शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

“... तर लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांना विजयी करु”; ठाकरे गटातील आमदाराने केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 13:14 IST

Shiv Sena Thackeray Group News: कोणत्याही परिस्थितीत भाजपला जिंकू देणार नाही, असा एल्गार ठाकरे गटाच्या आमदाराने केला आहे.

Shiv Sena Thackeray Group News: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अन्य पक्षांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही तयारीला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे विविध विभागांतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका मातोश्रीवर घेत आहेत. विरोधकांच्या इंडिया आघाडीसह भाजप तसेच शिंदे गटाला चितपट करण्यासाठी ठाकरे गटाकडून रणनीति आखली जात असल्याचे सांगितले जात आहे. यातच लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांना विजयी करू, असे ठाकरे गटातील आमदाराने म्हटले आहे. 

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला जोरदार फटका बसला होता. लोकसभा निवडणुक जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची लवकरच चर्चा होणार आहे. त्यानंतरच कोणती जागा कुणाला याचा निर्णय होणार आहे. मात्र, त्याधीच प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भात बोलताना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी प्रकाश आंबेडकरांना विजय करू, असे म्हटले आहे. 

... तर लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांना विजयी करु

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अकोला लोकसभा आणि जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा घेतला. यावेळी अनेक विषयावर चर्चा झाली. भाजपला पराभूत करायचे असेल तर ही जागा नक्कीच शिवसेनेला मिळावी असे मत आम्ही मांडले. गेल्या अनेक वर्षांपासून अकोल्यात काँग्रेसचा पराभव होत आहे त्यामुळे ही जागा आपल्याकडे असावी. यावेळी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी आपल्यासोबत आहेच. पण, त्यांनी केवळ लोकसभेपुरते राहू नये. विधानसभेला आपल्यासोबत सोबत राहायला हवे. अकोला लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी. जर शिवसेनेला ही जागा मिळणार नसेल आणि येथून वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर लढणार असतील तर आम्ही त्यांनादेखील विजयी करू. कोणत्याही परिस्थितीत भाजपला ही जागा जिंकू देणार नाही, असे नितीन देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितले. 

दरम्यान, दुसरीकडे संजय राऊत हे मुंबईतील ईशान्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. ठाकरे गटासह महाविकास आघाडीत जोरदार हालचाली सुरू झाल्या असल्याचे सांगितले जात आहे. संजय राऊत यांनी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवल्यास त्यांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक असेल असे सांगितले जात आहे. संजय राऊत हे राज्यसभेवर चार वेळा निवडून आले आहेत. 

 

टॅग्स :Nitin Deshmukhनितीन देशमुखPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरShiv SenaशिवसेनाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीlok sabhaलोकसभा