शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

भाजपाचे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस? संजय राऊतांची संतापले; म्हणाले, “होऊच शकते कारण...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 12:33 IST

Thackeray Group MP Sanjay Raut News: भाजपाच्या सत्तेकडे नैतिकता नावाचा कोणताही प्रकार नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली.

Thackeray Group MP Sanjay Raut News:  देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. परंतु, अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीचा निर्णय झालेला दिसत नाही. एकनाथ शिंदे अजूनही गृहखात्यावरील दावा सोडलेला नसल्याचे सांगितले जात आहे. यातच भाजपा महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देताना भाजपावर निशाणा साधला.

विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३० हून अधिक जागा मिळवून बहुमतासह राज्यात सरकार बनवले. त्यातच मविआचे अनेक खासदार भाजपाच्या संपर्कात आले आहेत. विशेषत: शरद पवार गटाचे खासदार भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याने भाजपा पवारांना पुन्हा एकदा धक्का देण्याच्या तयारीत आहे. याबाबत भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी दावा केला आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

भाजपा कोणतेही ऑपरेशन लोटस करू शकते 

भाजपा कोणतेही ऑपरेशन लोटस करू शकते. कारण त्यांच्याकडे पैसा आणि यंत्रणा आहे. याआधीही अशा प्रकारे माणसे फोडलेले आहेत. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्यासारखी माणसे का पळून गेले? भीती पोटीच गेले ना? ते पण ऑपरेशन लोटस नव्हते तर ऑपरेशन डर होते. त्यामुळे ते घाबरून तिकडे गेले. भाजपाबरोबर गेल्यानंतर त्यांची जप्त केलेली संपत्ती परत द्यायची. हे असे सुरु आहे. भाजपाच्या सत्तेकडे नैतिकता नावाचा कोणताही प्रकार नाही. आता २० दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसेल. गृहखाते कोणाकडे द्यायचे हे ठरत नसेल तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न गंभीर होत चालला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

दरम्यान, भाजपा नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, निश्चितपणे मविआचे खासदार-आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. मविआचे खासदार विशेषत: शरद पवारांचे खासदार आहेत तिथे महायुतीचे आमदार निवडून आले. विकास त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. पुढील राजकीय भवितव्याचा विचार करत ते हालचाली करत आहेत. केंद्रात भाजपा युतीचे आणि राज्यात भाजपा महायुतीचे सरकार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचा आग्रह, ज्यासाठी आपण निवडणूक लढवतोय तो विकास त्यातून शरद पवारांच्या पक्षातील खासदार भाजपासोबत येण्याचा विचार करू शकतात, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा