नाही. त्यामुळे त्यांना याचे फळ मिळण्याची शक्यता असून बच्चू कडू, जयंत पाटील, राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीला आणि समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.