शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल; सनातन धर्मावरून भाजपाला सुनावले खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 13:06 IST

डरपोक आणि बेकायदेशीर सरकार आहे. प्रत्येक संकटापासून हे सरकार पळून जाते. तोंडाला पाने पुसली जातात असा आरोप त्यांनी केला.

छत्रपती संभाजीनगर – सनातन धर्मावर आम्हाला अक्कल शिकवतायेत. एकातरी बेगडी सनातन धर्मवाल्यांनी काश्मीरातील जे अधिकारी शहीद झाले त्यांच्याविषयी सहवेदना व्यक्त केल्या का? पंतप्रधानांना ह्दय नावाची गोष्ट आहे की नाही. सनातन धर्मात मानवता येते, कुठे आहे तुमची माणुसकी? जवान देशाच्या सीमेवर मरतायेत आणि तुम्ही स्वत:वर फुले उधळतायेत. यालाच हुकुमशाही म्हणतात आणि याचविरोधात आम्ही एकत्रित येऊन इंडिया आघाडी लढतेय असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केला आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, देशाचे गृहमंत्री अमित शाह मराठवाड्यात येणार होते, म्हणून मी त्यांच्या स्वागतासाठी इथं आलो. देशातील आणि मराठवाड्यातील काही प्रश्नांबाबत त्यांच्याशी चर्चा करायची होती. मराठवाडा मुक्ती संग्रामाला ७५ वर्ष झाली. हा अमृतकाळ फक्त कागदावर आहे. मराठवाड्याची अवस्था काय हे पाहतोय, अमित शाहांचा दौरा आणि कॅबिनेट बैठकीला गालबोट लागू नये यासाठी जालनातील उपोषण काही करून संपवावे असे दिल्लीतून आदेश होते. जालनातील आंदोलन ऐतिहासिक होते, मुख्यमंत्री आले २ उपमुख्यमंत्री पळून गेले. याठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी यायला हवं होते, हा संपूर्ण सरकारचा प्रश्न आहे, एकटे मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाहीत. डरपोक आणि बेकायदेशीर सरकार आहे. प्रत्येक संकटापासून हे सरकार पळून जाते. तोंडाला पाने पुसली जातात असा आरोप त्यांनी केला.

हा आमचा सनातन धर्म नाही

या देशाची परिस्थिती बिकट आहे. काश्मीरात कर्नल, मेजर आणि डीएसपी यांची दहशतवाद्यांकडून हत्या झाली, ते शहीद झाले. काश्मीर खोऱ्यात अनंतनागमध्ये ही घटना घडली. सारा देश दु:खसागरात बुडला होता. वरिष्ठ अधिकारी शहीद झाले आणि आमचे पंतप्रधान दिल्लीत पक्षाच्या कार्यालयात स्वत:वर फुले उधळून घेत होते. दिल्लीत बॉम्बस्फोट झाले होते, तिथे शिवराज पाटील गेले होते. त्यानंतर त्यांनी शर्ट बदलला होता. त्यामुळे शिवराज पाटील चाकूरकर यांना राजीनामा द्यायला लागला होता. परंतु काल देशात जवान शहीद झाले आणि पंतप्रधान, भाजपा पक्ष दिल्लीतील मुख्यालयात उत्सव साजरा करतोय, स्वत:वर फुले उधळून घेतोय हा त्यांचा सनातन धर्म आहे, हा आमचा सनातन धर्म नाही, हा त्यांचा भारत वेगळा आहे, हा आमचा भारत नाही असंही संजय राऊतांनी म्हटलं.

त्याचसोबत हे ४ जवान शहीद झाले ते भारताचे सुपूत्र होते, नुसते राजकीय कारणासाठी इंडियाचे भारत केले म्हणून हे प्रश्न सुटणार नाहीत. हे ढोंग बंद करा. ४ जवानांचे हौताम्य हासुद्धा सनातन धर्माचा भाग होता आणि तुम्ही स्वत:वर फुले उधळून घेताय. हे सगळे प्रश्न आम्हाला देशाच्या गृहमंत्र्यांना विचारायचे होते. देशातील अंतर्गत सुरक्षा, बाह्य सुरक्षा ही त्यांची जबाबदारी होती. देशाचे जवान मरतायेत आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह भाजपा कार्यालयात उपस्थित होते. देश कोणत्या दिशेने चालला आहे? अशी टीका राऊतांनी केली.

महाराष्ट्र सरकार बेकायदेशीर

महाराष्ट्रात काही वेगळे चित्र नाही, या बेकायदेशीर सरकारचा निकाल ४० दिवसांत काय ४० तासांत लागायला हवा होता. पण हे बेकायदेशीर सरकार राज्यात १ वर्षाहून अधिक काळ राज्य करतंय, बेकायदेशीर निर्णय घेतंय. महाराष्ट्राची प्रतिष्ठापणाला लावतंय, सर्वोच्च न्यायालयाने हे सरकार बेकायदेशीर आहे असे मे महिन्यात सांगितले. राज्यपालांची कार्यवाही बेकायदेशीर आहे असं म्हटलं. परंतु विधानसभेचे अध्यक्ष गेल्या ६ महिन्यांपासून सुनावणी घ्यायला तयार नाही आणि काल सुनावणी घेतली तर पुन्हा २ आठवड्यांची मुदत दिली. हे बेकायदेशीर सरकार मराठवाड्यात येत आहे. या सरकारला कुठलेही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. घेतलेले निर्णय बेकायदेशीर ठरणार आहेत. प्रशासन या सरकारवर खर्च करतंय त्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब द्यावा लागेल असा इशारा राऊतांनी दिला.

त्याघोषणांचे काय झाले?

मराठवाडाच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी सरकार इथं येतंय. २०१६ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ४९ हजार कोटींच्या घोषणा केल्या होत्या. त्यातील एक रुपया इथं आलाय का? लातूर असेल, उस्मानाबाद, बीड, छत्रपती संभाजीनगर काय झालंय या घोषणेचे? सव्वा लाख लोकांना दूध डेअरी प्रकल्पातून रोजगार देण्याच्या घोषणा केली होती. काय झाले त्याचे? असा सवाल राऊतांनी केला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस