शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

“KCR यांची वकिली बावनकुळे कधीपासून करायला लागले? तुमच्या पक्षाकडे बघा”; राऊतांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 12:17 IST

Sanjay Raut Vs BJP: भाजपमध्ये बी टीम तयार करण्याचे एक स्वतंत्र कक्ष आहे. महाविकास आघाडी प्रत्येक लढाईसाठी समर्थ आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

Sanjay Raut Vs BJP: भारत राष्ट्र समिती पक्षाचा विस्तार करण्याच्या दृष्टीकोनातून के. चंद्रशेखर राव यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आपल्या मंत्रिमंडळासह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. पंढरपुरात दर्शन घेतल्यानंतर केसीआर यांनी तुळजाभवानीचेही दर्शन घेतले. यावरून राज्यातील राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

केसीआर यांना मतविभाजनासाठी भाजपने महाराष्ट्रात बोलावल्याची टीका ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना महाविकास आघाडीला केसीआर यांची भीती असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते. केसीआर यांचे नावही आम्हाला माहिती नाही. मग आमची बी टीम कशी असेल? मविआलाच केसीआर यांची भीती आहे. म्हणून ते केसीआर यांना आमची बी टीम म्हणत आहेत. मविआला जेव्हा पराभवाची भीती असते, तेव्हा ते असा आरोप करतात, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते. याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले. 

KCR यांची वकिली बावनकुळे कधीपासून करायला लागले? तुमच्या पक्षाकडे बघा

संजय राऊत म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळेंना इतके महत्त्व देण्याची गरज नाही. चंद्रशेखर बावनकुळे स्वत:च भाजपाची ‘सी टीम’ आहेत. त्यांच्या हातात काहीही नाही. सगळे काही दिल्लीहून ठरते. महाराष्ट्रात आता भाजपची धुरा ना देवेंद्र फडणवीसांकडे आहे ना बावनकुळेंकडे. सगळे दिल्लीच्या आदेशांवर चालते. के चंद्रशेखर राव यांची वकिली बावनकुळे कधीपासून करायला लागले? तुमच्या पक्षाकडे बघा, या शब्दांत संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. तसेच मी फक्त एवढेच म्हटले की भाजपने महाराष्ट्रात निवडणुका जिंकण्यासाठी किती बी टीम, सी टीम बनवून ठेवल्या आहेत. आता ही नवीन टीम बनवली आहे. २०१९ला त्यांनी एमआयएमला बी टीम बनवले होते. कधी आणखी कुणाला करतात. नंतर काम झाले, की रात गई, बात गई, असे संजय राऊत म्हणाले. 

दरम्यान, आता त्यांनी केसीआर साहेबांना बोलवले आहे. पण महाविकास आघाडी प्रत्येक लढाईसाठी समर्थ आहे, आम्ही लढाई लढू आणि जिंकू. भाजपत बी टीम तयार करण्याचे एक स्वतंत्र कक्ष आहे. कधी ते मनसेला वापरतात, कधी एमआयएमला वापरतात, कधी केसीआर यांना बोलवतात. हे त्यांचं धोरण आहे. पण २०२४ ला त्यांनी असे कितीही प्रयोग केले तरी मविआ मजबुतीने सगळ्यांशी लढा देईल, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. 

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे