शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

"दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवल्यानं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 14:00 IST

सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाला भाजपानं विकत घेतलंय का? असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला. 

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कुणी मुख्यमंत्री मानायलाच तयार नाही. महाराष्ट्र नेहमी औद्योगिकदृष्ट्या प्रगतशील राज्यांमध्ये गणलं गेले. पण गेल्या ६-७ महिन्यापासून महाराष्ट्र देशाच्या खिजगणतीत अजिबात नाही. महाराष्ट्राचा विकास आणि प्रगती ज्यांना आवडत नव्हती त्यांनी उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडलं. आत्ताचे मुख्यमंत्री हे दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती आहेत अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात केला आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र देशात पहिल्या ५ मध्ये होते. त्यानंतर ४ मध्ये आले. त्यानंतर हळूहळू महाराष्ट्र आणि राज्याचे मुख्यमंत्री पहिल्या क्रमांकावर जाण्याची गती प्राप्त करत असताना हे सरकार पाडण्यात आले. कुठेतरी महाराष्ट्राचे पंख कापले जावेत. महाराष्ट्राची प्रगती, विकास काहींना पाहवत नव्हता त्यासाठी हे सरकार पाडून फक्त दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर बसवल्याने या महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे अशी टीका त्यांनी केली. 

त्याचसोबत देवेंद्र फडणवीस, शिंदे गटाचे प्रमुख नेते आणि मंत्री असतील, नारायण राणे यांच्यासारखे केंद्रीय मंत्री असतील ते निवडणूक आयोग जी स्वायत्त संस्था आहे आणि सुप्रीम कोर्ट या दोन्हींचे निकाल फुटलेल्या शिंदे गटाच्या बाजूनेच येतील. तुम्ही आनंदोत्सव साजरा करण्याच्या तयारीला लागा अशी भाषा करत असतील तर याचा अर्थ सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाला भाजपानं विकत घेतलंय का? असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला. 

दरम्यान, ज्या गोल्डन गँगचं काम महाराष्ट्रात सुरू आहे त्याला सोनेरी टोळी म्हटलं पाहिजे. मंत्रालयात, मंत्र्यांच्या बंगल्यात आणि बाहेर काही ठिकाणी अनेक गोष्टी सुरू आहेत. गोल्डन गँग हाच विषय पत्रकार समोर आणतायेत. या गोल्डन गँगचा पत्रकारांनी शोध घ्यावा असं आवाहन करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधला आहे. आजच्या सामना अग्रलेखात ठाकरे गटाने मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. गोल्डन गँगचे सदस्य भगतसिंह कोश्यारीही हेदेखील आहेत असंही अग्रलेखातून म्हटलं आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा