शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
2
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
3
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात
4
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
5
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
6
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
7
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
8
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
9
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
10
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
11
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
12
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
13
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
14
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
15
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
16
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
17
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
18
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
19
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
20
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन

माझी हात जोडून विनंती आहे की...; संजय राऊतांचा अण्णा हजारेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 11:35 IST

अण्णा हजारेंना जाग आलीय ही मोठी गोष्ट आहे असं संजय राऊतांनी म्हटलं.

मुंबई – गेल्या काही वर्षापासून अण्णा हजारे काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती. अण्णाने थेट मणिपूर घटनेवर बोलले, मणिपूरसोबत अन्यही विषय आहेत. भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे नेते म्हणून अण्णा हजारेंची ओळख आहे. पण महाराष्ट्रात काय चाललंय? भाजपाने पुराव्यासह ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सगळे शपथ घेऊन भाजपा सरकारमध्ये मंत्री झालेत. अण्णा हजारेंनी यावर आवाज उठवायला हवा. अजित पवार, हसन मुश्रीफ असतील किंवा इतर यांच्यावर भ्रष्टाचाराचे शेकडो रुपयांचा गंभीर आरोप आहे. अण्णा हजारेंनी या विषयावर भूमिका घेऊन एका आंदोलनाची घोषणा केली पाहिजे आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत असं आवाहन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना केले आहे.

संजय राऊत म्हणाले की, मणिपूर या विषयावर अख्खा देश रस्त्यावर आहेत. सगळे त्यावर बोलत आहेत. मधल्या काळात अनेक विषय झाले, महिला कुस्ती पटूबाबत विषय आहे ज्यात थेट भाजपाचा संबंध आहे. आम्ही वाट बघत होतो अण्णा हजारे त्यावर बोलतील, भूमिका घेतील. राज्यात सगळे ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी मंत्रिमंडळात आहेत. भ्रष्टाचाऱ्यांचा सत्कार पंतप्रधान दिल्लीत करतायेत. महाराष्ट्रात अण्णा हजारेंची ओळख आहे. अण्णा हजारेंची प्रतिमा आहे. दादा भुसे, राहुल कुल, अब्दुल सत्तार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रकरणे मी बाहेर काढली. ते अण्णांच्या डोळ्यासमोर आहे. अण्णा हजारे यांना माझी हात जोडून विनंती आहे. तुम्ही नेहमी देश वाचवण्यासाठी भूमिका घेतली आहे. रामलीला, जंतरमंतर याठिकाणी अण्णा हजारेंनी आंदोलन केले. अण्णांच्या आंदोलनामुळे आज भाजपा सत्तेत आहे आणि काँग्रेस सत्तेतून गेली. आज त्याच भाजपाच्या भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारेंनी रणशिंग फुंकण्याची गरज आहे असं राऊतांनी म्हटलं.

तसेच अण्णा हजारेंना जाग आलीय ही मोठी गोष्ट आहे. देशात भ्रष्टाचार वाढलाय, बलात्कार वाढलेत आम्ही अण्णा हजारेंना म्हटलं अण्णा उठा, रामलीला मैदान, जंतरमंतरला जाऊया. तेव्हा अण्णा कुठे होते? जंतरमंतरवर महिला कुस्तीपटू आंदोलन करत होते तेव्हा अण्णा कुठे होते? मणिपूर हिंसाचारावर आज देश बोलतोय. त्यात अण्णा हजारे बोलले त्यात नवीन काय असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला.  

हे धोरण अतिशय घोतक

देवेंद्र फडणवीस यांनी चक्की पिसिंगचा नारा दिला आज सगळेच भ्रष्टाचारी भाजपात गेले आणि शुद्ध झाले. स्वत:चा जीव वाचवायला अनेक जण भाजपात गेले. काही दिवसांनी सगळ्या गोष्टींचा खुलासा होईल. सत्तेत नाही असे जे आमदार आहेत ते लोकांचे प्रतिनिधित्व करत नाही का? मतदारसंघाचा विकास करण्याचा अधिकार नाही का? पण या देशात जो आमच्यासोबत येईल मग तो भ्रष्टाचारी असेल, व्यभिचारी असेल त्यांनाच विकासकामांसाठी निधी दिला जाईल. हे धोरण अतिशय घातक आहेत असा आरोपही राऊतांनी केला.

मुख्यमंत्रिपदाचे आसन अस्थिर

दरम्यान, अजित पवार आल्यापासून मुख्यमंत्रिपदाचे आसन अस्थिर झालेले आहे. एक मोदी सबपर भारी अशी घोषणा आहे मग त्यांना ३८-४० कशाला लागतायेत. एनडीएला काय करायचे ते करू द्या. पण इंडिया ही २०२४ च्या निवडणुकीत सत्तेत येण्यासाठी स्थापन झाली आहे. कालपर्यंत मोदींना एनडीए आठवला नाही का? असा सवाल संजय राऊतांनी केला.    

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतanna hazareअण्णा हजारेBJPभाजपा