शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

माझी हात जोडून विनंती आहे की...; संजय राऊतांचा अण्णा हजारेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 11:35 IST

अण्णा हजारेंना जाग आलीय ही मोठी गोष्ट आहे असं संजय राऊतांनी म्हटलं.

मुंबई – गेल्या काही वर्षापासून अण्णा हजारे काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती. अण्णाने थेट मणिपूर घटनेवर बोलले, मणिपूरसोबत अन्यही विषय आहेत. भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे नेते म्हणून अण्णा हजारेंची ओळख आहे. पण महाराष्ट्रात काय चाललंय? भाजपाने पुराव्यासह ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सगळे शपथ घेऊन भाजपा सरकारमध्ये मंत्री झालेत. अण्णा हजारेंनी यावर आवाज उठवायला हवा. अजित पवार, हसन मुश्रीफ असतील किंवा इतर यांच्यावर भ्रष्टाचाराचे शेकडो रुपयांचा गंभीर आरोप आहे. अण्णा हजारेंनी या विषयावर भूमिका घेऊन एका आंदोलनाची घोषणा केली पाहिजे आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत असं आवाहन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना केले आहे.

संजय राऊत म्हणाले की, मणिपूर या विषयावर अख्खा देश रस्त्यावर आहेत. सगळे त्यावर बोलत आहेत. मधल्या काळात अनेक विषय झाले, महिला कुस्ती पटूबाबत विषय आहे ज्यात थेट भाजपाचा संबंध आहे. आम्ही वाट बघत होतो अण्णा हजारे त्यावर बोलतील, भूमिका घेतील. राज्यात सगळे ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी मंत्रिमंडळात आहेत. भ्रष्टाचाऱ्यांचा सत्कार पंतप्रधान दिल्लीत करतायेत. महाराष्ट्रात अण्णा हजारेंची ओळख आहे. अण्णा हजारेंची प्रतिमा आहे. दादा भुसे, राहुल कुल, अब्दुल सत्तार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रकरणे मी बाहेर काढली. ते अण्णांच्या डोळ्यासमोर आहे. अण्णा हजारे यांना माझी हात जोडून विनंती आहे. तुम्ही नेहमी देश वाचवण्यासाठी भूमिका घेतली आहे. रामलीला, जंतरमंतर याठिकाणी अण्णा हजारेंनी आंदोलन केले. अण्णांच्या आंदोलनामुळे आज भाजपा सत्तेत आहे आणि काँग्रेस सत्तेतून गेली. आज त्याच भाजपाच्या भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारेंनी रणशिंग फुंकण्याची गरज आहे असं राऊतांनी म्हटलं.

तसेच अण्णा हजारेंना जाग आलीय ही मोठी गोष्ट आहे. देशात भ्रष्टाचार वाढलाय, बलात्कार वाढलेत आम्ही अण्णा हजारेंना म्हटलं अण्णा उठा, रामलीला मैदान, जंतरमंतरला जाऊया. तेव्हा अण्णा कुठे होते? जंतरमंतरवर महिला कुस्तीपटू आंदोलन करत होते तेव्हा अण्णा कुठे होते? मणिपूर हिंसाचारावर आज देश बोलतोय. त्यात अण्णा हजारे बोलले त्यात नवीन काय असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला.  

हे धोरण अतिशय घोतक

देवेंद्र फडणवीस यांनी चक्की पिसिंगचा नारा दिला आज सगळेच भ्रष्टाचारी भाजपात गेले आणि शुद्ध झाले. स्वत:चा जीव वाचवायला अनेक जण भाजपात गेले. काही दिवसांनी सगळ्या गोष्टींचा खुलासा होईल. सत्तेत नाही असे जे आमदार आहेत ते लोकांचे प्रतिनिधित्व करत नाही का? मतदारसंघाचा विकास करण्याचा अधिकार नाही का? पण या देशात जो आमच्यासोबत येईल मग तो भ्रष्टाचारी असेल, व्यभिचारी असेल त्यांनाच विकासकामांसाठी निधी दिला जाईल. हे धोरण अतिशय घातक आहेत असा आरोपही राऊतांनी केला.

मुख्यमंत्रिपदाचे आसन अस्थिर

दरम्यान, अजित पवार आल्यापासून मुख्यमंत्रिपदाचे आसन अस्थिर झालेले आहे. एक मोदी सबपर भारी अशी घोषणा आहे मग त्यांना ३८-४० कशाला लागतायेत. एनडीएला काय करायचे ते करू द्या. पण इंडिया ही २०२४ च्या निवडणुकीत सत्तेत येण्यासाठी स्थापन झाली आहे. कालपर्यंत मोदींना एनडीए आठवला नाही का? असा सवाल संजय राऊतांनी केला.    

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतanna hazareअण्णा हजारेBJPभाजपा