शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Maharashtra Politics: “शरद पवारांना ओळखायला १०० जन्म घ्यावे लागतील, फक्त २४ मिनिटांत मविआचा मार्ग मोकळा झाला”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 17:38 IST

Maharashtra News: शरद पवारांनी जे सांगितले ते सत्य आहे. अन्यथा राष्ट्रपती राजवट कायम ठेवली असती, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या गौप्यस्फोटानंतर अद्यापही यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीला या प्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अधिक भाष्य केले नव्हते. मात्र, आता यासंदर्भात शरद पवारांनी एक विधान केले आहे. यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य करताना, शरद पवारांना ओळखायला १०० जन्म घ्यावे लागतील, असे म्हटले आहे. 

सरकार स्थापन करताना आम्ही आमदारांचे बहुमत दाखवले असते तरी राजभवनातील राज्यपालांनी बहुमतासाठी आमदारांची डोकी मोजायलाच पाच वर्षे लावली असती. पहाटेच्या शपथविधीमुळे कोंडी फुटली. लख्ख उजाडले. पहाटेच्या शपथविधीमुळे फक्त २४ मिनिटांत राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली. यामुळे महाविकास आघाडीचा मार्ग मोकळा झाला, असे संजय राऊत म्हणाले. 

शरद पवार यांनी जे सांगितले ते सत्य आहे

शरद पवार यांनी जे सांगितलं ते सत्य आहे. शरद पवार यांना ओळखायला १०० जन्म घ्यावे लागतील, असे मी म्हणालो होतो. तेव्हा माझ्यावर टीका झाली होती. तुम्हाला आता काय ते कळलेच असेल. शरद पवार यांना पहाटेच्या शपथविधीविषयी माहिती होते की नाही, याबाबत मला कल्पना नाही. पहाटेच्या शपथविधीची महाविकास आघाडी सरकारची स्थापना होण्यास मदत झाली. अन्यथा आमच्याकडील बहुमत तोडण्यासाठी राष्ट्रपती राजवट कायम ठेवली असती. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानतो, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

दरम्यान, सरकार बनवण्याचा एक प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा फायदा एकच झाला की राष्ट्रपती राजवट होती ती उठली. ती उठल्यानंतर काय घडले ते तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. राज्यात तेव्हा तसे काही घडले नसते तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? आणि उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले असते का? असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी