शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

“भाजपा काँग्रेसला घाबरते, PM भाषणात काश्मिरी पंडित, मणिपूरचा उल्लेखही नाही”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 12:47 IST

Sanjay Raut News: खोटारडेपणावरच भाजपा टिकून आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.

Sanjay Raut News: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील चर्चेचा उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएचा पुढील पाच वर्षांचा रोडमॅप सादर करताना काँग्रेसवर सडकून टीका केली. या टीकेनंतर भाजपा आणि केंद्र सरकारविरोधात विरोधकांनी हल्लाबोल केला असून, भाजपालाकाँग्रेसची भीती वाटते, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजपाला काँग्रेसची भीती वाटते. इंडिया आघाडीची भीती आहे. तुम्हाला तुमच्या हिंमतीवर, ताकदीवर ४०० जागा मिळणार आहेत, असे तुम्ही म्हणता ना. मग गेल्या १० वर्षांत तुम्ही वारंवार काँग्रेसवर टीका का करताय? ५०-६० वर्षांचा इतिहास तोडून-मोडून लोकांसमोर का सांगताय? तुम्ही केलेल्या कामांविषयी बोला. पंतप्रधानांच्या भाषणात कुठेही मणिपूरचा उल्लेख आला नाही. काँग्रेसमुळे राष्ट्र कसे दुभंगले, असे सांगता. मणिपूर दुभंगले आहे. तुमच्या मनात मणिपूरबद्दल थोडीही वेदना नसावी? तुम्ही कश्मिरी पंडितांविषयी एक शब्द बोलला नाहीत. ज्या कश्मिरी पंडितांच्या नावावर २०१४ला तुम्ही मते मागितली. त्यांच्या घरवापसीवर आधी तुम्ही बोलत होतात. पण आता त्यांच्यावर तुम्ही बोलला नाहीत. लडाखमध्ये चीन घुसलाय त्यावर तुम्ही बोलला नाहीत. पण फक्त पंडित नेहरू आणि काँग्रेसचे भजन करत बसलात. आता हे रामालाही विसरले आणि पुन्हा काँग्रेसच्या मागे लागलेत, या शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला.

श्वेतपत्रिकेत सिंचन घोटाळ्याची पुरवणी जोडा

केंद्र सरकार २०१४पूर्वीच्या गैरव्यवहारांवर श्वेतपत्रिका काढणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले होते. यावर, त्यांनी श्वेतपत्रिका काढायलाच पाहिजे. त्याला एक पुरवणी जोडली पाहिजे. त्यात ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांचा २ हजार कोटींचा नळ-पाणी घोटाळा, हसन मुश्रीफ यांचा घोटाळा, प्रफुल्ल पटेल यांचा मिरची घोटाळा, अलिकडचा ८ हजार कोटींचा घोटाळा यांचा समावेश करावा. तरच ती श्वेतपत्रिका पूर्ण होईल. भाजपाने असे अपूर्ण काम करून सरकारमधून बाहेर पडू नये. ज्या भ्रष्टाचाराचा उद्घोष नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून केला तो अजित पवारांचा ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा भाजपाला विसरता येणार नाही. कारण तो यूपीएच्या काळातलाच घोटाळा होता, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

दरम्यान, भंडारा मतदारसंघात काँग्रेसने आंबेडकरांचा पराभव केला, असे सांगितले. पण गंमत अशी आहे, की तेव्हा बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसचे उमेदवार नव्हते. पण त्यांचा पराभव करण्याची जबाबदारी तेव्हा ज्यांच्यावर होती, ते तिकडचे काँग्रेसचे नेते मनोहर पटेल यांचे चिरंजीव प्रफुल्ल पटेल हे आज भाजपामध्ये आहेत. मनोहर पटेल तेव्हा भंडाऱ्याच्या निवडणुकीचे प्रमुख होते. तेव्हा काँग्रेसच्या विजयाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्या प्रफुल्ल पटेलांना तुम्ही वाजत-गाजत पक्षात घेतले. त्यामुळे हा ढोंगीपणा भाजपाच्या धमन्यांतून कधी बाहेर पडेल सांगता येत नाही. खोटारडेपणावरच हा पक्ष टिकून आहे. पंडित नेहरूंच्या संदर्भात त्यांनी केलेली वक्तव्य हे नेहरूंचे यश आहे. गेल्या १० वर्षांत मोदी त्यांच्या नावाचा जप करतायत. जेव्हा मोदी पदावरून दूर होतील, तेव्हा त्यांचे स्मरण कुणाला राहणार नाही, असा दावा संजय राऊतांनी केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी