शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

महाविकास आघाडीतून ठाकरे गट बाहेर पडणार?; त्यांच्याच खासदाराच्या दाव्यानं भुवया उंचावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 15:45 IST

Maharashtra Political Crisis: ठाकरे गटातील नेत्याने मोठे विधान केले असून, महाविकास आघाडी फुटणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Political Crisis: अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्याच्या राजकारणात मागील साडेतीन वर्षांत तिसरा महाभूकंप झाला. यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारांना परत येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. यातच आता महाविकास आघाडी टिकणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण शिवसेना उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या एका खासदाराने याबाबत विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी फूट पडली. विरोधीपक्षनेते असलेले अजित पवार यांनी बंड केले आणि शिंदे भाजप सरकारमध्ये सामील झाले. आता राष्ट्रवादीमध्ये दोन गट तयार झाले असून महाविकास आघाडीची पुढची दिशा काय असेल यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यासंदर्भात बैठकांचे सत्र सुरू असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची एक महत्त्वाची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

ठाकरे गट आता स्वबळावर निवडणुका लढवणार?

शिवसेना ठाकरे गटातील आमदारांची मुंबईत बैठक होणार असून महाविकास आघाडी आणि पुढील वाटचालीचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडून येणाऱ्या निवडणुकात स्वबळावर लढेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचे कारण म्हणजे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर मोठे विधान केले आहे. उद्धव ठाकरे दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करतील. परंतु, एक मात्र नक्की की, महाराष्ट्रातील सर्व जनतेला आणि शिवसैनिकांना असे वाटतेय की, उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र चलो, अकेला चलो हा नारा द्यावा आणि राजकारणाच्या पुढच्या सर्व कामकाजात सहभागी व्हावे. अशा प्रकारची भावना महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची आहे, असे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, शिवसेना पक्षातून एकनाथ शिंदे यांनी मोठे बंड केले. एकनाथ शिंदे ४० आमदार घेऊन भाजपकडे गेले आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यानंतर एकाच वर्षामध्ये राष्ट्रवादीतही फूट पडल्याने मोठा राजकीय भूकंप झाला असून, आता महाविकास आघाडीमध्ये काही बिघाड होतोय का, याकडे लक्ष असणार आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षVinayak Rautविनायक राऊत Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी